शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

तानसेन यांनी दाखवून दिला, स्वार्थ आणि परमार्थ यातला फरक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:13 IST

स्वार्थासाठी केलेल्या गोष्टी आणि स्वान्तसुखाय केलेल्या गोष्टी यात पुष्कळ फरक आहे. तो कोणता, हे तानसेन यांनी एका प्रसंगातून दाखवून दिले आहे.

अकबर बादशहाच्या दरबारात नवरत्नांची खाण होती. त्यातलेच एक रत्न म्हणजे गायक तानसेन. त्यांच्या गायनात एवढी ताकद होती, की मल्हार रागाचे सूर आळवताच आभाळ दाटून येई आणि दीप राग गायल्यावर दीप प्रज्वलित होई, असे म्हणतात. तानसेनाचं दैवी गाणं ऐकून जेव्हा जेव्हा अकबर मंत्रमुग्ध व्हायचा, तेव्हा तेव्हा तानसेन विनम्रपणे सांगत, माझ्या गुरूंपुढे मी काहीच नाही.

अकबर बादशहाला कुतूहल वाटे, तानसेनचे गाणे एवढे मंत्रमुग्ध करते, तर त्याच्या गुरुंचे गाणे किती श्रेष्ठ असेल. तानसेनच्या म्हणण्यानुसार, त्याझ्या गुरूंच्या गायनापुढे तानसेनचे गायन म्हणजे सूर्यापुढे पणती.

हेही वाचा : ध्येयविरहित जीवन म्हणजे पत्त्याशिवाय पाठवलेले पत्र- व.पु.काळे

एवढे कौतुक ऐकल्यावर अकबर बादशहाने सांगितले, तानसेन, आता मला तुझ्या गुरुंचे गायन ऐकायची तीव्र इच्छा आहे. तुझ्या गुरूंची जी काही बिदागी असेल, ती आपण देऊ. पण काहीही करून एकदा तरी त्यांना आपल्या दरबारात गायन सादर करण्यासाठी आमंत्रित कर.'

यावर तानसेन म्हणाला, 'जहाँपनाह, माझे गुरु मैफली सजवत नाहीत. त्यांचे गाणे स्वच्छंदी आहे. मुक्त आहे. स्वान्तसुखाय आहे. आपल्या बोलावण्याने ते गाणे सादर करतील, असे वाटत नाही.'

अकबर म्हणाला, 'मग त्यांची जी काही गाण्याची वेळ असेल, त्यावेळी जाऊन आपण गाणे ऐकू.'

तानसेन म्हणाला, त्यांची अशी ठराविक वेळ नसते. त्यांना वाटलं की ते गातात. ते कोणाहीसाठी गात नाहीत.

अकबराने विचारले, मग त्यांचं गाणं ऐकायचं कसं?

बादशहाची तीव्र इच्छा पाहून एक दिवस तानसेन बादशहाला घेऊन गुरुदेवांच्या झोपडीजवळ गेला. दिवसभर दोघेही तिथे मुक्काम ठोकून होते. गुरुजींच्या नकळत गाणे ऐकता यावे, यासाठी लपून बसले होते. संपूर्ण दिवस गेला, परंतु गुरुजींचे सुर कानावर पडले नाहीत. बादशहा अस्वस्थ झाला. तानसेनाने त्याला आणखी काही काळ थांबण्याची विनंती केली. अपेक्षेप्रमाणे गुरुजींनी मध्यरात्रीच्या प्रहरातल्या रागाचे सूर आळवले. ते दैवी गाणे ऐकताना बादशहा आणि तानसेन यांचे भान हरपले. पहाटे पर्यंत गुरुजींचे गाणे सुरू होते. आणि ते जेव्हा थांबले, तेव्हा अकबर जणू वेगळ्याच विश्वातून जमिनीवर परत आला. आकंठ तृप्त मनाने दोघेही एकमेकांशी चकार शब्द न बोलता राजवाड्यापर्यंत आले.गुरुजींचे गाणे मनात काठोकाठ व्यापले होते. अकबराने तानसेनाला विचारले, तूही गातोस. तेही गातात. तुझं गाणं अद्वितीय आहे. पण, त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. हा फरक कशामुळे?

तानसेन म्हणाला, मी काहीतरी मिळावे म्हणून गातो. ते काहीतरी मिळाले आहे, ते वाटून टाकल्याशिवाय राहवत नाही, म्हणून गातात. माझे गाणे स्वार्थाचे आहे, तर गुरुजींचे गाणे परमार्थाचे आहे. 

हेही वाचा : "नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज