शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 10:26 IST

PM Narendra Modi Vivekananda Rock Meditation: ४५ तास मौन व्रताचरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ नारळ पाणी आणि द्रासाचा रस आहारात घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.

PM Narendra Modi Vivekananda Rock Meditation: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झंझावाती प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट कन्याकुमारी गाठले आणि मौन व्रत तसेच ध्यानसाधनेचा संकल्प केला. ४५ तास नरेंद्र मोदी ध्यानसाधना आणि मौन व्रताचरण करणार आहेत.

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ध्यानधारणा, मौन व्रत याला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनी तसेच संत-महंत मंडळी यांनी ध्यानधारणा, मौन व्रताचे केवळ आचरणच केले नाही, तर त्याचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. ध्यान साधनेत मोठे बळ असते. ध्यानधारणा आणि मौन राहिल्यामुळे अनेक प्रश्नांची उकल आपलीच आपल्याला होऊ शकते. मन एके ठिकाणी शांत चित्त केले की, शांततेत विचार केला जाऊ शकतो. आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. गौतम बुद्धांनीही ध्यान साधना आणि मौन व्रताचरणातून अनेक गोष्टी साध्य केल्याचे सांगितले जाते. ध्यानाचे आणि मौन व्रताचे अनेक फायदे, लाभ सांगितले जातात. 

कन्याकुमारी आणि स्वामी विवेकानंद

गुरु रामकृष्णांकडून संन्यास दीक्षा घेतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी भारतभ्रमण केले. देशातील परिस्थिती याची देही याची डोळा पाहिली. कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. समुद्रात उडी मारली आणि जवळच असलेल्या शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदांत विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांना आपल्या जीवनाचा उद्देश सापडला, असे सांगितले जाते.

नरेंद्र मोदींचा ध्यान साधनेचा संकल्प आणि मौन व्रत

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराच्या ७५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०० पेक्षा जास्त रॅली, तब्बल १८० रोड शो आणि सभा घेतल्या. संपूर्ण भारतभरातील अनेक मतदारसंघात जाऊन जनतेला संबोधित केले. यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक येथे जाऊन ध्यान साधनेला सुरुवात केली. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सायंकाळी ध्यानाला सुरुवात केली. १ जून रोजी सायंकाळपर्यंत नरेंद्र मोदी ध्यान साधना करणार आहेत. ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केले होते, तिथेच पंतप्रधान मोदी ध्यानाला बसले आहेत. 

असा असेल ४५ तासांचा ध्यानकाळ

४५ तासांच्या ध्यानधारणेदरम्यान नरेंद्र मोदी फक्त द्रव आहार घेतील. फक्त नारळ पाणी आणि द्राक्षाचा रस मोदी घेणार आहेत. हे संपूर्ण ४५ तास मोदी मौन व्रतात असणार आहेत. ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी भगवती अम्मान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. कन्याकुमारी देवीची मूर्ती भगवान परशुरामाने ३ हजार वर्षांपूर्वी स्थापन केली होती, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. एखाद्या पंतप्रधानाने देवीचे दर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद