शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तानसेन यांनी दाखवून दिला, स्वार्थ आणि परमार्थ यातला फरक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:13 IST

स्वार्थासाठी केलेल्या गोष्टी आणि स्वान्तसुखाय केलेल्या गोष्टी यात पुष्कळ फरक आहे. तो कोणता, हे तानसेन यांनी एका प्रसंगातून दाखवून दिले आहे.

अकबर बादशहाच्या दरबारात नवरत्नांची खाण होती. त्यातलेच एक रत्न म्हणजे गायक तानसेन. त्यांच्या गायनात एवढी ताकद होती, की मल्हार रागाचे सूर आळवताच आभाळ दाटून येई आणि दीप राग गायल्यावर दीप प्रज्वलित होई, असे म्हणतात. तानसेनाचं दैवी गाणं ऐकून जेव्हा जेव्हा अकबर मंत्रमुग्ध व्हायचा, तेव्हा तेव्हा तानसेन विनम्रपणे सांगत, माझ्या गुरूंपुढे मी काहीच नाही.

अकबर बादशहाला कुतूहल वाटे, तानसेनचे गाणे एवढे मंत्रमुग्ध करते, तर त्याच्या गुरुंचे गाणे किती श्रेष्ठ असेल. तानसेनच्या म्हणण्यानुसार, त्याझ्या गुरूंच्या गायनापुढे तानसेनचे गायन म्हणजे सूर्यापुढे पणती.

हेही वाचा : ध्येयविरहित जीवन म्हणजे पत्त्याशिवाय पाठवलेले पत्र- व.पु.काळे

एवढे कौतुक ऐकल्यावर अकबर बादशहाने सांगितले, तानसेन, आता मला तुझ्या गुरुंचे गायन ऐकायची तीव्र इच्छा आहे. तुझ्या गुरूंची जी काही बिदागी असेल, ती आपण देऊ. पण काहीही करून एकदा तरी त्यांना आपल्या दरबारात गायन सादर करण्यासाठी आमंत्रित कर.'

यावर तानसेन म्हणाला, 'जहाँपनाह, माझे गुरु मैफली सजवत नाहीत. त्यांचे गाणे स्वच्छंदी आहे. मुक्त आहे. स्वान्तसुखाय आहे. आपल्या बोलावण्याने ते गाणे सादर करतील, असे वाटत नाही.'

अकबर म्हणाला, 'मग त्यांची जी काही गाण्याची वेळ असेल, त्यावेळी जाऊन आपण गाणे ऐकू.'

तानसेन म्हणाला, त्यांची अशी ठराविक वेळ नसते. त्यांना वाटलं की ते गातात. ते कोणाहीसाठी गात नाहीत.

अकबराने विचारले, मग त्यांचं गाणं ऐकायचं कसं?

बादशहाची तीव्र इच्छा पाहून एक दिवस तानसेन बादशहाला घेऊन गुरुदेवांच्या झोपडीजवळ गेला. दिवसभर दोघेही तिथे मुक्काम ठोकून होते. गुरुजींच्या नकळत गाणे ऐकता यावे, यासाठी लपून बसले होते. संपूर्ण दिवस गेला, परंतु गुरुजींचे सुर कानावर पडले नाहीत. बादशहा अस्वस्थ झाला. तानसेनाने त्याला आणखी काही काळ थांबण्याची विनंती केली. अपेक्षेप्रमाणे गुरुजींनी मध्यरात्रीच्या प्रहरातल्या रागाचे सूर आळवले. ते दैवी गाणे ऐकताना बादशहा आणि तानसेन यांचे भान हरपले. पहाटे पर्यंत गुरुजींचे गाणे सुरू होते. आणि ते जेव्हा थांबले, तेव्हा अकबर जणू वेगळ्याच विश्वातून जमिनीवर परत आला. आकंठ तृप्त मनाने दोघेही एकमेकांशी चकार शब्द न बोलता राजवाड्यापर्यंत आले.गुरुजींचे गाणे मनात काठोकाठ व्यापले होते. अकबराने तानसेनाला विचारले, तूही गातोस. तेही गातात. तुझं गाणं अद्वितीय आहे. पण, त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. हा फरक कशामुळे?

तानसेन म्हणाला, मी काहीतरी मिळावे म्हणून गातो. ते काहीतरी मिळाले आहे, ते वाटून टाकल्याशिवाय राहवत नाही, म्हणून गातात. माझे गाणे स्वार्थाचे आहे, तर गुरुजींचे गाणे परमार्थाचे आहे. 

हेही वाचा : "नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज