शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

प्रभुला अनन्य शरण रिघा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 18:58 IST

अनन्य भावाने जो भक्त भगवंताला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचे भगवान निवारण करतात. असा अनन्य भाव ज्या भक्ताजवळ असतो त्याला देव अंतकाळी अंतीम दुःखातून मुक्त करतो...!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

अनन्य भावाने जो भक्त भगवंताला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचे भगवान निवारण करतात. भक्तांसाठी श्रीहरी कसे धावून येतात आणि किती त्वरेने धावून येतात..? याचे वर्णन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज एका अभंगात करतात -

गजेंद्र पशू आप्ते मो कलीला । तो तुज स्मरला पांडुरंग ॥त्यासाठी गरुड सोडून धावसी । मोहे झळंबिसी दीनानाथ ॥धेनू वत्सावरी झेप घाली जैसी । तैसे गजेंद्रासी सोडविले ॥

श्रीमद् भागवत ग्रंथात गजेंद्र आख्यान प्रसिद्ध आहे. इंद्रद्युम्न नावाच्या राजाला अगस्ती ऋषींच्या शापामुळे गजेंद्र नावाच्या हत्तीचा जन्म मिळाला. हा गजेंद्र त्रिकूट पर्वतावर आपल्या कळपासह राहत होता. एकदा या गजेंद्राला जलक्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली. तो आपल्या परिवारासह जलक्रीडा करण्यासाठी पुष्कर तलावात आला. देहभान विसरून जलक्रीडा करीत असतांना हा गजेंद्र या पुष्कर तलावाच्या मध्यभागी आला. तिथे एक अजस्र मगर होती. या मगरीने गजेंद्र नावाच्या या हत्तीचा पाय सर्व शक्तिनिशी पकडला. ती मगर या हत्तीला खोल डोहात ओढत होती. गजेंद्र मगर मिठीतून पाय सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता पण त्यात त्याला यश आले नाही. त्याने आपल्या परिवारातील सर्व हत्तींना मदतीसाठी बोलाविले पण

कठिण समय येता कोण कामासी येतो..?

याचा प्रत्यय गजेंद्राला आला. परिवारातील सर्वजण पळून गेले. गजेंद्राला कळाले की, ज्या परिवारासाठी आपण जन्मभर कष्ट केले ते सर्वजण आपल्याला सोडून निघून गेले. तुकोबा म्हणतात -

माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी ।इष्ट मित्र सज्जन सखे होती सुखाची मांडणी ॥

त्याने पूर्व पुण्याईमुळे भगवंताचा आर्तऽ धावा केला. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी भागवतात अतिशय बहारीचे वर्णन केले आहे -

गज सरोवरी मोहग्रस्त । स्त्रिया पुत्रा सांडिली जीत ॥तो अंतकाळी माते स्मरत । आर्त भूल अति स्तवने ॥

ईश्वराशिवाय आपले कोणी नाही या निश्चयाने त्याने श्रीहरिचा आर्त धावा केला. गजेंद्राची ती आर्त हाक ऐकून देव कसा आला..? तर त्याचे वर्णन तुकाराम महाराज करतात -

धेनू वत्सावरी झेप घाली जैसी । तैसे गजेंद्रासी सोडविले ॥

भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या नक्राचा (मगरीचा) उद्धार केला आणि गजेंद्राला मगर मिठीतून मुक्त केले. असा अनन्य भाव ज्या भक्ताजवळ असतो त्याला देव अंतकाळी अंतीम दुःखातून असाच मुक्त करतो.

संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

जो मज होय अनन्यशरण । तयाचे निवारी मी जन्ममरण ।यालागी शरणागता शरण । मी ची एक ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक