शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:11 IST

प्रेमप्रीतीचें बंधन सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. )

जो शुष्क काष्ठ स्वयेकोरी । तो कोवळ्या कमळा माझारी ।भ्रमर गुंतला गंधावरी । कमळास तरी कुचंबो नेदी ॥

शांतीसागर एकनाथ महाराजांनी या ओवीत भ्रमराचा एवढा समर्पक दृष्टांत दिला आहे तो एवढ्यासाठी की, या ओवीत भ्रमर गंधावर एवढा लुब्ध होतो की, आपले अनमोल जीवन तो कमळाच्या गंधावर भुलून समर्पित करतो. मोठमोठ्या इमारतीची लाकडे पोखरण्यात पटाईत असणारा हा भुंगा, कमळातील परागकण सेवन करण्यासाठी त्या सूर्यविकासिनी कमळात प्रवेश करतो. त्या कमळातील गंध विषयाला तो इतका लुब्ध होतो की, कमळाच्या पाकळ्या गळून खाली पडू नये म्हणून तो पंखसुद्धा हलवित नाही. गंधाचे सेवन करता करता सूर्यविकासिनी कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. आत हा भुंगा कोंडून पडतो. कशाच्या आशेने तर, उद्या सकाळ होईल, सूर्योदय होईल व या कमळाच्या पाकळ्या पुन्हा उमलतील.. हा हा म्हणता रात्र निघून जाईल व सूर्य उगवला, कमळाने आपल्या पाकळ्या उघडल्या की, आपण सुखरुप या कमळांतून बाहेर पडू..! असा विचार हा भ्रमर करतो. सुभाषितकारांनी अत्यंत रसभरीत वर्णन केले आहे ते म्हणतात-

रात्रि र्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् ।भास्वान् उदेष्यति हसिष्यति पंकजश्री: ।इत्थं विचिंतयति कोषगते द्विरेके ।हा हन्त नलिनी गज उज्जहार ॥

सकाळी बाहेर पडू असा विचार हा भ्रमर करतो खरा पण घडते काय..? सायंकाळच्या वेळी एक हत्ती त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी येतो. सरोवरात जलविहार करता करता हत्ती आपल्या सोंडेने ते कमळ देठासकट उपटून पायाखाली चिरडून टाकतो आणि त्यातच या भ्रमराचा किंवा भुंग्याचा अंत होतो. अहो..! लाकडे पोखरण्यात पटाईत असणाऱ्या या भुंग्याला कमळ पोखरता आले नसते का..? पण तो गंध या विषयाच्या प्रेमात पडून स्वतःचा अंत करुन घेतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात दृष्टांत दिला -

नाही काष्ठाचा गुमान । गोंवी भ्रमरां सुमन ।प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

प्रेमप्रीतीचें बंधन असे सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.ज्ञानराज माऊली म्हणतात -

जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतैसे काष्ठ कोरडे ।परी तो कमलकलिकेमाजि सापडे । कोवळिये ॥

तेव्हा अमर्याद विषयसेवन हे जीवाचा सर्वस्वी नाश करणारच..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक