शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:00 IST

नामात प्रेम कसे येईल याचा विचार न करता नाम कसे घेता येईल, याची विचार झाला पाहिजे. 

नामात प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थोडासा विचार केला, तर लक्षात येईल की हा प्रश्नच मूळात बरोबर नाही. मूल झाल्याशिवाय बाईला, मूलाबद्दल प्रेम कसे येईल? मूल झाले, की आपोआप त्याबद्दल प्रेम तिच्या मनात उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात, 

बाळा दुग्ध कोण, करितो उत्पत्ती,वाढवे श्रीपती सवे दोन्ही!

बाळाची चाहूल लागताच, भगवंत त्याच्या भूकेची सोय आधी लावून देतो आणि बाळासकट आईचीही काळजी घेतो. त्याप्रमाणे मुलाबद्दल प्रेम कसे वाटेल, हा विचार आधीच करणे अनाठायी आहे. त्यापेक्षा मूल कसे होईल, हा विचार सयुक्तिक ठरेल. अशाच प्रकारे नामात प्रेम कसे येईल याचा विचार न करता नाम कसे घेता येईल, याची विचार झाला पाहिजे. 

हेही वाचा : 'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

मुखी नाम घेण्यासाठी कोणाची आडकाठी आहे? तर दुसीऱ्या कोणाची नसून आपल्या स्वत:ची! नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल, तर दोष दुसऱ्याचा नसून स्वत:चाच आहे. नाम घेणे हे आपले काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्म आहे. 

आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा निराळा असूच शकत नाही. तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. यावरून एक गोष्ट अशी ठरली, की प्रेम का येत नाही, याचे उत्तर आमच्याजवळच आहे, ते म्हणजे `नाम घेत नाही म्हणून!'

यावर कोणी असे म्हणेल, की आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही? हे विचारणे ठिक आहे. पण आता आम्ही जे नाम म्हणून घेतो, त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्मलेल्या बाळाबद्दल जसा कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण नाम घेतो. विंâवा दुसरे काही करायला नाही म्हणून नाम घेतो. अर्थात असे नाम घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण `प्रेम का येत नाही' असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरूरी आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले, तर त्याच्याबाबतीत तिची जी स्थिती होते, तीच नामाच्या बाबतीत आपली होणे जरूरी आहे. 

आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्या नकळत झाली पाहिजे. ती कळली, तर सर्वकाही फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच जास्त कठीण असते. ज्याला मी काही तरी झालो, असे वाटते, तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने स्वत:ला फारच सांभाळले पाहिजे. अखंड नामस्मरण हाच नामावर प्रेम येण्याचा अंतिम पर्याय आहे.

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज