शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कामाख्या देवीचा अपमान हा महादेवांचा अपमान; थट्टा करणे पडू शकते महाग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:08 IST

सद्यस्थितीत राजकीय नेत्यांनी कामाख्या देवीसंदर्भात खळबळजनक विधान केल्यापासून या मंदिराबद्दल चर्चा सुरु आहे. याबाबत पौराणिक संदर्भ पाहणे जास्त गरजेचे आहे. 

शंकर पार्वती यांचे सुंदर नाते जगाला परिचित आहे. त्यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग, प्रेम याचा आदर्श जगासमोर आहे. शंकरांनी देवीला आपले अर्धांग संबोधून अर्धनारीनटेश्वर अशी ओळख निर्माण केली. अशा महादेवांना आपल्या पत्नीचा अपमान झालेला कसा काय सहन होणार? हेच सांगणारी कामाख्या देवीची कथा. 

देवाधिदेव महादेवांचा तिसरा डोळा उघडला तर जगात प्रलय येणार हे आपण यापूर्वीही ऐकले असेल. प्रलय हा केवळ नैसर्गिक नाही तर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रलयंकारी परिस्थिती या आधीही घडून गेल्याचे पौराणिक कथामध्ये आढळते. त्या परिस्थीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणे इष्ट! त्यासाठी जाणून घेऊया कामाख्या देवीचा महिमा!

पुराणानुसार पिता दक्षाच्या यज्ञात पती शिवाचा अपमान झाल्यामुळे सतीने हवनकुंडातच उडी मारली होती, तिचे शरीर भस्मसात झाले आणि तिचे मस्तक बराच काळ महादेव गळ्यात बांधून संतप्त अवस्थेत फिरत होते. त्यांना पत्नीशोकाच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि आत्मभानाची जाणीव करून देण्यासाठी भगवान विष्णूंनी कामाख्या देवीच्या शरीराची ५१ भाग केले. ते भाग जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झाले आणि त्या शक्तीपीठाचे रूपांतर तीर्थक्षेत्रात झाले. यापैकी एक पीठ-आसाममध्ये स्थापन केले गेले, जे सध्याच्या गुहाटीसमोर 'नीलांचल पर्वत' नावाच्या टेकडीवर वसलेले आहे. आणि या शक्तीपीठातून प्रकटलेली देवी "कामाख्या देवी" म्हणून ओळखली जाते. 

कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती नसून तिथे देवीचा योनी अवशेष आहे. त्या अवशेषांची तिथे पूजा होते. पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बुवाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे)..या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते. साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पर्व असते. त्यावेळेस जगातील सर्वात प्राचीन तंत्र मंत्र शाखेचे अनुयायी कामाख्या मंदिरात पूजेला येतात. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात. वाममार्ग साधनेचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.गोरक्षनाथ, इस्माईल जोगी यासारख्या तंत्र उपासकांनी हेच स्थान आपले मानले आहे.अनेक भाविकांसाठी कामाख्या देवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची तिथे नेहमी रीघ लागलेली असते. 

मात्र या देवीच्या पूजेत काहीही बाधा आल्यास, गैरवर्तन घडल्यास देवीचा आणि तिचे पती देवाधिदेव महादेव यांचाही कोप होतो असे भाविक  सांगतात. थट्टेतही देवीच्या बाबतीत कोणतेही चुकीचे वक्तव्य महाग पडू शकते. यासाठी देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि तिची कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करणेच सर्वार्थाने योग्य ठरेल!