शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

गुरुने दिला ज्ञानरूपि वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 19:23 IST

नुसते आध्यात्मच नाही तर संत एकनाथांसारखे आम्ही विरतेचे प्रतीक युद्धशस्त्र व शास्त्र शिकून शूरता, वेळ प्रसंगी दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही. कारण मातृभूमी प्रथम. म्हणजे आमच्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी बघणार नाही. विद्वान, सज्जन यांची नम्रतेने पूजन करू व त्यांचे चांगले गुण आत्मसात करू, त्यांचे संवर्धन करू.

रवींद्र वासुदेव गाडगीळ

आम्ही चालवू हा ज्ञानरूपी वारसा. गुरु हेच कल्पवृक्ष आहेत. त्यांना आपण काहीही मागू शकतो आणि ते आपल्याला मिळतेही अर्थात आपली कुवत, पात्रता, वकुब सिद्ध करून दाखविल्यावरच. म्हणून तर अथर्व शीर्षाच्या फलादेशात मुद्दामहून दिलेले आहे “अशिष्याय न देयम, यो यदी मोहाद्दास्यपी सपापीयान भवति". सूरी, चाकू, बंदूक, बाईक, मोबाईल, माचिस जशी छोट्या मुलांच्या हातात दिली तर अनर्थ घडेल.

विज्ञानाचेही तसेच आहे. सुशिक्षित म्हणवणारे तरुण तालीबानी, अतिरेकी, नक्षली बनत आहेत. कारण अयोग्य व्यक्तीच्या हाती अयोग्य वस्तु पडत आहेत. योग्य वेळी योग्य गुरूंनी योग्य शिष्यालाच योग्य वेळी हा वारसा दिला पाहिजे. त्याला खात्री पाहिजे. आत्मविश्वास, त्याग, सेवा, राष्ट्रनिष्ठा, धर्मप्रेम, समाजप्रेम हे त्याचे अंगी पाहिजे.

हेही वाचा : रोज सकाळी उठून कराव्यात अशा पाच मुख्य गोष्टी, सांगताहेत गौर गोपाल दास!

गुरुने दिला ज्ञानरूपि वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ।। पिता बंधु स्नेही, तुम्ही माउली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा ।। जिथे काल अंकुर बिजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा ।। शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्येसवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा ।। जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी, मानसी हाच आहे ठसा ।। तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी किर्ति राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा ।।

कविवर्य श्री जगदीश खेबुडकर यांनी बाल संस्कार म्हणून हे आश्वासक शब्द गुंफले आहेत, की ज्यातून शिष्य स्वतः बद्दल खात्री देत आहेत, की आपण दिलेले ज्ञान हे योग्य व्यक्तीच्या हाती सोपवले गेले आहे. आपण निश्चिंत रहा. या गीताला संगीत दिले आहे, श्री प्रभाकर जोग आणि गायले अनुराधा पौंडवाल व सुरश्री सुरेश वाडकर यांनी. 'कैवारी” ह्या चित्रपटातील हे गीत.

“इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” ही तुमची गुरुकृपा. आपणच आमच्या मनाची मशागत केलीत व आत्मविश्वासाचे, विकासाचे बीज पेरलेत आणि प्रेमाचे, शिस्तीचे खत पाणी वेळेवेळी सिंचन केलेत म्हणून तर हा वेलू गेला हा विशाल आकाशात झेप घेत भरारी मारण्यासाठी.  हा अभंग ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या गुरु निवृत्तींनाथांकडून ज्ञान प्राप्ती झाल्यावर जो "अमृतानुभव" अनुभवला तेंव्हा हा अभंग त्यांना स्फुरला. जणू ज्ञान प्रकाशाचा मोगरा फुलला आणि विश्वभर त्याचा सुगंध पसरला.

नुसते आध्यात्मच नाही तर संत एकनाथांसारखे आम्ही विरतेचे प्रतीक युद्धशस्त्र व शास्त्र शिकून शूरता, वेळ प्रसंगी दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही. कारण मातृभूमी प्रथम. म्हणजे आमच्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी बघणार नाही. विद्वान, सज्जन यांची नम्रतेने पूजन करू व त्यांचे चांगले गुण आत्मसात करू, त्यांचे संवर्धन करू. आपली ही चांगली शिकवण आम्ही आमच्या कर्तुत्व, दातृत्व, नेतृत्व यातून दाही दिशेने जगभर आपले नाव गाजवू. आपण आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करू. खरोखरीच आम्ही भाग्यवंत, आपणासारीखे पुण्यवंत आमचे गुरु आम्हाला लाभले.   श्री गुरु देव दत्त. 

हेही वाचा : वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज