शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:08 IST

Swami Samartha: स्वामी उपासना कशी करावी याचे धडे स्वामी चरित्रात मिळतात, स्वामींना कोणती गोष्ट आवडते याबाबत भक्ताने कथन केलेला अनुभव वाचा. 

स्वामींवर अपार प्रेम आणि श्रद्धा असलेला प्रत्येक स्वामी भक्त स्वामी कृपा व्हावी म्हणून भक्ती भावाने त्यांना काही न काही अर्पण करत असतो. मग ते फुल असो नाहीतर हिरेजडित हार! यथाशक्ती केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते हे आपण जाणतो. याबाबत स्वामी चरित्रात एका भक्ताने अनुभव सांगितला आहे, कोणता ते जाणून घेऊ. 

स्वामी समर्थांचा एक भक्त, जो बागायतदार होता. त्याच्या फळभागातून होणाऱ्या उत्पन्नामुळे त्याचा संसार सुखाने सुरु होता. आपल्या बागेतली ताजी केळी स्वामींना अर्पण करावी या हेतूने एक दिवस तो केळ्यांचे दोन घड घेऊन स्वामींच्या दर्शनाला निघाला. 

स्वामी दर्शनाला जाताना त्याला विचित्रच अनुभव आला. कधी नव्हे ते त्याच्याकडे केळी मागण्यासाठी भिकारी आले. ते उपाशी असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मात्र स्वामी भक्ताने ताजी केळी स्वामींना अर्पण करायची या भावनेने त्या भिकारी लोकांना दिली नाहीत. कापडाखाली केळ्याचा घड सावरत तो स्वामी दर्शनासाठी पोहोचला. 

तिथे गेल्यावर मात्र स्वामी त्या प्रसादाचा स्वीकार करेना. त्यावेळी बागायतदार काकुळतीला येऊन म्हणाला, स्वामी ताजी केळी तुमच्यासाठी आणली आहेत, तुम्ही याचा स्वीकार करा. 

तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, आता कशाला मला ही केळी देतोस? जेव्हा भुकेला होऊन तुझ्याकडे मी केळी मागत होतो तेव्हा तू मला हाकलून दिलेस आणि आता मला तीच केळी स्वीकारण्यासाठी हट्ट करतोयस?

बागायतदाराला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ उमगला. वाटेत केळी मागणारे लोक हे स्वामींचे अंश होते, ते गरजवंत होते. त्यांना डावलून स्वामींना दिलेला प्रसाद ते कधीच ग्रहण करणार नाहीत हे त्याला उमगले. त्यावेळी त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला, 'माझी चूक मला कळली आहे. माझा भाव सच्चा होता पण तुमची शिकवण मी विसरलो. ज्याला गरज आहे त्याला मदत करणे ही खरी स्वामी सेवा आणि ती तुम्हाला जास्त प्रिय आहे, हे इथून पुढे लक्षात ठेवीन!' 

त्यामुळे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावी ही शिकवण, आपण स्वामींना काय देतोय, यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय आणि कोणत्या परिस्थितीत देतोय, हे पाहणे महत्त्वाचे आहे. देव भावाचा भुकेला आहे, प्रापंचिक वस्तूंचा नाही! देवाला मनोभावे अर्पण केलेलं बिल्व पत्र, तुळशी पत्र सुद्धा पुरेसं आहे. पण त्यामागे भावना शुद्ध हवी आणि कोणाचेही हित न डावलता केलेली भक्ती असावी! 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थ