शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:08 IST

Swami Samartha: स्वामी उपासना कशी करावी याचे धडे स्वामी चरित्रात मिळतात, स्वामींना कोणती गोष्ट आवडते याबाबत भक्ताने कथन केलेला अनुभव वाचा. 

स्वामींवर अपार प्रेम आणि श्रद्धा असलेला प्रत्येक स्वामी भक्त स्वामी कृपा व्हावी म्हणून भक्ती भावाने त्यांना काही न काही अर्पण करत असतो. मग ते फुल असो नाहीतर हिरेजडित हार! यथाशक्ती केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते हे आपण जाणतो. याबाबत स्वामी चरित्रात एका भक्ताने अनुभव सांगितला आहे, कोणता ते जाणून घेऊ. 

स्वामी समर्थांचा एक भक्त, जो बागायतदार होता. त्याच्या फळभागातून होणाऱ्या उत्पन्नामुळे त्याचा संसार सुखाने सुरु होता. आपल्या बागेतली ताजी केळी स्वामींना अर्पण करावी या हेतूने एक दिवस तो केळ्यांचे दोन घड घेऊन स्वामींच्या दर्शनाला निघाला. 

स्वामी दर्शनाला जाताना त्याला विचित्रच अनुभव आला. कधी नव्हे ते त्याच्याकडे केळी मागण्यासाठी भिकारी आले. ते उपाशी असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मात्र स्वामी भक्ताने ताजी केळी स्वामींना अर्पण करायची या भावनेने त्या भिकारी लोकांना दिली नाहीत. कापडाखाली केळ्याचा घड सावरत तो स्वामी दर्शनासाठी पोहोचला. 

तिथे गेल्यावर मात्र स्वामी त्या प्रसादाचा स्वीकार करेना. त्यावेळी बागायतदार काकुळतीला येऊन म्हणाला, स्वामी ताजी केळी तुमच्यासाठी आणली आहेत, तुम्ही याचा स्वीकार करा. 

तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, आता कशाला मला ही केळी देतोस? जेव्हा भुकेला होऊन तुझ्याकडे मी केळी मागत होतो तेव्हा तू मला हाकलून दिलेस आणि आता मला तीच केळी स्वीकारण्यासाठी हट्ट करतोयस?

बागायतदाराला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ उमगला. वाटेत केळी मागणारे लोक हे स्वामींचे अंश होते, ते गरजवंत होते. त्यांना डावलून स्वामींना दिलेला प्रसाद ते कधीच ग्रहण करणार नाहीत हे त्याला उमगले. त्यावेळी त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला, 'माझी चूक मला कळली आहे. माझा भाव सच्चा होता पण तुमची शिकवण मी विसरलो. ज्याला गरज आहे त्याला मदत करणे ही खरी स्वामी सेवा आणि ती तुम्हाला जास्त प्रिय आहे, हे इथून पुढे लक्षात ठेवीन!' 

त्यामुळे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावी ही शिकवण, आपण स्वामींना काय देतोय, यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय आणि कोणत्या परिस्थितीत देतोय, हे पाहणे महत्त्वाचे आहे. देव भावाचा भुकेला आहे, प्रापंचिक वस्तूंचा नाही! देवाला मनोभावे अर्पण केलेलं बिल्व पत्र, तुळशी पत्र सुद्धा पुरेसं आहे. पण त्यामागे भावना शुद्ध हवी आणि कोणाचेही हित न डावलता केलेली भक्ती असावी! 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थ