शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चौसष्ठ कलांमध्ये पारंगत असणारे श्रीविजयींद्रतीर्थ स्वामी यांची आज पुण्यतिथी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 13:55 IST

साम्राज्य आणि विद्याराज्य लक्ष्मीची सेवा करत लक्ष्मीपती नारायणाचा महिमा श्रीविजयींद्रतीर्थ स्वामींनी सदैव गायला. त्यांचे अनेक अनुयायी महाराष्ट्रातही आहेत.

आजच्या काळातही वैदिक हिंदू धर्म टिकवून ठेवण्यात दक्षिणेकडील लोक अग्रेसर आणि आग्रही आहेत. महाराष्ट्रातील संत परंपरेप्रमाणे दक्षिणेतही मोठी संत परंपरा लाभल्याचे दिसून येते. भारतावर परकीय आक्रमण झाले असताना धर्म टिकवण्याचे आणि पुनश्च रुजवण्याचे काम संतांनी केले.तेथील संतांनी धार्मिक ग्रंथ, स्तोत्र, पुराण यांचे जतन करून वैदिक हिंदू धर्म जागृत ठेवला. अशाच संतांपैकी श्रीविजयींद्रतीर्थ स्वामी यांची आज पुण्यतिथी. 

१५-१६व्या शतकात दक्षिणेत सनातन धर्माचा ध्वज फडकवत ठेवण्यात व्यासराज स्वामींचा सिंहाचा वाटा होता. साम्राज्यलक्ष्मी बरोबरीनेच विद्याराज्य लक्ष्मीही सुरक्षित ठेवण्याची परंपरा व्यासराज स्वामींनी सुरू केली. ही परंपरा त्यांच्या शिष्यांनीही अखंडित ठेवली. त्यातलेच एक शिष्य म्हणजे श्रीविजयींद्रतीर्थ स्वामी.  त्यांचे अनेक अनुयायी महाराष्ट्रातही आहेत. 

६४ कलांमध्ये पारंगत असणाऱ्या स्वामींनी १०० हून अधिक ग्रंथ रचले. 'जयीन्द्रयोगिरूपावतीर्ण एष पूर्णधीः' असं म्हणत तत्कालीन शैवाद्वैत मताच्या विद्वान अप्पय्या दिक्षितांनीही त्यांना गौरवलं. नारायण या शब्दाचा अर्थ १०० हून अधिक प्रकारे निरूपणात्मक रूपातून सांगितला.

रामराय या विजयनगर साम्राज्याच्या अधिपतीस त्याची राणदुल्ला खानाबरोबरीची मैत्री सोडून देण्यास सांगितले असताही त्याने ते न ऐकल्याने विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झाला. तरीही भगवंताच्या कृपेने परकीय आक्रमणापासून गावकऱ्यांच्या मदतीने तपःसामर्थ्याच्या जोरावर मंदिरांचे रक्षण केले. अशाप्रकारे साम्राज्य आणि विद्याराज्य लक्ष्मीची सेवा करत लक्ष्मीपती नारायणाचा महिमा सदैव गायला.अशा स्वामींचा आज आराधना अर्थात समाधी दिवस.

त्यांनी रचलेल्या पापविमोचन स्तोत्रातील एका श्लोकाचा आणि स्तोत्राचा थोडक्यात भावार्थ बघून त्याचे चिंतन या पर्वकाळी करूया.

परिशेषित ईश मध्यकालः सुकृते भारतभूतले वरिष्ठःतदहापि सदैव पापचित्ते मयि पश्वन्त्यजयोश्च कोपराधः

हे देवा, भारतभूमी सारख्या श्रेष्ठ भूमीत माझा जन्म झाला आहे.  इतरांना पापी, मूर्ख म्हणण्यातच आयुष्यातली वर्षे, वेळ, कष्ट वाया घालवले आहेत. मीही पाप करत आलो असताना इतरांना असे बोलून मी काय मिळवले? कोणते पुण्याचे काम मी केले आहे? पण तरीही देवा दया करून तुझा अनुग्रह होऊ दे व तुझ्या चरणांची भक्ती करता येऊ दे एवढीच कृपा कर!