शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:11 IST

प्रेमप्रीतीचें बंधन सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. )

जो शुष्क काष्ठ स्वयेकोरी । तो कोवळ्या कमळा माझारी ।भ्रमर गुंतला गंधावरी । कमळास तरी कुचंबो नेदी ॥

शांतीसागर एकनाथ महाराजांनी या ओवीत भ्रमराचा एवढा समर्पक दृष्टांत दिला आहे तो एवढ्यासाठी की, या ओवीत भ्रमर गंधावर एवढा लुब्ध होतो की, आपले अनमोल जीवन तो कमळाच्या गंधावर भुलून समर्पित करतो. मोठमोठ्या इमारतीची लाकडे पोखरण्यात पटाईत असणारा हा भुंगा, कमळातील परागकण सेवन करण्यासाठी त्या सूर्यविकासिनी कमळात प्रवेश करतो. त्या कमळातील गंध विषयाला तो इतका लुब्ध होतो की, कमळाच्या पाकळ्या गळून खाली पडू नये म्हणून तो पंखसुद्धा हलवित नाही. गंधाचे सेवन करता करता सूर्यविकासिनी कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. आत हा भुंगा कोंडून पडतो. कशाच्या आशेने तर, उद्या सकाळ होईल, सूर्योदय होईल व या कमळाच्या पाकळ्या पुन्हा उमलतील.. हा हा म्हणता रात्र निघून जाईल व सूर्य उगवला, कमळाने आपल्या पाकळ्या उघडल्या की, आपण सुखरुप या कमळांतून बाहेर पडू..! असा विचार हा भ्रमर करतो. सुभाषितकारांनी अत्यंत रसभरीत वर्णन केले आहे ते म्हणतात-

रात्रि र्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् ।भास्वान् उदेष्यति हसिष्यति पंकजश्री: ।इत्थं विचिंतयति कोषगते द्विरेके ।हा हन्त नलिनी गज उज्जहार ॥

सकाळी बाहेर पडू असा विचार हा भ्रमर करतो खरा पण घडते काय..? सायंकाळच्या वेळी एक हत्ती त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी येतो. सरोवरात जलविहार करता करता हत्ती आपल्या सोंडेने ते कमळ देठासकट उपटून पायाखाली चिरडून टाकतो आणि त्यातच या भ्रमराचा किंवा भुंग्याचा अंत होतो. अहो..! लाकडे पोखरण्यात पटाईत असणाऱ्या या भुंग्याला कमळ पोखरता आले नसते का..? पण तो गंध या विषयाच्या प्रेमात पडून स्वतःचा अंत करुन घेतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात दृष्टांत दिला -

नाही काष्ठाचा गुमान । गोंवी भ्रमरां सुमन ।प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

प्रेमप्रीतीचें बंधन असे सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.ज्ञानराज माऊली म्हणतात -

जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतैसे काष्ठ कोरडे ।परी तो कमलकलिकेमाजि सापडे । कोवळिये ॥

तेव्हा अमर्याद विषयसेवन हे जीवाचा सर्वस्वी नाश करणारच..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक