शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

संकट सांगून येत नाही; प्रत्येक संकटाची पूर्वतयारी केली पाहिजे अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 4:22 PM

भविष्यात येणारी अन्न, पाणी, निसर्ग, इ. संकटं आपल्याला कळत आहेत, पण आपण त्याकडे डोळेझाक करत आहोत. त्याचे दुष्परिणाम भोगायचे नसतील तर वेळीच सावध व्हा! वाचा ही कथा!

आपल्या सगळ्या गोष्टी अगदी ऐन वेळेवर सुचतात. एवढेच काय, तर परीक्षेत पेपरचे तीन तास संपत आले की शेवटच्या पाच मिनीटात आपली ज्ञानगंगा दुथडी भरून वाहू लागते. पण तेव्हा फार उशीर झालेला असता़े बरेच काही येऊनसुद्धा, आठवूनसुद्धा पेपर हिसकावून घेतला जातो. परंतु, शालेय परीक्षा परत देता येईलही, मात्र आयुष्यातल्या परीक्षेत नापास झालो, तर वारंवार संधी मिलत नाही. म्हणून युद्ध सुरू झाले, की तयारी करू ही वृत्ती सोडून शांततेच्या काळात युद्ध कधीही झाले तरी आपण शस्त्रसज्ज कसे असू यावर भर दिला पाहिजे. अर्थात संकटांशी लढण्याची सर्वतोपरी तयारी केली पाहिजे. 

एक शेतकरी होता. तो वयोवृद्ध होता. त्याला शेतकामासाठी मजूर हवे होते. तो त्यांना चांगला पगार द्यायलाही कबूल होता. परंतु त्याचे शेत अशा ठिकाणी होते, जिथे सतत वादळसदृश्य परिस्थिती असे. त्यामुळे कितीही मेहनत केली, तरी त्यावर पाणी फिरत असे. ही बाब लक्षात घेऊन अनेक मजूरांनी तिथले काम अर्धवट सोडले होते.

शेतकऱ्याला मात्र जमीन वाऱ्यावर टाकून चालणार नव्हते. त्याने वर्तमानपत्रात बातमी दिली आणि कामासाठी होतकरू तरुण हवा आहे, योग्य मोबदला दिला जाईल असे म्हटले. बातमी वाचून एक गरजू तरुण शेतकऱ्याला येऊन भेटला. शेतकऱ्याने आधीच परिस्थितीचे वर्णन करून सांगितले. यावर तरुण म्हणाला, `हरकत नाही, मी काम करायला तयार आहे. फक्त माझी एक अडचण आहे. वाऱ्याची झुळूक आली, की मला गाढ झोप लागते. एरव्ही मी सतर्क असतो. तुमच्या कामात मी अडचण येऊ देणार नाही, तुम्ही माझ्या झोपेत अडचण येऊ देऊ नका.'

शेतकऱ्याने त्याला संधी द्यायचे ठरवले. तरुण मुलगा मन लावून काम करत होता. एक दिवस वादळ आले. शेतकरी लगबगीने तरुणाला बोलवायला गेला. तर तरुण गाढ झोपला होता. शेतकरी त्याला गदागदा हलवून उठवत होता. तरुण म्हणाला, माझी अट विसरलात का बुवा?'

`याला नंतर बघून घेतो, आधी माझे शेत पाहतो' असे म्हणत शेतकरी रागारागात शेतावर गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, सगळ्या पिकांची व्यवस्थित बांधणी केली होती. कोंबड्यांना नीट झाकून ठेवले होते. कोठाराचे दार घट्ट बंद केले होते. ते पाहून शेतकऱ्याला तरुणाचे बोल आठवले, `वारा आला की झोप लागते' याचा अर्थ त्याला परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने संकटाआधीच बचावाची पूर्वतयारी करून ठेवली होती. शेतकरी त्याच्यावर खुष झाला आणि त्याला दुप्पट पगार बक्षीस म्हणून दिला. 

आपणही आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसाठी, बचावकार्य आधीच करून ठेवले, तर संकटाला तोंड देणे किती सोपे होईल नाही? तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागेल म्हणून विहीर खोदून ठेवणे केव्हाही चांगले!