शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

तुमच्या मनातील अहंकार हेच तुमच्या अस्वस्थतेचे आणि अशांतीचे कारण आहे! - ओशो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 08:00 IST

अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे.

आपण मनाशी नेहमी असा विचार करत असतो की इतर कुणी तरी मला अशांत करत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या ट्रॅफिकचा आवाज, चहुकडे खेळणाऱ्या मुलांचा कलकलाट, स्वयंपाकघरात काम करणारी पत्नी प्रत्येक जण तुम्हाला अशानत करत असतो. पण हे खरे नव्हे. तुम्हाला कुशीही अशांत करू शकत नाही. तुम्ही स्वत:च अशांतीचे कारण आहात. तुम्ही अस्तित्वात असल्याने कुणीही काहीही तुम्हाला अशांत करू शकते. तुम्ही अवस्थितच नसाल तर अशांती येईल आणि अंतातील रित्ततेला स्पर्शही न करता निघून जाईल. पण तुम्ही असे असता, की सगळे काही तुम्हाला फार लवकर स्पर्श करते. जणू कसल्याही गोष्टीचा घाव पडतो. जखम होते. लगेच तुम्हाला लागते. 

मी इथे बोलतोय. जर इथे कुणीच नसेल, तर मी बोलत राहिलो तरी आवाज निर्माण होणार नाही. पण मी आवज निर्माण करू शकतो. कारण मी स्वत: तरी आवाज ऐकतोच. जर ऐकायला कुणीच नसेल, अगदी मी ही नसेन. नामरुपात्मक मी विलीन होऊन अंतरात रिक्तता असेल. तर आवाज निर्माण होणार नाही. कारण आवाज ही तुमच्या कानांची प्रतिक्रिया आहे. 

खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे. ही तुमची व्याख्या आहे. कधी कोणत्या तरी दुसऱ्या स्थितीत, तुम्ही त्याच गोष्टीचा आनंद अनुभवू शकता. त्या वेळी तीच गोष्ट अशांती वाटणार नाही. मन आनंदी असेल, तेव्हा एखाद्या संगीताबद्दल म्हणाल, हे किती छान संगीत आहे. पण मन उदास असेल तर सुश्राव्य संगीतदेखील अशांतीचा अनुभव देईल. 

जर तुम्ही उरलाच नाही, तर मग फक्त अवकाश उरेल. एक शून्य, रिकामी अवस्था असेल. आत कुणी नाहीच म्हटल्यावर प्रतिक्रिया कशी उमटणार? कोण प्रत्युत्तर देणार? ही रिक्त अवस्था अनुभवून पहा. कोणत्याही निष्क्रिय अवस्थेत बसा. काहीही करू नका. निष्क्रियपणे बसाल, ध्यान करू लागाल, तेव्हा क्रिया करणारा मी कर्ता हा अहंभाव राहत नाही. जेव्हा अहंभाव लोप पावेल, तेव्हा अशांतीचे कारणच राहणार नाही.