शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

हरिपाठातला 'हा' अभंग म्हणजे अध्यात्माशी संबंधित आपल्या पडणाऱ्या प्रश्नांची माउलींनी दिलेली उत्तरंच आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:26 IST

आजही अनेक घरात हरिपाठ नित्यनेमाने म्हटला जातो, त्यातील शब्दरचनेकडे डोळसपणे पाहिले असता अध्यात्माची उकल सहज होऊ शकेल. 

>> समीर सुनिल तुर्की, आळंदी 

श्रीमाऊलींच्या प्रत्येक रचनेत काही न काही नवलच सापडतं.. अगदी प्रत्येक वेळी...अर्थात ते ह्याआधीही अनेकांना सापडलं असेलच.. अगदी खात्रीशीर, निःसंशय..रात्री सहज हरिपाठ म्हणत असतांना एक अशीच फोड अनुभवायला मिळाली. श्रीमाउलींनी सर्वसामान्य लोकांना धर्म सांगितला, शिकवला, रुजवला तो किती सहज सुलभ आणि अत्यंत विशुध्द प्रकारचा आहे हे वेगळं सांगायला नकोच. मुळातच हा सगळाच पूर्णतः वेगळा आणि संशोधन व अभ्यासाचा विषय होऊच शकतो.

केवळ साधना करा असं न सांगता पाठोपाठ त्याचं फळ काय आहे हेसुद्धा नकळतपणे सांगणाऱ्या श्रीमाऊलींच्या एकमेवाद्वितीय कवित्वाची प्रचिती नव्याने अनुभवणं हेच मुळी एका वेगळ्या लेव्हलच सुख आहे.

माऊलींनी हरिपाठात साधना काय करावी आणि फळ काय मिळेल हे प्रत्येक चरणात पूर्वार्धात साधना आणि उत्तरार्धात फळ असे सांगितले आहे. उदाहरण म्हणून... 

१. साधना-देवाचिया द्वारी उभा क्षणभरी। फळ-तेणे मुक्तीचारी साधियेल्या ।।

२. साधना-हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।फळ-पुण्याची गणना कोण करी।।

३. साधना-ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ।फळ-भरला घनदाट हरि दिसे।।

४. साधना-ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।फळ-अनंत जन्मोनी पुण्य होय।।

५. साधना-ज्ञानदेव म्हणे हरीजप करणे।फळ-तुटेल धरणे प्रपंचाचे।।

संपूर्ण हरिपाठ असाच अनेक गूढ, अगम्य ज्ञानाने ओतप्रोत भरलेला आहे. जितकं जास्त चिंतन करता येईल तेवढं उलगडत जाईल..श्रीमाउलींनी पुढच्या जन्मी तरी "मेधावी" बनवावं आणि सेवेतही ठेवावं इतकंच!