शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धांच्या सहवासाने लबाड सावकाराचे आयुष्य कसे बदलले, त्याची ही कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 13:25 IST

संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात.

एका गावात कांचनशेट नावाचा एक लबाड सावकार होता. अनेक भले बुरे मार्ग पत्करून, सामान्य लोकांची लुबाडणूक करून त्याने पुष्कळ माया जमवली होती. परंतु पूर्वजन्मातील संस्काराचा परिणाम म्हणून त्याला आपण मिळवलेल्या पापाच्या धनाचा पश्चात्ताप वाटू लागला. त्याची मन:शांती नष्ट झाली.

गावात त्याचवेळेस भगवान बुद्धांची प्रवचने चालू होती. आपण केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी आणि मन:शांतीसाठी तो प्रवचनांना जाऊ लागला. परिणामत: त्याचे मन, आचरण हे बुद्धमय होऊन गेले. त्याला सद्धर्माची आस लागली. 

एकदा तो गावात कामानिमित्त गेला असता त्याला खूप मोठी पडीक जमीन दिसली. तिच्यावर भगवान बुद्धांचे कार्यक्षेत्र वाढवणारे मंदिर असावे, असे त्याला प्रकर्षाने वाटले. तेथील राजाकडे त्याबद्दल चौकशी केली असता त्याने कांचनशेटची निकड ओळखून त्या जमिनीच्या बदल्यात तिच्याच किमती एवढे सोने मागितले. 

मनाची आस पूर्ण करण्यासाठी कांचनशेठने आपला पापाचा पैसा न वापरता खूप कष्ट करून सोने जमवून जमीन खरेदी केली. तेव्हा राजाने चकित होऊन विचारले असता कांचनशेठ म्हणाला, `ही भूमी भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन होणार आहे, तेव्हा सद्धर्म वाढवण्यासाठी ही जमीन पुण्यमार्गाने मिळवणे हे माझे कर्तव्य होते.'

अशा प्रकारे लबाडीचा धंदा करून जो कांचनशेठ लोकनिंदेला कारणीभूत ठरला होता, तोच समाजहितासाठी सद्धर्माची कास धरू लागताच लोकप्रिय समाजसेवक झाला. 

सत्संग का करावा, हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात आले असेल. संगत जशी, तशी आपली घडण होत असते. संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात. म्हणून संतांनीदेखील सत्पुरुषाचा, सद्विचारी माणसाचा, ज्ञानी माणसाचा, नम्र माणसांचा आणि सत्कर्म करणाऱ्या संतवृत्तीच्या लोकांचा संग करा असे सांगितले आहे.