शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:11 IST

प्रेमप्रीतीचें बंधन सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. )

जो शुष्क काष्ठ स्वयेकोरी । तो कोवळ्या कमळा माझारी ।भ्रमर गुंतला गंधावरी । कमळास तरी कुचंबो नेदी ॥

शांतीसागर एकनाथ महाराजांनी या ओवीत भ्रमराचा एवढा समर्पक दृष्टांत दिला आहे तो एवढ्यासाठी की, या ओवीत भ्रमर गंधावर एवढा लुब्ध होतो की, आपले अनमोल जीवन तो कमळाच्या गंधावर भुलून समर्पित करतो. मोठमोठ्या इमारतीची लाकडे पोखरण्यात पटाईत असणारा हा भुंगा, कमळातील परागकण सेवन करण्यासाठी त्या सूर्यविकासिनी कमळात प्रवेश करतो. त्या कमळातील गंध विषयाला तो इतका लुब्ध होतो की, कमळाच्या पाकळ्या गळून खाली पडू नये म्हणून तो पंखसुद्धा हलवित नाही. गंधाचे सेवन करता करता सूर्यविकासिनी कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. आत हा भुंगा कोंडून पडतो. कशाच्या आशेने तर, उद्या सकाळ होईल, सूर्योदय होईल व या कमळाच्या पाकळ्या पुन्हा उमलतील.. हा हा म्हणता रात्र निघून जाईल व सूर्य उगवला, कमळाने आपल्या पाकळ्या उघडल्या की, आपण सुखरुप या कमळांतून बाहेर पडू..! असा विचार हा भ्रमर करतो. सुभाषितकारांनी अत्यंत रसभरीत वर्णन केले आहे ते म्हणतात-

रात्रि र्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् ।भास्वान् उदेष्यति हसिष्यति पंकजश्री: ।इत्थं विचिंतयति कोषगते द्विरेके ।हा हन्त नलिनी गज उज्जहार ॥

सकाळी बाहेर पडू असा विचार हा भ्रमर करतो खरा पण घडते काय..? सायंकाळच्या वेळी एक हत्ती त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी येतो. सरोवरात जलविहार करता करता हत्ती आपल्या सोंडेने ते कमळ देठासकट उपटून पायाखाली चिरडून टाकतो आणि त्यातच या भ्रमराचा किंवा भुंग्याचा अंत होतो. अहो..! लाकडे पोखरण्यात पटाईत असणाऱ्या या भुंग्याला कमळ पोखरता आले नसते का..? पण तो गंध या विषयाच्या प्रेमात पडून स्वतःचा अंत करुन घेतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात दृष्टांत दिला -

नाही काष्ठाचा गुमान । गोंवी भ्रमरां सुमन ।प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

प्रेमप्रीतीचें बंधन असे सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.ज्ञानराज माऊली म्हणतात -

जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतैसे काष्ठ कोरडे ।परी तो कमलकलिकेमाजि सापडे । कोवळिये ॥

तेव्हा अमर्याद विषयसेवन हे जीवाचा सर्वस्वी नाश करणारच..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक