शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

मोक्ष मिळवण्यासाठी 'हा' एक क्षण पुरेसा आहे; कसा ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:47 IST

मोक्ष या संकल्पनेबद्दल आपण बरेच स्वप्नरंजन केलेले असते, पण मोक्ष शब्दाचा अर्थ आणि सोपा मार्ग जाणून घेऊया!

>> कांचन दीक्षित

निसर्ग सकारात्मक आहे,निसर्ग सतत हिलिंग करत असतो,एक क्षणभरही न थांबता! साधं काही खरचटलं आणि थोडंसं रक्त आलं तरी त्याच क्षणी बरं होण्याची प्रक्रिया सुरु होते. निसर्गाला सगळं बरं करायचंय,पुर्ण करायचंय,संतुलन साधायचंय आणि त्यासाठी तो अखंड कार्यरत आहे.जोडणं,वर्तुळ पुर्ण करणं हेच निसर्गाचं काम.

माणूस मात्र आपल्या जखमा लपवतो,तळघरात कोंडून ठेवतो कारण त्याला वेदनेला सामोरं जाण्याचं भय वाटतं.तो त्यापेक्षा सोपं काहीतरी शोधतो,वेदना विसरण्याचा प्रयत्न करतो,स्वतःपासूनच पळतो,सुखाच्या मागे धावतो.

स्वतःला फसवतो,जखमा सुन्न करण्यात व्यस्त रहातो,मनोरंजनाचे नवनविन मार्ग शोधतो,गर्दीत रहातो,का तर एकांतात वेदना जाणवते म्हणून!हिलिंग म्हणजे शरीराला लागलेली बंदुकीची गोळी किंवा खुपसलेला बाण काढणं,Yes त्यात प्रचंड वेदना आहे,पण ती टाळण्यासाठी ती गोळी किंवा बाण तसाच राहू देणं जास्त भयानक आहे. मेंदूला फक्त वेदनेपासून पळणं माहीतीये,तो हुशार आहे त्याच्याजवळ हजारो मार्ग आहेत.तो त्याची सगळी शक्ती पणाला लावतो आणि शोधून आणतो वेदना सुन्न करण्याचे नामी उपाय!

आता निसर्ग,तो त्याचं काम सोडत नाही,अंघोळ करायला नको म्हणून सैरावैरा धावणा-या मुलाला आई बरोब्बर पकडते तसं निसर्ग आपल्याला पकडतो.कापडी पट्टयांवर आणखी पट्टया लावून झाकलेल्या,घट्ट बांधून बधीर केलेल्या वेदना,लपवलेल्या जखमा,आपली दु:खं त्याला बरी करायची आहेत,पण त्या पट्टयांनीच तर वाचवलं ना आपल्याला आत्तापर्यंत ! आपण सहजासहजी सोडणार थोडीच! आरडाओरडा,नकार,पळापळ करणारच ! मग निसर्ग आपली स्ट्रॅटेजी वापरतो,एखादा आजार,संकट,शत्रू,ट्रिगर करणारी माणसं,उधवस्त करणा-या घटना ... 

आता अडकलो ! बरीच वर्ष टाळूनही दातांच्या डाॅक्टरांच्या खुर्चीत कधीतरी बसावंच लागतं तशी वेळ !आता निसर्ग म्हणतो, किती वेळ वाया घालवलास तुझा आणि माझा ! कशाला ईतकं भोगलंस ?ही वेदना एकदाच सहन करायची होतीस,न पळता ! मग तू कधीच मुक्त झाला असतास.

एकदाच असं मरायचं की मरणातून बाहेर पडायचं,हे जमलं की मोक्ष होतो ना तसं !

आपण प्रथमच भेटतो वेदनेला,कितीही झालं तरी आपल्याच जखमा,नातंच ना एक,आपण स्विकारतो,जवळ घेतो,समजून घेतो,थोडं बोलतो,थोडं ऐकतो आणि अश्रूच्या धारांनी न्हाऊन निघतो.वेदना संपते,भीती संपते आणि विनाकारण धावत पळत थकलेला जीव विसावतो.

निसर्गाचं काम झालेलं असतं,आपण आपल्या नाकारलेल्या वेदनेला स्विकारुन बरं केलेलं असतं आणि पुर्ण संपुर्ण झालेले असतो.

मोक्ष म्हणतात तो हाच, नाही का?