शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

'हे' दहा संकल्प उजळून टाकतील तुमचे जीवन; दिवसातून दोनदा करा उजळणी! - शिवानी दीदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 07:00 IST

सकारात्मक विचारांमध्ये सकारात्मक गोष्टी घडवण्याचे सामर्थ्य असते. यासाठी पुढील संकल्प-

'सत्य संकल्पाचा दाता' असे आपण म्हणतो, परंतु आपले संकल्प सिद्धीस जावेत यासाठी त्या संकल्पांची आपण उजळणीच करत नाही. दिवसभर उगाळत बसतो, ते केवळ दुःख, उणिवा आणि कठीण परिस्थिती. काय मिळाले नाही याचा विचार करण्यात जे आहे त्याचाही आपल्याला विसर पडतो. म्हणून दिवसभराची नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवसाची सुरुवात आणि शेवट दहा संकल्पांनी करा, असे ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सुचवतात. 

सकारात्मक विचारांमध्ये सकारात्मक गोष्टी घडवण्याचे सामर्थ्य असते. म्हणून कितीही कठीण काळ सुरु असला तरी स्वतःला सकारात्मक ठेवा. कारण वेळ बदलते तशी परिस्थितीसुद्धा बदलते. ही खूणगाठ मनाशी बांधली की अडचणींना सामोरे जाण्याचेही बळ मिळते. यासाठी पुढील संकल्प-

१. मी शक्तिशाली आहे. २. मी नेहमी खुश असतो.  ३. मी निर्भयी आहे . ४. मी शांत आणि स्थिर आहे.  ५. मी निरोगी आहे, मला कसलाही आजार नाही. 

६. माझी सगळी नाती अतूट आहेत.  ७. माझं कुटुंब माझी ताकद आहे.  ८. मी माझं ध्येय गाठणारच.  ९. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करणारच . १०. परमात्म्याचे सुरक्षा कवच माझ्या सभोवती आहे. 

दीदी सांगतात, या दहा संकल्पांची उजळणी करण्यासाठी एक मिनीटांपेक्षाही कमी कालावधी लागतो. या संकलपांमध्ये तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे बदल करू शकता. फक्त त्यात सकारात्मक भाव असायला हवा ही मुख्य अट आहे. रोज सकाळी दिवसाला सामोरे जाताना मेंदूला या दहा संकल्पाची आठवण करून द्या. मेंदू या गोष्टींची नोंद घेतो आणि त्यानुसार तुम्हाला सकारात्मक राहण्याचे बळ देतो. हीच सूचना रात्री झोपण्यापूर्वी करा. शांत मनात विचारांचे पडसाद उमटत असतात. हे विचार सकारात्मकच असायला हवेत. त्यानुसार हे सत्यसंकल्प आयुष्याचा एक भाग बनवा आणि प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या!