शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

भगवान बुद्धांच्या सहवासाने लबाड सावकाराचे आयुष्य कसे बदलले, त्याची ही कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 13:25 IST

संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात.

एका गावात कांचनशेट नावाचा एक लबाड सावकार होता. अनेक भले बुरे मार्ग पत्करून, सामान्य लोकांची लुबाडणूक करून त्याने पुष्कळ माया जमवली होती. परंतु पूर्वजन्मातील संस्काराचा परिणाम म्हणून त्याला आपण मिळवलेल्या पापाच्या धनाचा पश्चात्ताप वाटू लागला. त्याची मन:शांती नष्ट झाली.

गावात त्याचवेळेस भगवान बुद्धांची प्रवचने चालू होती. आपण केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी आणि मन:शांतीसाठी तो प्रवचनांना जाऊ लागला. परिणामत: त्याचे मन, आचरण हे बुद्धमय होऊन गेले. त्याला सद्धर्माची आस लागली. 

एकदा तो गावात कामानिमित्त गेला असता त्याला खूप मोठी पडीक जमीन दिसली. तिच्यावर भगवान बुद्धांचे कार्यक्षेत्र वाढवणारे मंदिर असावे, असे त्याला प्रकर्षाने वाटले. तेथील राजाकडे त्याबद्दल चौकशी केली असता त्याने कांचनशेटची निकड ओळखून त्या जमिनीच्या बदल्यात तिच्याच किमती एवढे सोने मागितले. 

मनाची आस पूर्ण करण्यासाठी कांचनशेठने आपला पापाचा पैसा न वापरता खूप कष्ट करून सोने जमवून जमीन खरेदी केली. तेव्हा राजाने चकित होऊन विचारले असता कांचनशेठ म्हणाला, `ही भूमी भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन होणार आहे, तेव्हा सद्धर्म वाढवण्यासाठी ही जमीन पुण्यमार्गाने मिळवणे हे माझे कर्तव्य होते.'

अशा प्रकारे लबाडीचा धंदा करून जो कांचनशेठ लोकनिंदेला कारणीभूत ठरला होता, तोच समाजहितासाठी सद्धर्माची कास धरू लागताच लोकप्रिय समाजसेवक झाला. 

सत्संग का करावा, हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात आले असेल. संगत जशी, तशी आपली घडण होत असते. संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात. म्हणून संतांनीदेखील सत्पुरुषाचा, सद्विचारी माणसाचा, ज्ञानी माणसाचा, नम्र माणसांचा आणि सत्कर्म करणाऱ्या संतवृत्तीच्या लोकांचा संग करा असे सांगितले आहे.