शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

मोक्ष मिळवण्यासाठी 'हा' एक क्षण पुरेसा आहे; कसा ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:47 IST

मोक्ष या संकल्पनेबद्दल आपण बरेच स्वप्नरंजन केलेले असते, पण मोक्ष शब्दाचा अर्थ आणि सोपा मार्ग जाणून घेऊया!

>> कांचन दीक्षित

निसर्ग सकारात्मक आहे,निसर्ग सतत हिलिंग करत असतो,एक क्षणभरही न थांबता! साधं काही खरचटलं आणि थोडंसं रक्त आलं तरी त्याच क्षणी बरं होण्याची प्रक्रिया सुरु होते. निसर्गाला सगळं बरं करायचंय,पुर्ण करायचंय,संतुलन साधायचंय आणि त्यासाठी तो अखंड कार्यरत आहे.जोडणं,वर्तुळ पुर्ण करणं हेच निसर्गाचं काम.

माणूस मात्र आपल्या जखमा लपवतो,तळघरात कोंडून ठेवतो कारण त्याला वेदनेला सामोरं जाण्याचं भय वाटतं.तो त्यापेक्षा सोपं काहीतरी शोधतो,वेदना विसरण्याचा प्रयत्न करतो,स्वतःपासूनच पळतो,सुखाच्या मागे धावतो.

स्वतःला फसवतो,जखमा सुन्न करण्यात व्यस्त रहातो,मनोरंजनाचे नवनविन मार्ग शोधतो,गर्दीत रहातो,का तर एकांतात वेदना जाणवते म्हणून!हिलिंग म्हणजे शरीराला लागलेली बंदुकीची गोळी किंवा खुपसलेला बाण काढणं,Yes त्यात प्रचंड वेदना आहे,पण ती टाळण्यासाठी ती गोळी किंवा बाण तसाच राहू देणं जास्त भयानक आहे. मेंदूला फक्त वेदनेपासून पळणं माहीतीये,तो हुशार आहे त्याच्याजवळ हजारो मार्ग आहेत.तो त्याची सगळी शक्ती पणाला लावतो आणि शोधून आणतो वेदना सुन्न करण्याचे नामी उपाय!

आता निसर्ग,तो त्याचं काम सोडत नाही,अंघोळ करायला नको म्हणून सैरावैरा धावणा-या मुलाला आई बरोब्बर पकडते तसं निसर्ग आपल्याला पकडतो.कापडी पट्टयांवर आणखी पट्टया लावून झाकलेल्या,घट्ट बांधून बधीर केलेल्या वेदना,लपवलेल्या जखमा,आपली दु:खं त्याला बरी करायची आहेत,पण त्या पट्टयांनीच तर वाचवलं ना आपल्याला आत्तापर्यंत ! आपण सहजासहजी सोडणार थोडीच! आरडाओरडा,नकार,पळापळ करणारच ! मग निसर्ग आपली स्ट्रॅटेजी वापरतो,एखादा आजार,संकट,शत्रू,ट्रिगर करणारी माणसं,उधवस्त करणा-या घटना ... 

आता अडकलो ! बरीच वर्ष टाळूनही दातांच्या डाॅक्टरांच्या खुर्चीत कधीतरी बसावंच लागतं तशी वेळ !आता निसर्ग म्हणतो, किती वेळ वाया घालवलास तुझा आणि माझा ! कशाला ईतकं भोगलंस ?ही वेदना एकदाच सहन करायची होतीस,न पळता ! मग तू कधीच मुक्त झाला असतास.

एकदाच असं मरायचं की मरणातून बाहेर पडायचं,हे जमलं की मोक्ष होतो ना तसं !

आपण प्रथमच भेटतो वेदनेला,कितीही झालं तरी आपल्याच जखमा,नातंच ना एक,आपण स्विकारतो,जवळ घेतो,समजून घेतो,थोडं बोलतो,थोडं ऐकतो आणि अश्रूच्या धारांनी न्हाऊन निघतो.वेदना संपते,भीती संपते आणि विनाकारण धावत पळत थकलेला जीव विसावतो.

निसर्गाचं काम झालेलं असतं,आपण आपल्या नाकारलेल्या वेदनेला स्विकारुन बरं केलेलं असतं आणि पुर्ण संपुर्ण झालेले असतो.

मोक्ष म्हणतात तो हाच, नाही का?