शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मोक्ष मिळवण्यासाठी 'हा' एक क्षण पुरेसा आहे; कसा ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:47 IST

मोक्ष या संकल्पनेबद्दल आपण बरेच स्वप्नरंजन केलेले असते, पण मोक्ष शब्दाचा अर्थ आणि सोपा मार्ग जाणून घेऊया!

>> कांचन दीक्षित

निसर्ग सकारात्मक आहे,निसर्ग सतत हिलिंग करत असतो,एक क्षणभरही न थांबता! साधं काही खरचटलं आणि थोडंसं रक्त आलं तरी त्याच क्षणी बरं होण्याची प्रक्रिया सुरु होते. निसर्गाला सगळं बरं करायचंय,पुर्ण करायचंय,संतुलन साधायचंय आणि त्यासाठी तो अखंड कार्यरत आहे.जोडणं,वर्तुळ पुर्ण करणं हेच निसर्गाचं काम.

माणूस मात्र आपल्या जखमा लपवतो,तळघरात कोंडून ठेवतो कारण त्याला वेदनेला सामोरं जाण्याचं भय वाटतं.तो त्यापेक्षा सोपं काहीतरी शोधतो,वेदना विसरण्याचा प्रयत्न करतो,स्वतःपासूनच पळतो,सुखाच्या मागे धावतो.

स्वतःला फसवतो,जखमा सुन्न करण्यात व्यस्त रहातो,मनोरंजनाचे नवनविन मार्ग शोधतो,गर्दीत रहातो,का तर एकांतात वेदना जाणवते म्हणून!हिलिंग म्हणजे शरीराला लागलेली बंदुकीची गोळी किंवा खुपसलेला बाण काढणं,Yes त्यात प्रचंड वेदना आहे,पण ती टाळण्यासाठी ती गोळी किंवा बाण तसाच राहू देणं जास्त भयानक आहे. मेंदूला फक्त वेदनेपासून पळणं माहीतीये,तो हुशार आहे त्याच्याजवळ हजारो मार्ग आहेत.तो त्याची सगळी शक्ती पणाला लावतो आणि शोधून आणतो वेदना सुन्न करण्याचे नामी उपाय!

आता निसर्ग,तो त्याचं काम सोडत नाही,अंघोळ करायला नको म्हणून सैरावैरा धावणा-या मुलाला आई बरोब्बर पकडते तसं निसर्ग आपल्याला पकडतो.कापडी पट्टयांवर आणखी पट्टया लावून झाकलेल्या,घट्ट बांधून बधीर केलेल्या वेदना,लपवलेल्या जखमा,आपली दु:खं त्याला बरी करायची आहेत,पण त्या पट्टयांनीच तर वाचवलं ना आपल्याला आत्तापर्यंत ! आपण सहजासहजी सोडणार थोडीच! आरडाओरडा,नकार,पळापळ करणारच ! मग निसर्ग आपली स्ट्रॅटेजी वापरतो,एखादा आजार,संकट,शत्रू,ट्रिगर करणारी माणसं,उधवस्त करणा-या घटना ... 

आता अडकलो ! बरीच वर्ष टाळूनही दातांच्या डाॅक्टरांच्या खुर्चीत कधीतरी बसावंच लागतं तशी वेळ !आता निसर्ग म्हणतो, किती वेळ वाया घालवलास तुझा आणि माझा ! कशाला ईतकं भोगलंस ?ही वेदना एकदाच सहन करायची होतीस,न पळता ! मग तू कधीच मुक्त झाला असतास.

एकदाच असं मरायचं की मरणातून बाहेर पडायचं,हे जमलं की मोक्ष होतो ना तसं !

आपण प्रथमच भेटतो वेदनेला,कितीही झालं तरी आपल्याच जखमा,नातंच ना एक,आपण स्विकारतो,जवळ घेतो,समजून घेतो,थोडं बोलतो,थोडं ऐकतो आणि अश्रूच्या धारांनी न्हाऊन निघतो.वेदना संपते,भीती संपते आणि विनाकारण धावत पळत थकलेला जीव विसावतो.

निसर्गाचं काम झालेलं असतं,आपण आपल्या नाकारलेल्या वेदनेला स्विकारुन बरं केलेलं असतं आणि पुर्ण संपुर्ण झालेले असतो.

मोक्ष म्हणतात तो हाच, नाही का?