शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
2
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
3
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
4
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
5
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
6
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
7
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
8
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
9
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
10
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
11
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
12
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
13
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
14
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
16
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
17
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
18
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
19
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
20
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

Think Positive: अडचणीतून बाहेर पडण्यासाठी भगवान बुद्ध यांनी दाखवला गुप्त मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:05 IST

Think Positive: दु:ख, संकट, अडचणी आल्या की जगण्याची इच्छाच संपून जाते, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला तर?

आपण आणि आपल्या सभोवतालचे सगळेच जण कपाळावर आठ्या, मनात भीती आणि डोक्यावर समस्यांची टांगती तलवार घेऊन वावरत आहोत. या समस्यांचा शेवट होणार आहे की नाही, याची उकल करत आहे भगवान बुद्ध!

एक शेतकरी होता. तो अतिशय मेहनती होता. परंतु काही केल्या अपयश त्याची पाठ सोडेना. त्यामुळे तो दिवसेंदिवस आळशी बनत चालला होता. त्याच्या नैराश्यामुळे घराचीही वाताहत होऊ लागली. बायको मुलांचे हाल होऊ लागले. तो आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडू लागला. 

घरातील परिस्थिती सुधारावी यासाठी त्याने लोकांच्या सांगण्यावरून मांत्रिक तांत्रिकही करून पाहिले, परंतु हाती काहीच लागले नाही. कोणा एकाच्या सांगण्यावरून त्याने पलिकडच्या गावात भगवान बुद्ध यांची भेट घ्यायची ठरवली. 

शेतकरी भगवान बुद्धांना भेटला. त्यांना आपली समस्या सांगितली आणि उपाय विचारला.

भगवान बुद्धांनी सर्व समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि ते नुसते हसले.

शेतकरी आपल्या समस्येवर उपाय मिळेल याची वाट बघत होता. परंतु भगवान काही बोलत नाही पाहून तो चिडला. शेवटी तो म्हणाला, `तुमच्या पेक्षा ते मांत्रिक तांत्रिक तरी बरे, ज्यांनी मला तात्पुरते का होईना उपाय सुचवले. इथे येऊन माझा वेळ वाया गेला. मी आता निघतो.'

असे म्हणत वैतागलेला शेतकरी जायला निघाला, त्यावर भगवान म्हणाले, `प्रत्येकाच्या आयुष्यात ८३ प्रश्न असतातच. तुझ्याही आयुष्यात आहेत. त्यांची उत्तरे मी कदाचित देऊ शकणार नाही. परंतु ८४ व्या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ आहे. ते सांगतो.'

शेतकऱ्याने कान टवकारले आणि हात जोडून बसला.

भगवान म्हणाले, 'आयुष्य समस्याविरहीत होईल ही अपेक्षा ठेवणे, हीच मुळात मोठी समस्या आहे. समस्या येत जात राहतात. त्यांचा विचार करत बसलात आणि ती संपायची वाट बघत बसलात तर आयुष्य संपेल पण समस्या संपणार नाही. म्हणून समस्यांचा विचार सोडला आणि परिस्थितीचा आहे तसा स्वीकार केला, तर आधीच्या ८३ समस्याही कमी अधिक फरकाने नक्की सुटतील. यासाठी प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करा. दुसऱ्याला दोष देणे बंद करा आणि समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. ज्याला अपयश पचवता येते, त्यालाच यश प्राप्त होते.'

भगवान बुद्धांच्या शांत, गंभीर स्वरात मिळालेल्या उत्तरामुळे शेतकरी शांत झाला आणि त्याचा समस्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच पालटून गेला. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी