शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धांच्या सहवासाने लबाड सावकाराचे आयुष्य कसे बदलले, त्याची ही कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 13:25 IST

संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात.

एका गावात कांचनशेट नावाचा एक लबाड सावकार होता. अनेक भले बुरे मार्ग पत्करून, सामान्य लोकांची लुबाडणूक करून त्याने पुष्कळ माया जमवली होती. परंतु पूर्वजन्मातील संस्काराचा परिणाम म्हणून त्याला आपण मिळवलेल्या पापाच्या धनाचा पश्चात्ताप वाटू लागला. त्याची मन:शांती नष्ट झाली.

गावात त्याचवेळेस भगवान बुद्धांची प्रवचने चालू होती. आपण केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी आणि मन:शांतीसाठी तो प्रवचनांना जाऊ लागला. परिणामत: त्याचे मन, आचरण हे बुद्धमय होऊन गेले. त्याला सद्धर्माची आस लागली. 

एकदा तो गावात कामानिमित्त गेला असता त्याला खूप मोठी पडीक जमीन दिसली. तिच्यावर भगवान बुद्धांचे कार्यक्षेत्र वाढवणारे मंदिर असावे, असे त्याला प्रकर्षाने वाटले. तेथील राजाकडे त्याबद्दल चौकशी केली असता त्याने कांचनशेटची निकड ओळखून त्या जमिनीच्या बदल्यात तिच्याच किमती एवढे सोने मागितले. 

मनाची आस पूर्ण करण्यासाठी कांचनशेठने आपला पापाचा पैसा न वापरता खूप कष्ट करून सोने जमवून जमीन खरेदी केली. तेव्हा राजाने चकित होऊन विचारले असता कांचनशेठ म्हणाला, `ही भूमी भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन होणार आहे, तेव्हा सद्धर्म वाढवण्यासाठी ही जमीन पुण्यमार्गाने मिळवणे हे माझे कर्तव्य होते.'

अशा प्रकारे लबाडीचा धंदा करून जो कांचनशेठ लोकनिंदेला कारणीभूत ठरला होता, तोच समाजहितासाठी सद्धर्माची कास धरू लागताच लोकप्रिय समाजसेवक झाला. 

सत्संग का करावा, हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात आले असेल. संगत जशी, तशी आपली घडण होत असते. संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात. म्हणून संतांनीदेखील सत्पुरुषाचा, सद्विचारी माणसाचा, ज्ञानी माणसाचा, नम्र माणसांचा आणि सत्कर्म करणाऱ्या संतवृत्तीच्या लोकांचा संग करा असे सांगितले आहे.