शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:00 IST

नामात प्रेम कसे येईल याचा विचार न करता नाम कसे घेता येईल, याची विचार झाला पाहिजे. 

नामात प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थोडासा विचार केला, तर लक्षात येईल की हा प्रश्नच मूळात बरोबर नाही. मूल झाल्याशिवाय बाईला, मूलाबद्दल प्रेम कसे येईल? मूल झाले, की आपोआप त्याबद्दल प्रेम तिच्या मनात उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात, 

बाळा दुग्ध कोण, करितो उत्पत्ती,वाढवे श्रीपती सवे दोन्ही!

बाळाची चाहूल लागताच, भगवंत त्याच्या भूकेची सोय आधी लावून देतो आणि बाळासकट आईचीही काळजी घेतो. त्याप्रमाणे मुलाबद्दल प्रेम कसे वाटेल, हा विचार आधीच करणे अनाठायी आहे. त्यापेक्षा मूल कसे होईल, हा विचार सयुक्तिक ठरेल. अशाच प्रकारे नामात प्रेम कसे येईल याचा विचार न करता नाम कसे घेता येईल, याची विचार झाला पाहिजे. 

हेही वाचा : 'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

मुखी नाम घेण्यासाठी कोणाची आडकाठी आहे? तर दुसीऱ्या कोणाची नसून आपल्या स्वत:ची! नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल, तर दोष दुसऱ्याचा नसून स्वत:चाच आहे. नाम घेणे हे आपले काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्म आहे. 

आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा निराळा असूच शकत नाही. तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. यावरून एक गोष्ट अशी ठरली, की प्रेम का येत नाही, याचे उत्तर आमच्याजवळच आहे, ते म्हणजे `नाम घेत नाही म्हणून!'

यावर कोणी असे म्हणेल, की आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही? हे विचारणे ठिक आहे. पण आता आम्ही जे नाम म्हणून घेतो, त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्मलेल्या बाळाबद्दल जसा कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण नाम घेतो. विंâवा दुसरे काही करायला नाही म्हणून नाम घेतो. अर्थात असे नाम घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण `प्रेम का येत नाही' असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरूरी आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले, तर त्याच्याबाबतीत तिची जी स्थिती होते, तीच नामाच्या बाबतीत आपली होणे जरूरी आहे. 

आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्या नकळत झाली पाहिजे. ती कळली, तर सर्वकाही फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हेच जास्त कठीण असते. ज्याला मी काही तरी झालो, असे वाटते, तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने स्वत:ला फारच सांभाळले पाहिजे. अखंड नामस्मरण हाच नामावर प्रेम येण्याचा अंतिम पर्याय आहे.

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज