शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

नित्य नामाच्या सहवासात राहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 19:31 IST

नित्य नामाच्या सहवासात राहिलात तर नामाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल आणि तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होईल ही काळया दगडावरची रेघ..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

परमेश्वराचे वर्णन करतांना शास्त्रकारांनी तो निर्गुण, निराकार, निरावयव, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव असे केले आहे. खरी गंमत ही की, असा निर्गुण परमात्मा भक्तीच्या शक्तीने सर्व संतांनी सगुण साकार केला. कधी तो राम झाला तर कधी कृष्ण झाला. कधी दत्त झाला तर कधी नृसिंह झाला. कच्छ, मच्छ, वराह, नृसिंह, बुद्ध हे सारे त्याचेच अवतार होत. पंढरीचा पांडुरंग हा भक्तांच्या भक्तीला धावून येतो. नाम जपता जपता नाम आणि नामी यांच्यातला भेद शिल्लकच राहत नाही.

नाम, नामी आणि नामधारक ही त्रिपुटी मावळून जाते आणि एकच अद्वैत शिल्लक राहते.संतश्रेष्ठ, देहूनिवासी, वैराग्यमूर्ती, जगद्गुरु, जगद्वंदनीय तुकाराम महाराज आपल्या अभंगातून हाच अद्वैताचा सिद्धांत प्रतिपादन करतात -

ध्यानी ध्याता पंढरीराया । मनासहित पालटे काया ।

तेथे बोल केवी उरी । माझे मी पण झाला हरी ।

चित्त चैतन्याशी पडता मिठी । दिसे हरिरुप अवघी सृष्टी ।

तुका म्हणे सांगो काय । एका एकी हरिवृत्तीमय ॥

पण साधकाची 'माझे मी पण झाला हरी' ही अवस्था होण्यासाठी त्याला परमोच्च प्रेमावस्थेत जावे लागेल. नाम धारकाने नाम घेता घेता ही एक भाव अवस्था प्राप्त करुन घ्यावी. नामाचा प्रवास जर नुसत्या वैखरीच्या स्टेशनवर थांबला तर त्याचा काय उपयोग..? वैखरीचा उपयोग फक्त नामाच्या सहवासात राहण्यासाठी पण सहवासातून अती उत्कट प्रेम निर्माण होते. रामकृष्ण परमहंस नेहमी जुन्या काळातला एक दृष्टांत देत असतं, ते म्हणत -

पूर्वी प्रथमतः पती आणि पत्नी अनोळखी घरातले असायचे. त्यांनी आधी कधीच एकमेकांना बघितलेले नसायचे. वडीलधाऱ्यांनी मुलगी बघितली आणि हा नवरोबा बोहल्यावर उभा राहिला ही पूर्वीची पद्धत होती पण लग्नाची अक्षत मस्तकावर पडून ती त्याची पत्नी घरात आली. दोघांचा सहवास वाढला. आता याला थोडे जरी दुःख झाले तरी पाण्यातल्या माशाप्रमाणे तिची तळमळ व्हायची. एका पतीच्या प्रेमासाठी ती संसारातलं सार दुःख सहन करायची हे सारं नातं, ओढ, प्रेम कशामुळे..? तर फक्त सहवासाने निर्माण झालं. तसं नित्य नामाच्या सहवासात राहिलात तर नामाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल आणि तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होईल ही काळया दगडावरची रेघ..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक