शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जेवायला बसताना 'पाने घ्या' म्हणतात, ते यासाठीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 20:37 IST

पाने घेतो म्हटल्यावर ताटं वाट्या किंवा प्लास्टिक प्लेट्स घेतल्या जातात. परंतु, जो स्वाद आणि पोषणमूल्य केळीच्या पानांमध्ये आहे, तो कचकड्याच्या भांड्यांमध्ये नाही, हे आपणही मान्य करू. 

जेवण झाले का? हा समाज माध्यमांवर गाजलेला प्रश्न! परंतु ही चौकशी म्हणजे केवळ औपचारिक संभाषणाची सुरुवात. मात्र, पूर्वीच्या काळी अतिथीला आपुलकीने हा प्रश्न विचारला जाई किंबहुना जेवूनच पाठवले जात असे. स्वयंपाक झाला, की लगोलग पाने घेतली जात. ही पाने कोणती? तर केळीची! कारण, दारोदारी केळीचे झाड असल्यामुळे दोन्हीवेळचे जेवण केळीच्या पानावर किंवा पत्रावळींवर होत असे. शास्त्रीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या या पानांना अतिशय महत्त्व होते. मात्र आता पाने घेतो म्हटल्यावर ताटं वाट्या किंवा प्लास्टिक प्लेट्स घेतल्या जातात. परंतु, जो स्वाद आणि पोषणमूल्य पानांमध्ये आहे, तो कचकड्याच्या भांड्यांमध्ये नाही, हे आपणही मान्य करू. 

हेही वाचा : संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात. केळीच्या पानांवर जेवल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.

केळीच्या पानावर जेवण ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. जेवण झाल्यावर केळीची पाने गुरांना खायला दिल्यास त्यांचेही पोट भरते व कचऱ्याच्या ढिगाला आळा घालता येतो. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अनेक पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात . अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. परदेशातील भारतीय उपहारगृहात विशेषकरून केळीच्या पानावर पारंपरिक जेवण वाढले जाते व त्यास पसंतीही मिळते. म्हणून शक्य तेव्हा आपणही केळीच्या पानावर जेवावे आणि जेवणाआधी हे दान पदरात टाकणाऱ्या ईश्वराचे आठवणीने स्मरण करावे. 

हेही वाचा : शांत झोपेसाठी दिशा बदलून पहा.