शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

आपल्या माणसांची काळजी घ्या कारण तेच तुमच्या पाठीशी सदैव असणार आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:07 IST

आयुष्यात अशी माणसे जोडा जी जगाने पाठ फिरवली तरी ती तुमच्या पाठीशी कायम उभी राहतील!

दमलेल्या बाबांची कहाणी तर घरोघरी ऐकायला मिळते. पण या दमलेल्या बाबांच्या मुलांची कहाणी सुद्धा दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. एकूणच घरातले नातेसंबंध दुरावत चालले आहे. ज्या सुखसोयी मिळवण्यासाठी आपण जीवाचे रान करत आहोत, त्या सुखसोयी मिळूनही उपभोगण्यासाठी आपली माणसे मनाने जवळ नसली, तर त्या सुखाचा उपयोग तरी काय? 

असाच एक दमलेला बाबा कामावरून संध्याकाळी घरी येतो. ट्रेनची गर्दी, भांडणं, मारामारी, ऑफिसमध्ये वरिष्ठांची बॉसगिरी, सहकाऱ्याच्या कुरबुरी अशा सगळ्या परिस्थितीतून दमून भागून घरी पोहोचतो. मुलगा दार उघडतो आणि बाबांना पाहताच घट्ट मिठी मारतो. वैतागलेला बाबा त्याला दूर करतो आणि हात पाय धुवून पलंगावर पाठ टेकवतो. 

जेवून झाल्यावर मुलगा पुन्हा जवळ येतो आणि बाबांना म्हणतो, 'बाबा तुम्ही रोज किती पैसे कमवता?'वडिलांचा शांत झालेला राग पुन्हा उफाळतो. ते त्याच्या अंगावर ओरडून म्हणतात, 'तुला काय करायचे आहे मी किती कमवतो आणि किती नाही ते? तुला काही कमी तर पडू देत नाही ना, मग झालं. मुकाट्याने जाऊन झोप.'मुलगा म्हणतो, 'बाबा मला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं, की माझ्या पिगी बँक मध्ये किती पैसे जमा झाले की तुम्हाला नोकरी सोडून घरी आराम करता येईल.'

मुलाच्या शब्दांनी वडिलांच्या काळजात घर केलं. त्यांनी मुलाला हृदयाशी घट्ट धरलं. त्याचवेळेस त्याची आई आणि आजी दारात उभे राहून त्या दोघांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. त्याक्षणी दमलेल्या बाबाला जाणीव झाली, की मुलाला मिठी मारून, बायकोशी प्रेम संवाद साधून, आपल्या आईचा सुरकुतलेला हात हातात घेऊन कितीतरी दिवस लोटले. आपण आपल्या काळजीत अडकलेलो असतो, परंतु माझी काळजी करणारे लोक माझ्यापासून दुरावून चालणार नाही. 

आपण या जगासाठी विशेष कोणी नसलो, तरी कोणासाठी आपण त्यांचे जग असतो, ही जाणीव ठेवून त्या प्रेमळ स्पर्शांना पारखे होऊ नका. तेच आपले जग आहे. म्हणून तर आपल्या आवडत्या बाप्पानेही विश्व प्रदक्षिणा मारण्याच्या स्पर्धेत आपल्या आई बाबांना प्रदक्षिणा घालून तेच आपले विश्व आहे, हा आदर्श घालून दिला होता...!