शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्य शरीरात प्रवेश करण्याआधी आत्मा ८४ लक्ष योनीचा प्रवास पूर्ण करतो; पद्मपुराणात मिळतात दाखले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:17 IST

आपला आत्म्याचा प्रवास जाणून घेण्यास तुम्हीदेखील उत्सुक असाल तर ही माहिती नक्की वाचा, मनुष्य देह मिळाल्याचा आनंद दुणावेल!

सनातन धर्माच्या अनेक पुस्तकांमध्ये ८४ लक्ष योनींचा उल्लेख आहे. असे म्हणतात की ८४ लाख जन्मांचा टप्पा ओलांडल्यानंतर सत्कर्माच्या जोरावर मनुष्य देह मिळतो आणि आत्मा मनुष्य रूपात जन्माला येतो. पण या ८४ लाख योनी नेमक्या कशा आहेत? याबद्दल पद्मपुराणात तपशीलवार दिलेले वर्णन जाणून घेऊया. 

८४ लक्ष योनीचे चक्र समजून घेऊ 

पद्म पुराणानुसार, ८४ लाख योनीचा अर्थ ब्रह्मांडात आढळणारे विविध प्रकारचे प्राणी आहेत. या सजीवांना योजिन आणि सन्यावती या दोन भागात विभागले आहे. यासोबतच प्राण्यांचे शरीर थलचर, नभचर आणि जलचर असे ३ भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. पुराणात ९ लाख जलचर, २० लाख झाडे-वनस्पती, ११ लाख कीटक, १० लाख पक्षी, ३० लाख प्राणी आणि ४ लाख देवता, दानव आणि मानव असल्याचे सांगितले आहे. या सर्व मिळून एकूण ८४ लाख योनी तयार होतात.

मानवी योनी शेवटी असते 

नरदेहाला अर्थात मनुष्य देहाला मुक्तीचे दार म्हटले आहे. कारण मानवी देहात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मेंदू आणि विचार करण्यासाठी मन दिले आहे. त्यामुळे बरे वाईट यातला भेद ओळखून पुण्य कर्म करावे आणि या चक्रातून मुक्ती मिळवावी अशी ईश्वरी रचना आहे. तसे झाले नाही तर आत्म्याचा प्रवास पुन्हा सुरु होतो. सुख दुःखाचे सोहळे, पीडा, भय या सगळ्या गोष्टी ८४ लाख देहाच्या प्रवासात पुन्हा सहन कराव्या लागतात. म्हणून हा देह सत्कारणी लावा असे संत कानीकपाळी ओरडून सांगतात. याच गोष्टीला पद्म पुराणाने दुजोरा दिला आहे. 

पद्मपुराणात वर्णन केले आहे

पद्मपुराणात असे म्हटले आहे की जेव्हा आत्मा विहित ८४ लाख योनीचा प्रवास पूर्ण करतो आणि त्याचे कर्म देखील चांगले असते तेव्हा त्याला पितृ किंवा देव योनी प्राप्त होतो. अर्थात ती व्यक्ती मृत्यूनंतर वैकुंठधामला जाते. दुष्ट कर्म करणारा आत्मा पुन्हा ८४ लाख जन्मांत जन्म घेण्यासाठी पाठवला जातो. वेद आणि पुराणांमध्ये याला दुर्गती म्हटले आहे, म्हणजे आत्मा पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, ही परिस्थिती आदर्श मानली जात नाही.

त्यामुळे स्वर्गात जायचे की नरकात हे आपले भाग्य नाही तर आपले कर्म ठरवते हे लक्षात ठेवा आणि नेहमी प्रामाणिकपणे आपले काम करत राहा. कारण आपल्या प्रत्येक कामाची नोंद घेतली जाते. ते नीट केले नाही तर पुन्हा आपल्या आत्म्याला ८४ लक्ष योनीचा प्रवास करावा लागणार हे निश्चित!