शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भाषेवरून विचार कळतात आणि विचारांवरून व्यक्तिमत्त्व; म्हणून शब्द जपून वापरा आणि वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:00 IST

माणसाची भाषा त्याच्या सुसंस्कृतपणाचे परिमाण देते. म्हणून शब्दांचा वापर जपून करायचा असतो.

एकदा एक राजा आपले प्रधान व अंगरक्षक यांच्यासह शिकारीला जातो. शिकारीच्या शोधात असताना तो वाट चुकतो. त्याची आणि सैनिकांची चुकामूक होते. राजा त्यांचा शोध घेत फिरतो. सैनिक राजाला शोधत फिरतात.

बरेच अंतर चालल्यावर राजाला एका झाडापाशी साधू महाराज दिसतात. एवढ्या घनदाट जंगलात तपस्वी योगी साधना करत आहेत पाहून तो साधू महाराजांना नमस्कार करतो. साधू महाराजांना नम्रपणे विचारतो, `महाराज, मी जंगलात वाट चुकलो आहे. तुम्ही माझ्या सैनिकांनी इथून जाताना पाहिले का?' 

आकाशाकडे एकटक नजर लावत साधू महाराज म्हणाले, `राजन, तुझे अंगरक्षक आणि प्रधान काही वेळापूर्वी माझ्या डाव्या हाताच्या दिशेने गेले आहेत. तू त्वरित जा, तुला ते भेटतील.'

क्षणाचाही विलंब न करता राजा साधू महाराजांना नमस्कार करून निघतो. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जात सैनिकांना आवाज देतो आणि पुढच्या काही वेळात त्याची सैनिकांशी गाठभेट होते. तेव्हा राजाच्या मनात शंका डोकावते. ती म्हणजे, `साधू महाराज अंध असूनही त्यांनी मला योग्य मार्ग कसा काय सांगितला आणि त्यांना मी माझी ओळख पटवून दिलेली नसतानाही त्यांनी मला राजन म्हणून हाक कशी मारली?'

कुतुहलापोटी राजा आपल्या सैनिकांबरोबर राजवाड्यात परतण्याआधी साधू महाराजांच्या भेटीस गेला आणि त्यांना नम्रतेने आपली शंका प्रस्तुत केली. त्यावर साधू महाराज म्हणाले, `राजा, मी अंध असलो, तरी मी समोरच्याच्या बोलण्यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखू शकतो.

सुरुवातीला इथे काही लोक आले आणि म्हणाले, `ए गोसावड्या, इथून बाहेर पडायचा मार्ग कुठे? तू आमच्या राजाला पाहिले का?' त्यांच्या भाषेवरून कळले, की ते अंगरक्षक आहेत.

मग एक जण म्हणाले, `बाबाजी तुम्ही आमच्या राजेसाहेबांना पाहिले का?' यावरून कळले की ते प्रधान होते.

मग तुम्ही आलात आणि विचारले, `साधू महाराज, माझ्या सैनिकांना पाहिले?' तेव्हा मी ओळखले की तू राजा आहेस. 

माणसाची भाषा त्याच्या सुसंस्कृतपणाचे परिमाण देते. म्हणून शब्दांचा वापर जपून करायचा असतो. `शब्द शब्द जपून ठेव ​​बकुळीच्या फुलापरी' असे कवी म्हणतात ते उगीच नाही. सोडलेला बाण आणि फेकलेला शब्द परत घेता येत नाही. शब्द घाव करू शकतात आणि मलमही लावू शकतात. म्हणून त्यांचा चपखलपणे वापर केला पाहिजे. शब्द सुधारले तर भाषा सुधारेल आणि भाषा सुधारली तर व्यक्तिमत्त्व सुधारेल...!