शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

कामाख्या देवीचा अपमान हा महादेवांचा अपमान; थट्टा करणे पडू शकते महाग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:08 IST

सद्यस्थितीत राजकीय नेत्यांनी कामाख्या देवीसंदर्भात खळबळजनक विधान केल्यापासून या मंदिराबद्दल चर्चा सुरु आहे. याबाबत पौराणिक संदर्भ पाहणे जास्त गरजेचे आहे. 

शंकर पार्वती यांचे सुंदर नाते जगाला परिचित आहे. त्यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग, प्रेम याचा आदर्श जगासमोर आहे. शंकरांनी देवीला आपले अर्धांग संबोधून अर्धनारीनटेश्वर अशी ओळख निर्माण केली. अशा महादेवांना आपल्या पत्नीचा अपमान झालेला कसा काय सहन होणार? हेच सांगणारी कामाख्या देवीची कथा. 

देवाधिदेव महादेवांचा तिसरा डोळा उघडला तर जगात प्रलय येणार हे आपण यापूर्वीही ऐकले असेल. प्रलय हा केवळ नैसर्गिक नाही तर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रलयंकारी परिस्थिती या आधीही घडून गेल्याचे पौराणिक कथामध्ये आढळते. त्या परिस्थीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणे इष्ट! त्यासाठी जाणून घेऊया कामाख्या देवीचा महिमा!

पुराणानुसार पिता दक्षाच्या यज्ञात पती शिवाचा अपमान झाल्यामुळे सतीने हवनकुंडातच उडी मारली होती, तिचे शरीर भस्मसात झाले आणि तिचे मस्तक बराच काळ महादेव गळ्यात बांधून संतप्त अवस्थेत फिरत होते. त्यांना पत्नीशोकाच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि आत्मभानाची जाणीव करून देण्यासाठी भगवान विष्णूंनी कामाख्या देवीच्या शरीराची ५१ भाग केले. ते भाग जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झाले आणि त्या शक्तीपीठाचे रूपांतर तीर्थक्षेत्रात झाले. यापैकी एक पीठ-आसाममध्ये स्थापन केले गेले, जे सध्याच्या गुहाटीसमोर 'नीलांचल पर्वत' नावाच्या टेकडीवर वसलेले आहे. आणि या शक्तीपीठातून प्रकटलेली देवी "कामाख्या देवी" म्हणून ओळखली जाते. 

कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती नसून तिथे देवीचा योनी अवशेष आहे. त्या अवशेषांची तिथे पूजा होते. पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बुवाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे)..या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते. साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पर्व असते. त्यावेळेस जगातील सर्वात प्राचीन तंत्र मंत्र शाखेचे अनुयायी कामाख्या मंदिरात पूजेला येतात. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात. वाममार्ग साधनेचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.गोरक्षनाथ, इस्माईल जोगी यासारख्या तंत्र उपासकांनी हेच स्थान आपले मानले आहे.अनेक भाविकांसाठी कामाख्या देवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची तिथे नेहमी रीघ लागलेली असते. 

मात्र या देवीच्या पूजेत काहीही बाधा आल्यास, गैरवर्तन घडल्यास देवीचा आणि तिचे पती देवाधिदेव महादेव यांचाही कोप होतो असे भाविक  सांगतात. थट्टेतही देवीच्या बाबतीत कोणतेही चुकीचे वक्तव्य महाग पडू शकते. यासाठी देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि तिची कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करणेच सर्वार्थाने योग्य ठरेल!