शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Swami Samartha: स्वामी समर्थ अन्नपूर्णेच्या स्वरूपात का? उत्तर सापडते 'या' स्वामी भक्तांच्या कथेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:04 IST

Swami Samartha : गौराईला निरोप देण्याबरोबरच अन्नपूर्णेच्या स्वरूपातील स्वामींचा घेऊया आशीर्वाद; सोबतच वाचा त्यांनी घडवलेला चमत्कार!

१२ सप्टेंबर रोजी भाद्रपद नवमी. या दिवशी गौराईला निरोप दिला जातो, तसेच ही तिथी अदुःख नवमी म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी देवघरातील अन्नपूर्णेची पूजा आणि आशीर्वाद घेतला जातो, तसेच अखंड दीप रात्रभर तेवत ठेवला जातो. या निमित्ताने भक्तांच्या आयुष्यातील दुःख, दैन्य नाश करणाऱ्या स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरूपातील एक चमत्कारिक कथा जाणून घेऊया. 

अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरे नुसार घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले. 

कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला, पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वाना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपादभटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. 

तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केली  तेव्हा महिला म्हणाली, 'आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला. त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा' तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासींनीस आग्रह केला पण ती म्हणाली, ' तुम्ही  पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते.' 

श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास  जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. ती वृद्ध स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही. यावरून श्रीपाद भटांना खात्री पटली, की ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामीच अन्नपूर्णेच्या रूपात आले होते. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच  सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले! म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पुजले जाते. 

यासाठीच स्वामींच्या चरणी अनन्य भावनेने शरण जावे, जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचे निवारण करतील, हे नक्की!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४