शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भाषेवरून विचार कळतात आणि विचारांवरून व्यक्तिमत्त्व; म्हणून शब्द जपून वापरा आणि वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:00 IST

माणसाची भाषा त्याच्या सुसंस्कृतपणाचे परिमाण देते. म्हणून शब्दांचा वापर जपून करायचा असतो.

एकदा एक राजा आपले प्रधान व अंगरक्षक यांच्यासह शिकारीला जातो. शिकारीच्या शोधात असताना तो वाट चुकतो. त्याची आणि सैनिकांची चुकामूक होते. राजा त्यांचा शोध घेत फिरतो. सैनिक राजाला शोधत फिरतात.

बरेच अंतर चालल्यावर राजाला एका झाडापाशी साधू महाराज दिसतात. एवढ्या घनदाट जंगलात तपस्वी योगी साधना करत आहेत पाहून तो साधू महाराजांना नमस्कार करतो. साधू महाराजांना नम्रपणे विचारतो, `महाराज, मी जंगलात वाट चुकलो आहे. तुम्ही माझ्या सैनिकांनी इथून जाताना पाहिले का?' 

आकाशाकडे एकटक नजर लावत साधू महाराज म्हणाले, `राजन, तुझे अंगरक्षक आणि प्रधान काही वेळापूर्वी माझ्या डाव्या हाताच्या दिशेने गेले आहेत. तू त्वरित जा, तुला ते भेटतील.'

क्षणाचाही विलंब न करता राजा साधू महाराजांना नमस्कार करून निघतो. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जात सैनिकांना आवाज देतो आणि पुढच्या काही वेळात त्याची सैनिकांशी गाठभेट होते. तेव्हा राजाच्या मनात शंका डोकावते. ती म्हणजे, `साधू महाराज अंध असूनही त्यांनी मला योग्य मार्ग कसा काय सांगितला आणि त्यांना मी माझी ओळख पटवून दिलेली नसतानाही त्यांनी मला राजन म्हणून हाक कशी मारली?'

कुतुहलापोटी राजा आपल्या सैनिकांबरोबर राजवाड्यात परतण्याआधी साधू महाराजांच्या भेटीस गेला आणि त्यांना नम्रतेने आपली शंका प्रस्तुत केली. त्यावर साधू महाराज म्हणाले, `राजा, मी अंध असलो, तरी मी समोरच्याच्या बोलण्यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखू शकतो.

सुरुवातीला इथे काही लोक आले आणि म्हणाले, `ए गोसावड्या, इथून बाहेर पडायचा मार्ग कुठे? तू आमच्या राजाला पाहिले का?' त्यांच्या भाषेवरून कळले, की ते अंगरक्षक आहेत.

मग एक जण म्हणाले, `बाबाजी तुम्ही आमच्या राजेसाहेबांना पाहिले का?' यावरून कळले की ते प्रधान होते.

मग तुम्ही आलात आणि विचारले, `साधू महाराज, माझ्या सैनिकांना पाहिले?' तेव्हा मी ओळखले की तू राजा आहेस. 

माणसाची भाषा त्याच्या सुसंस्कृतपणाचे परिमाण देते. म्हणून शब्दांचा वापर जपून करायचा असतो. `शब्द शब्द जपून ठेव ​​बकुळीच्या फुलापरी' असे कवी म्हणतात ते उगीच नाही. सोडलेला बाण आणि फेकलेला शब्द परत घेता येत नाही. शब्द घाव करू शकतात आणि मलमही लावू शकतात. म्हणून त्यांचा चपखलपणे वापर केला पाहिजे. शब्द सुधारले तर भाषा सुधारेल आणि भाषा सुधारली तर व्यक्तिमत्त्व सुधारेल...!