शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धांच्या सहवासाने लबाड सावकाराचे आयुष्य कसे बदलले, त्याची ही कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 13:25 IST

संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात.

एका गावात कांचनशेट नावाचा एक लबाड सावकार होता. अनेक भले बुरे मार्ग पत्करून, सामान्य लोकांची लुबाडणूक करून त्याने पुष्कळ माया जमवली होती. परंतु पूर्वजन्मातील संस्काराचा परिणाम म्हणून त्याला आपण मिळवलेल्या पापाच्या धनाचा पश्चात्ताप वाटू लागला. त्याची मन:शांती नष्ट झाली.

गावात त्याचवेळेस भगवान बुद्धांची प्रवचने चालू होती. आपण केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी आणि मन:शांतीसाठी तो प्रवचनांना जाऊ लागला. परिणामत: त्याचे मन, आचरण हे बुद्धमय होऊन गेले. त्याला सद्धर्माची आस लागली. 

एकदा तो गावात कामानिमित्त गेला असता त्याला खूप मोठी पडीक जमीन दिसली. तिच्यावर भगवान बुद्धांचे कार्यक्षेत्र वाढवणारे मंदिर असावे, असे त्याला प्रकर्षाने वाटले. तेथील राजाकडे त्याबद्दल चौकशी केली असता त्याने कांचनशेटची निकड ओळखून त्या जमिनीच्या बदल्यात तिच्याच किमती एवढे सोने मागितले. 

मनाची आस पूर्ण करण्यासाठी कांचनशेठने आपला पापाचा पैसा न वापरता खूप कष्ट करून सोने जमवून जमीन खरेदी केली. तेव्हा राजाने चकित होऊन विचारले असता कांचनशेठ म्हणाला, `ही भूमी भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन होणार आहे, तेव्हा सद्धर्म वाढवण्यासाठी ही जमीन पुण्यमार्गाने मिळवणे हे माझे कर्तव्य होते.'

अशा प्रकारे लबाडीचा धंदा करून जो कांचनशेठ लोकनिंदेला कारणीभूत ठरला होता, तोच समाजहितासाठी सद्धर्माची कास धरू लागताच लोकप्रिय समाजसेवक झाला. 

सत्संग का करावा, हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात आले असेल. संगत जशी, तशी आपली घडण होत असते. संतांच्या सहवासात राहिलो तर कायम चांगले विचार येतात आणि दुर्जनांच्या सहवासात राहिलो तर कायम वाईट विचार येतात. म्हणून संतांनीदेखील सत्पुरुषाचा, सद्विचारी माणसाचा, ज्ञानी माणसाचा, नम्र माणसांचा आणि सत्कर्म करणाऱ्या संतवृत्तीच्या लोकांचा संग करा असे सांगितले आहे.