शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

खजिना कधीही कोणालाही मिळू शकतो, फक्त तो ओळखता आला पाहिजे; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:52 IST

संपत्ती मिळाली तर कोण नाही म्हणेल? पण ती नेमकी कुठे आणि कशी शोधायची हे सांगणारी व्यक्ती सापडली पाहिजे!

वाडवडिलांची पुण्याई वंशजांच्या कामी येते. ही पुण्याई कधी प्रतिष्ठेची असते, तर कधी मान सन्मानाची, तर कधी आर्थिक स्वरूपाची किंवा अनुभवाची! आजही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून अनेक गोष्टी वारसाहक्काने मिळतात. परंतु, हक्क म्हटल्यावर अधिकार आला आणि अधिकार मिळवताना कर्तव्याची जाणीव नसेल तर काय उपयोग? यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या मुलाला सांगितला पुढील उपाय...!

एक शेतकरी होता. अतिशय मेहनती होता. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर घरसंसार चालवला होता. मुलाचे पालनपोषण केले. शिकवले, वाढवले आणि आता त्याने घराची जबाबदारी स्वीकारावी असे त्याला सांगितले. परंतु, मुलगा अतिशय आळशी होता.

मुलाने आजवर वडिलांची मेहनत पाहिली होती. परंतु त्याची कष्ट करायची अजिबात तयारी नव्हती. त्याला नेहमी अचानक धनलाभ झाल्याचे स्वप्न पडत असे. 

एक दिवस तो वडिलांना म्हणाला, `तुम्ही शेतीत कष्ट घेण्यापेक्षा व्यापार केला असता, तर आज मला कष्ट करावेच लागले नसते. वारसाहक्काने तुमची कमाई मला मिळाली असती. खजिना मिळाला असता. पण नाही. तुम्ही स्वत: कष्ट केले आणि आता मलाही कष्ट करायला भाग पाडत आहात. 

यावर शेतकरी म्हणाला, `बाळा, खजिन्याचे काय घेऊन बसलास, तो तर तुला मी आताही देऊ शकतो. जो मला माझ्या वडिलांनी दिला होता. आता तो मी तुला देतो.'

मुलगा सुखावला. कानाचे द्रोण करून वडिलांचे शब्द ऐकू लागला. शेतकऱ्याने त्याला एक ठिकाण सांगितले. तिथे एक डोंगर आहे आणि डोंगरावर एक देऊळ आहे. त्याच्या मागच्या बाजूला धनाची पेटी पुरलेली आहे.

हे शब्द ऐकले आणि मुलाला एवढे स्फुरण चढले की आनंदाच्या भरात तो निघालासुद्धा! मनातल्या मनात तो भविष्याची स्वप्न रंगवू लागला. परंतु त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला एवढी मेहनत घ्यावी लागली, की खजिन्याचा विचारच त्याच्या डोक्यातून निघून गेला. डोंगरावर पोहोचणे हेच त्याचे ध्येय बनले. 

वाटेत त्याला अनेक लोक भेटले. त्यांची मदत घेत घेत तो प्रवास करत होता. वळचणीचे पैसे संपले. वाटेत मिळेल ते काम पत्करून त्याने थोडीफार कमाई केली. तो अनुभव त्याला बरेच काही शिकवून गेला. मजल दरमजल करत तो डोंगरावर पोहोचला. देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या पाठीमागे पोहोचला. तिथे जाऊन मागचा सबंध परिसर पाहून तो देहभान विसरला. एवढे निसर्गसौंदर्य त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. आपल्या वडिलांनी सांगितला, तो खजिना बहुदा हाच असावा.

खजिन्याच्या शोधात निघालेल्या मुलाला लोकसंग्रह, स्वमेहेनत, निसर्गासौंदर्य आणि बदललेला दृष्टीकोन अशी अनुभवाने भरलेली खजिन्याची पेटी सापडली. मुलाने परत येऊन वडिलांचे आभार मानले. कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि भविष्यात आपल्या मुलालाही हा खजिना द्यायचा, असे त्याने ठरवून टाकले.