शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

कामाख्या देवीचा अपमान हा महादेवांचा अपमान; थट्टा करणे पडू शकते महाग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:08 IST

सद्यस्थितीत राजकीय नेत्यांनी कामाख्या देवीसंदर्भात खळबळजनक विधान केल्यापासून या मंदिराबद्दल चर्चा सुरु आहे. याबाबत पौराणिक संदर्भ पाहणे जास्त गरजेचे आहे. 

शंकर पार्वती यांचे सुंदर नाते जगाला परिचित आहे. त्यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग, प्रेम याचा आदर्श जगासमोर आहे. शंकरांनी देवीला आपले अर्धांग संबोधून अर्धनारीनटेश्वर अशी ओळख निर्माण केली. अशा महादेवांना आपल्या पत्नीचा अपमान झालेला कसा काय सहन होणार? हेच सांगणारी कामाख्या देवीची कथा. 

देवाधिदेव महादेवांचा तिसरा डोळा उघडला तर जगात प्रलय येणार हे आपण यापूर्वीही ऐकले असेल. प्रलय हा केवळ नैसर्गिक नाही तर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रलयंकारी परिस्थिती या आधीही घडून गेल्याचे पौराणिक कथामध्ये आढळते. त्या परिस्थीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणे इष्ट! त्यासाठी जाणून घेऊया कामाख्या देवीचा महिमा!

पुराणानुसार पिता दक्षाच्या यज्ञात पती शिवाचा अपमान झाल्यामुळे सतीने हवनकुंडातच उडी मारली होती, तिचे शरीर भस्मसात झाले आणि तिचे मस्तक बराच काळ महादेव गळ्यात बांधून संतप्त अवस्थेत फिरत होते. त्यांना पत्नीशोकाच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि आत्मभानाची जाणीव करून देण्यासाठी भगवान विष्णूंनी कामाख्या देवीच्या शरीराची ५१ भाग केले. ते भाग जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झाले आणि त्या शक्तीपीठाचे रूपांतर तीर्थक्षेत्रात झाले. यापैकी एक पीठ-आसाममध्ये स्थापन केले गेले, जे सध्याच्या गुहाटीसमोर 'नीलांचल पर्वत' नावाच्या टेकडीवर वसलेले आहे. आणि या शक्तीपीठातून प्रकटलेली देवी "कामाख्या देवी" म्हणून ओळखली जाते. 

कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती नसून तिथे देवीचा योनी अवशेष आहे. त्या अवशेषांची तिथे पूजा होते. पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बुवाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे)..या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते. साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पर्व असते. त्यावेळेस जगातील सर्वात प्राचीन तंत्र मंत्र शाखेचे अनुयायी कामाख्या मंदिरात पूजेला येतात. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात. वाममार्ग साधनेचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.गोरक्षनाथ, इस्माईल जोगी यासारख्या तंत्र उपासकांनी हेच स्थान आपले मानले आहे.अनेक भाविकांसाठी कामाख्या देवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची तिथे नेहमी रीघ लागलेली असते. 

मात्र या देवीच्या पूजेत काहीही बाधा आल्यास, गैरवर्तन घडल्यास देवीचा आणि तिचे पती देवाधिदेव महादेव यांचाही कोप होतो असे भाविक  सांगतात. थट्टेतही देवीच्या बाबतीत कोणतेही चुकीचे वक्तव्य महाग पडू शकते. यासाठी देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि तिची कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करणेच सर्वार्थाने योग्य ठरेल!