शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

कामाख्या देवीचा अपमान हा महादेवांचा अपमान; थट्टा करणे पडू शकते महाग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:08 IST

सद्यस्थितीत राजकीय नेत्यांनी कामाख्या देवीसंदर्भात खळबळजनक विधान केल्यापासून या मंदिराबद्दल चर्चा सुरु आहे. याबाबत पौराणिक संदर्भ पाहणे जास्त गरजेचे आहे. 

शंकर पार्वती यांचे सुंदर नाते जगाला परिचित आहे. त्यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग, प्रेम याचा आदर्श जगासमोर आहे. शंकरांनी देवीला आपले अर्धांग संबोधून अर्धनारीनटेश्वर अशी ओळख निर्माण केली. अशा महादेवांना आपल्या पत्नीचा अपमान झालेला कसा काय सहन होणार? हेच सांगणारी कामाख्या देवीची कथा. 

देवाधिदेव महादेवांचा तिसरा डोळा उघडला तर जगात प्रलय येणार हे आपण यापूर्वीही ऐकले असेल. प्रलय हा केवळ नैसर्गिक नाही तर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रलयंकारी परिस्थिती या आधीही घडून गेल्याचे पौराणिक कथामध्ये आढळते. त्या परिस्थीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणे इष्ट! त्यासाठी जाणून घेऊया कामाख्या देवीचा महिमा!

पुराणानुसार पिता दक्षाच्या यज्ञात पती शिवाचा अपमान झाल्यामुळे सतीने हवनकुंडातच उडी मारली होती, तिचे शरीर भस्मसात झाले आणि तिचे मस्तक बराच काळ महादेव गळ्यात बांधून संतप्त अवस्थेत फिरत होते. त्यांना पत्नीशोकाच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि आत्मभानाची जाणीव करून देण्यासाठी भगवान विष्णूंनी कामाख्या देवीच्या शरीराची ५१ भाग केले. ते भाग जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झाले आणि त्या शक्तीपीठाचे रूपांतर तीर्थक्षेत्रात झाले. यापैकी एक पीठ-आसाममध्ये स्थापन केले गेले, जे सध्याच्या गुहाटीसमोर 'नीलांचल पर्वत' नावाच्या टेकडीवर वसलेले आहे. आणि या शक्तीपीठातून प्रकटलेली देवी "कामाख्या देवी" म्हणून ओळखली जाते. 

कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती नसून तिथे देवीचा योनी अवशेष आहे. त्या अवशेषांची तिथे पूजा होते. पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बुवाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे)..या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते. साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पर्व असते. त्यावेळेस जगातील सर्वात प्राचीन तंत्र मंत्र शाखेचे अनुयायी कामाख्या मंदिरात पूजेला येतात. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात. वाममार्ग साधनेचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.गोरक्षनाथ, इस्माईल जोगी यासारख्या तंत्र उपासकांनी हेच स्थान आपले मानले आहे.अनेक भाविकांसाठी कामाख्या देवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची तिथे नेहमी रीघ लागलेली असते. 

मात्र या देवीच्या पूजेत काहीही बाधा आल्यास, गैरवर्तन घडल्यास देवीचा आणि तिचे पती देवाधिदेव महादेव यांचाही कोप होतो असे भाविक  सांगतात. थट्टेतही देवीच्या बाबतीत कोणतेही चुकीचे वक्तव्य महाग पडू शकते. यासाठी देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि तिची कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करणेच सर्वार्थाने योग्य ठरेल!