शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आजचे काम उद्यावर ढकलणे पडू शकते महाग, कसे ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 16:39 IST

आयुष्य अशाश्वत आहे. त्यामुळे प्रत्येक संधी दवडू नका. कारण उद्या कधीच उगवत नाही. जे आहे ते आजच, असे समजून प्रत्येक क्षण सार्थकी लावा. 

आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगतात, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' अर्थात आजचे काम उद्यावर ढकलू नका, तर ते आजच करून मोकळे व्हा. जो आपले काम वेळच्या वेळी करतो, त्याच्या वाट्याला सहसा अपयश येत नाही. मात्र जो आळस करून कामाची टाळाटाळ करतो, तो आपल्या स्वप्नांची पूर्तता कधीच करू शकत नाही. आता या मुलाचेच काय झाले पहा ना.. 

एक विद्यार्थी गुरुगृही राहून विद्यार्जन करत होता. बुद्धीने हुशार असूनही त्याच्या अंगात भयंकर आळस होता. त्याचा आळस कसा दूर करावा हा गुरुजींसमोर मोठा प्रश्न होता. त्याची स्वप्नं मोठी होती परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत करायची तयारी नव्हती. गुरुजींनी एकदा त्याला कामाला लावायचे ठरवले. 

दोन दिवसांसाठी आपण गावाला जात असल्याचे सांगून आपल्याजवळ असलेला पारस त्याच्या हाती देत म्हणाले, 'हा दगड सांभाळून ठेव. हा दगड जो कोणी लोखंडावर घासतो, त्या लोखंडाचे सोने होते. म्हणून अतिशय बहुमूल्य असा पारस जपून ठेव. असे सांगून गुरुजी बाहेरगावी गेले.

शिष्याने तो पारस जपून आपल्या कापडी पिशवीत लपवून ठेवला आणि त्या पिशवीवर डोके ठेवून तो स्वप्न पाहू लागला. गुरुजींनी दिलेल्या दगडाचा आपण वापर करून पाहिला तर? आपल्याला काहीच शिकायची गरज लागणार नाही. आपल्याकडे भरपूर सोने असेल. ते विकल्यावर भरपूर पैसा मिळेल. भरपूर पैसा जमा झाला की आयुष्यभर मेहनतच करावी लागणार नाही. तर आपण या दगडाचा जरूर वापर करून पाहिला पाहिजे. 

या विचाराने त्याने तो दगड पिशवीतून बाहेर काढला. पण जवळपास लोखंडी वस्तू नव्हती. लोखंडी वस्तू आणण्यासाठी बाजारात जावे लागणार होते. गुरुजी तसेही दोन दिवस घरी येणार नाहीत. त्यामुळे दीड दिवस छान आराम करून घेऊ आणि उद्या संध्याकाळी बाजारात जाऊन हवे तेवढे लोखंड घेऊन येऊ. अशा विचाराने त्याने छान झोप काढली. दोन दिवस एकट्याने मस्त मौज मजा केली. ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो बाजारात जायला निघाला. पण दुपारचे जेवण जड झाल्याने त्याने आणखी थोडी झोप काढली. शेवटी सूर्यास्ताच्या सुमारास तो बाजारात जायला निघाला. बघतो तर काय, गुरुजी दारात हजर!

गुरुजींना पाहून तो गडबडून गेला, म्हणाला, 'गुरुजी तुम्ही तर उद्या येणार होता ना?'गुरुजी म्हणाले, 'हो, पण माझं काम लवकर आटोपलं म्हणून मी लवकर आलो. तू तो पारस जपून ठेवला आहेस ना? तो मला परत कर. तो सांभाळून ठेवला पाहिजे.'

शिष्याने जड अंत:करणाने तो पारस गुरुजींच्या हाती सोपवला. गुरुजींनी त्याचा चेहरा वाचला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप स्पष्टपणे दिसत होता. गुरुजी त्याला म्हणाले, 'तुला कसले दुःख झाले, ते माझ्या लक्षात आले आहे. निदान या प्रसंगातून काहीतरी शिक. पारस हे केवळ निमित्त आहे, खरे सोने करायचे असेल तर संधीचे सोने करायला शिक, तरच आयुष्याचे सोने होईल...'

गुरुजींनी त्यांच्या शिष्याला दिलेला उपदेश आपण सर्वांनीच पाळला पाहिजे. आजचे काम उद्यावर न ढकलता ते आजच्या आज पूर्ण करून प्रत्येक क्षणाचे सोने केले पाहिजे. आयुष्य अशाश्वत आहे. त्यामुळे प्रत्येक संधी दवडू नका. कारण उद्या कधीच उगवत नाही. जे आहे ते आजच, असे समजून प्रत्येक क्षण सार्थकी लावा.