शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तानसेन यांनी दाखवून दिला, स्वार्थ आणि परमार्थ यातला फरक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:13 IST

स्वार्थासाठी केलेल्या गोष्टी आणि स्वान्तसुखाय केलेल्या गोष्टी यात पुष्कळ फरक आहे. तो कोणता, हे तानसेन यांनी एका प्रसंगातून दाखवून दिले आहे.

अकबर बादशहाच्या दरबारात नवरत्नांची खाण होती. त्यातलेच एक रत्न म्हणजे गायक तानसेन. त्यांच्या गायनात एवढी ताकद होती, की मल्हार रागाचे सूर आळवताच आभाळ दाटून येई आणि दीप राग गायल्यावर दीप प्रज्वलित होई, असे म्हणतात. तानसेनाचं दैवी गाणं ऐकून जेव्हा जेव्हा अकबर मंत्रमुग्ध व्हायचा, तेव्हा तेव्हा तानसेन विनम्रपणे सांगत, माझ्या गुरूंपुढे मी काहीच नाही.

अकबर बादशहाला कुतूहल वाटे, तानसेनचे गाणे एवढे मंत्रमुग्ध करते, तर त्याच्या गुरुंचे गाणे किती श्रेष्ठ असेल. तानसेनच्या म्हणण्यानुसार, त्याझ्या गुरूंच्या गायनापुढे तानसेनचे गायन म्हणजे सूर्यापुढे पणती.

हेही वाचा : ध्येयविरहित जीवन म्हणजे पत्त्याशिवाय पाठवलेले पत्र- व.पु.काळे

एवढे कौतुक ऐकल्यावर अकबर बादशहाने सांगितले, तानसेन, आता मला तुझ्या गुरुंचे गायन ऐकायची तीव्र इच्छा आहे. तुझ्या गुरूंची जी काही बिदागी असेल, ती आपण देऊ. पण काहीही करून एकदा तरी त्यांना आपल्या दरबारात गायन सादर करण्यासाठी आमंत्रित कर.'

यावर तानसेन म्हणाला, 'जहाँपनाह, माझे गुरु मैफली सजवत नाहीत. त्यांचे गाणे स्वच्छंदी आहे. मुक्त आहे. स्वान्तसुखाय आहे. आपल्या बोलावण्याने ते गाणे सादर करतील, असे वाटत नाही.'

अकबर म्हणाला, 'मग त्यांची जी काही गाण्याची वेळ असेल, त्यावेळी जाऊन आपण गाणे ऐकू.'

तानसेन म्हणाला, त्यांची अशी ठराविक वेळ नसते. त्यांना वाटलं की ते गातात. ते कोणाहीसाठी गात नाहीत.

अकबराने विचारले, मग त्यांचं गाणं ऐकायचं कसं?

बादशहाची तीव्र इच्छा पाहून एक दिवस तानसेन बादशहाला घेऊन गुरुदेवांच्या झोपडीजवळ गेला. दिवसभर दोघेही तिथे मुक्काम ठोकून होते. गुरुजींच्या नकळत गाणे ऐकता यावे, यासाठी लपून बसले होते. संपूर्ण दिवस गेला, परंतु गुरुजींचे सुर कानावर पडले नाहीत. बादशहा अस्वस्थ झाला. तानसेनाने त्याला आणखी काही काळ थांबण्याची विनंती केली. अपेक्षेप्रमाणे गुरुजींनी मध्यरात्रीच्या प्रहरातल्या रागाचे सूर आळवले. ते दैवी गाणे ऐकताना बादशहा आणि तानसेन यांचे भान हरपले. पहाटे पर्यंत गुरुजींचे गाणे सुरू होते. आणि ते जेव्हा थांबले, तेव्हा अकबर जणू वेगळ्याच विश्वातून जमिनीवर परत आला. आकंठ तृप्त मनाने दोघेही एकमेकांशी चकार शब्द न बोलता राजवाड्यापर्यंत आले.गुरुजींचे गाणे मनात काठोकाठ व्यापले होते. अकबराने तानसेनाला विचारले, तूही गातोस. तेही गातात. तुझं गाणं अद्वितीय आहे. पण, त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. हा फरक कशामुळे?

तानसेन म्हणाला, मी काहीतरी मिळावे म्हणून गातो. ते काहीतरी मिळाले आहे, ते वाटून टाकल्याशिवाय राहवत नाही, म्हणून गातात. माझे गाणे स्वार्थाचे आहे, तर गुरुजींचे गाणे परमार्थाचे आहे. 

हेही वाचा : "नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज