शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

प्रभुला अनन्य शरण रिघा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 18:58 IST

अनन्य भावाने जो भक्त भगवंताला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचे भगवान निवारण करतात. असा अनन्य भाव ज्या भक्ताजवळ असतो त्याला देव अंतकाळी अंतीम दुःखातून मुक्त करतो...!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

अनन्य भावाने जो भक्त भगवंताला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचे भगवान निवारण करतात. भक्तांसाठी श्रीहरी कसे धावून येतात आणि किती त्वरेने धावून येतात..? याचे वर्णन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज एका अभंगात करतात -

गजेंद्र पशू आप्ते मो कलीला । तो तुज स्मरला पांडुरंग ॥त्यासाठी गरुड सोडून धावसी । मोहे झळंबिसी दीनानाथ ॥धेनू वत्सावरी झेप घाली जैसी । तैसे गजेंद्रासी सोडविले ॥

श्रीमद् भागवत ग्रंथात गजेंद्र आख्यान प्रसिद्ध आहे. इंद्रद्युम्न नावाच्या राजाला अगस्ती ऋषींच्या शापामुळे गजेंद्र नावाच्या हत्तीचा जन्म मिळाला. हा गजेंद्र त्रिकूट पर्वतावर आपल्या कळपासह राहत होता. एकदा या गजेंद्राला जलक्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली. तो आपल्या परिवारासह जलक्रीडा करण्यासाठी पुष्कर तलावात आला. देहभान विसरून जलक्रीडा करीत असतांना हा गजेंद्र या पुष्कर तलावाच्या मध्यभागी आला. तिथे एक अजस्र मगर होती. या मगरीने गजेंद्र नावाच्या या हत्तीचा पाय सर्व शक्तिनिशी पकडला. ती मगर या हत्तीला खोल डोहात ओढत होती. गजेंद्र मगर मिठीतून पाय सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता पण त्यात त्याला यश आले नाही. त्याने आपल्या परिवारातील सर्व हत्तींना मदतीसाठी बोलाविले पण

कठिण समय येता कोण कामासी येतो..?

याचा प्रत्यय गजेंद्राला आला. परिवारातील सर्वजण पळून गेले. गजेंद्राला कळाले की, ज्या परिवारासाठी आपण जन्मभर कष्ट केले ते सर्वजण आपल्याला सोडून निघून गेले. तुकोबा म्हणतात -

माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी ।इष्ट मित्र सज्जन सखे होती सुखाची मांडणी ॥

त्याने पूर्व पुण्याईमुळे भगवंताचा आर्तऽ धावा केला. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी भागवतात अतिशय बहारीचे वर्णन केले आहे -

गज सरोवरी मोहग्रस्त । स्त्रिया पुत्रा सांडिली जीत ॥तो अंतकाळी माते स्मरत । आर्त भूल अति स्तवने ॥

ईश्वराशिवाय आपले कोणी नाही या निश्चयाने त्याने श्रीहरिचा आर्त धावा केला. गजेंद्राची ती आर्त हाक ऐकून देव कसा आला..? तर त्याचे वर्णन तुकाराम महाराज करतात -

धेनू वत्सावरी झेप घाली जैसी । तैसे गजेंद्रासी सोडविले ॥

भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या नक्राचा (मगरीचा) उद्धार केला आणि गजेंद्राला मगर मिठीतून मुक्त केले. असा अनन्य भाव ज्या भक्ताजवळ असतो त्याला देव अंतकाळी अंतीम दुःखातून असाच मुक्त करतो.

संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

जो मज होय अनन्यशरण । तयाचे निवारी मी जन्ममरण ।यालागी शरणागता शरण । मी ची एक ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक