शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तुमच्या मनातील अहंकार हेच तुमच्या अस्वस्थतेचे आणि अशांतीचे कारण आहे! - ओशो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 08:00 IST

अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे.

आपण मनाशी नेहमी असा विचार करत असतो की इतर कुणी तरी मला अशांत करत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या ट्रॅफिकचा आवाज, चहुकडे खेळणाऱ्या मुलांचा कलकलाट, स्वयंपाकघरात काम करणारी पत्नी प्रत्येक जण तुम्हाला अशानत करत असतो. पण हे खरे नव्हे. तुम्हाला कुशीही अशांत करू शकत नाही. तुम्ही स्वत:च अशांतीचे कारण आहात. तुम्ही अस्तित्वात असल्याने कुणीही काहीही तुम्हाला अशांत करू शकते. तुम्ही अवस्थितच नसाल तर अशांती येईल आणि अंतातील रित्ततेला स्पर्शही न करता निघून जाईल. पण तुम्ही असे असता, की सगळे काही तुम्हाला फार लवकर स्पर्श करते. जणू कसल्याही गोष्टीचा घाव पडतो. जखम होते. लगेच तुम्हाला लागते. 

मी इथे बोलतोय. जर इथे कुणीच नसेल, तर मी बोलत राहिलो तरी आवाज निर्माण होणार नाही. पण मी आवज निर्माण करू शकतो. कारण मी स्वत: तरी आवाज ऐकतोच. जर ऐकायला कुणीच नसेल, अगदी मी ही नसेन. नामरुपात्मक मी विलीन होऊन अंतरात रिक्तता असेल. तर आवाज निर्माण होणार नाही. कारण आवाज ही तुमच्या कानांची प्रतिक्रिया आहे. 

खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे. ही तुमची व्याख्या आहे. कधी कोणत्या तरी दुसऱ्या स्थितीत, तुम्ही त्याच गोष्टीचा आनंद अनुभवू शकता. त्या वेळी तीच गोष्ट अशांती वाटणार नाही. मन आनंदी असेल, तेव्हा एखाद्या संगीताबद्दल म्हणाल, हे किती छान संगीत आहे. पण मन उदास असेल तर सुश्राव्य संगीतदेखील अशांतीचा अनुभव देईल. 

जर तुम्ही उरलाच नाही, तर मग फक्त अवकाश उरेल. एक शून्य, रिकामी अवस्था असेल. आत कुणी नाहीच म्हटल्यावर प्रतिक्रिया कशी उमटणार? कोण प्रत्युत्तर देणार? ही रिक्त अवस्था अनुभवून पहा. कोणत्याही निष्क्रिय अवस्थेत बसा. काहीही करू नका. निष्क्रियपणे बसाल, ध्यान करू लागाल, तेव्हा क्रिया करणारा मी कर्ता हा अहंभाव राहत नाही. जेव्हा अहंभाव लोप पावेल, तेव्हा अशांतीचे कारणच राहणार नाही.