शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:08 IST

Swami Samartha: स्वामी उपासना कशी करावी याचे धडे स्वामी चरित्रात मिळतात, स्वामींना कोणती गोष्ट आवडते याबाबत भक्ताने कथन केलेला अनुभव वाचा. 

स्वामींवर अपार प्रेम आणि श्रद्धा असलेला प्रत्येक स्वामी भक्त स्वामी कृपा व्हावी म्हणून भक्ती भावाने त्यांना काही न काही अर्पण करत असतो. मग ते फुल असो नाहीतर हिरेजडित हार! यथाशक्ती केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते हे आपण जाणतो. याबाबत स्वामी चरित्रात एका भक्ताने अनुभव सांगितला आहे, कोणता ते जाणून घेऊ. 

स्वामी समर्थांचा एक भक्त, जो बागायतदार होता. त्याच्या फळभागातून होणाऱ्या उत्पन्नामुळे त्याचा संसार सुखाने सुरु होता. आपल्या बागेतली ताजी केळी स्वामींना अर्पण करावी या हेतूने एक दिवस तो केळ्यांचे दोन घड घेऊन स्वामींच्या दर्शनाला निघाला. 

स्वामी दर्शनाला जाताना त्याला विचित्रच अनुभव आला. कधी नव्हे ते त्याच्याकडे केळी मागण्यासाठी भिकारी आले. ते उपाशी असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मात्र स्वामी भक्ताने ताजी केळी स्वामींना अर्पण करायची या भावनेने त्या भिकारी लोकांना दिली नाहीत. कापडाखाली केळ्याचा घड सावरत तो स्वामी दर्शनासाठी पोहोचला. 

तिथे गेल्यावर मात्र स्वामी त्या प्रसादाचा स्वीकार करेना. त्यावेळी बागायतदार काकुळतीला येऊन म्हणाला, स्वामी ताजी केळी तुमच्यासाठी आणली आहेत, तुम्ही याचा स्वीकार करा. 

तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, आता कशाला मला ही केळी देतोस? जेव्हा भुकेला होऊन तुझ्याकडे मी केळी मागत होतो तेव्हा तू मला हाकलून दिलेस आणि आता मला तीच केळी स्वीकारण्यासाठी हट्ट करतोयस?

बागायतदाराला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ उमगला. वाटेत केळी मागणारे लोक हे स्वामींचे अंश होते, ते गरजवंत होते. त्यांना डावलून स्वामींना दिलेला प्रसाद ते कधीच ग्रहण करणार नाहीत हे त्याला उमगले. त्यावेळी त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला, 'माझी चूक मला कळली आहे. माझा भाव सच्चा होता पण तुमची शिकवण मी विसरलो. ज्याला गरज आहे त्याला मदत करणे ही खरी स्वामी सेवा आणि ती तुम्हाला जास्त प्रिय आहे, हे इथून पुढे लक्षात ठेवीन!' 

त्यामुळे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावी ही शिकवण, आपण स्वामींना काय देतोय, यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय आणि कोणत्या परिस्थितीत देतोय, हे पाहणे महत्त्वाचे आहे. देव भावाचा भुकेला आहे, प्रापंचिक वस्तूंचा नाही! देवाला मनोभावे अर्पण केलेलं बिल्व पत्र, तुळशी पत्र सुद्धा पुरेसं आहे. पण त्यामागे भावना शुद्ध हवी आणि कोणाचेही हित न डावलता केलेली भक्ती असावी! 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थ