शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Swami Samartha: स्वामी समर्थ अन्नपूर्णेच्या स्वरूपात का? उत्तर सापडते 'या' स्वामी भक्तांच्या कथेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:04 IST

Swami Samartha : गौराईला निरोप देण्याबरोबरच अन्नपूर्णेच्या स्वरूपातील स्वामींचा घेऊया आशीर्वाद; सोबतच वाचा त्यांनी घडवलेला चमत्कार!

१२ सप्टेंबर रोजी भाद्रपद नवमी. या दिवशी गौराईला निरोप दिला जातो, तसेच ही तिथी अदुःख नवमी म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी देवघरातील अन्नपूर्णेची पूजा आणि आशीर्वाद घेतला जातो, तसेच अखंड दीप रात्रभर तेवत ठेवला जातो. या निमित्ताने भक्तांच्या आयुष्यातील दुःख, दैन्य नाश करणाऱ्या स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरूपातील एक चमत्कारिक कथा जाणून घेऊया. 

अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरे नुसार घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले. 

कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला, पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वाना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपादभटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. 

तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केली  तेव्हा महिला म्हणाली, 'आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला. त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा' तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासींनीस आग्रह केला पण ती म्हणाली, ' तुम्ही  पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते.' 

श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास  जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. ती वृद्ध स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही. यावरून श्रीपाद भटांना खात्री पटली, की ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामीच अन्नपूर्णेच्या रूपात आले होते. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच  सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले! म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पुजले जाते. 

यासाठीच स्वामींच्या चरणी अनन्य भावनेने शरण जावे, जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचे निवारण करतील, हे नक्की!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४