शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

'हे' दहा संकल्प उजळून टाकतील तुमचे जीवन; दिवसातून दोनदा करा उजळणी! - शिवानी दीदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 07:00 IST

सकारात्मक विचारांमध्ये सकारात्मक गोष्टी घडवण्याचे सामर्थ्य असते. यासाठी पुढील संकल्प-

'सत्य संकल्पाचा दाता' असे आपण म्हणतो, परंतु आपले संकल्प सिद्धीस जावेत यासाठी त्या संकल्पांची आपण उजळणीच करत नाही. दिवसभर उगाळत बसतो, ते केवळ दुःख, उणिवा आणि कठीण परिस्थिती. काय मिळाले नाही याचा विचार करण्यात जे आहे त्याचाही आपल्याला विसर पडतो. म्हणून दिवसभराची नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवसाची सुरुवात आणि शेवट दहा संकल्पांनी करा, असे ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सुचवतात. 

सकारात्मक विचारांमध्ये सकारात्मक गोष्टी घडवण्याचे सामर्थ्य असते. म्हणून कितीही कठीण काळ सुरु असला तरी स्वतःला सकारात्मक ठेवा. कारण वेळ बदलते तशी परिस्थितीसुद्धा बदलते. ही खूणगाठ मनाशी बांधली की अडचणींना सामोरे जाण्याचेही बळ मिळते. यासाठी पुढील संकल्प-

१. मी शक्तिशाली आहे. २. मी नेहमी खुश असतो.  ३. मी निर्भयी आहे . ४. मी शांत आणि स्थिर आहे.  ५. मी निरोगी आहे, मला कसलाही आजार नाही. 

६. माझी सगळी नाती अतूट आहेत.  ७. माझं कुटुंब माझी ताकद आहे.  ८. मी माझं ध्येय गाठणारच.  ९. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करणारच . १०. परमात्म्याचे सुरक्षा कवच माझ्या सभोवती आहे. 

दीदी सांगतात, या दहा संकल्पांची उजळणी करण्यासाठी एक मिनीटांपेक्षाही कमी कालावधी लागतो. या संकलपांमध्ये तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे बदल करू शकता. फक्त त्यात सकारात्मक भाव असायला हवा ही मुख्य अट आहे. रोज सकाळी दिवसाला सामोरे जाताना मेंदूला या दहा संकल्पाची आठवण करून द्या. मेंदू या गोष्टींची नोंद घेतो आणि त्यानुसार तुम्हाला सकारात्मक राहण्याचे बळ देतो. हीच सूचना रात्री झोपण्यापूर्वी करा. शांत मनात विचारांचे पडसाद उमटत असतात. हे विचार सकारात्मकच असायला हवेत. त्यानुसार हे सत्यसंकल्प आयुष्याचा एक भाग बनवा आणि प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या!