शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

नित्य नामाच्या सहवासात राहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 19:31 IST

नित्य नामाच्या सहवासात राहिलात तर नामाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल आणि तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होईल ही काळया दगडावरची रेघ..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

परमेश्वराचे वर्णन करतांना शास्त्रकारांनी तो निर्गुण, निराकार, निरावयव, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव असे केले आहे. खरी गंमत ही की, असा निर्गुण परमात्मा भक्तीच्या शक्तीने सर्व संतांनी सगुण साकार केला. कधी तो राम झाला तर कधी कृष्ण झाला. कधी दत्त झाला तर कधी नृसिंह झाला. कच्छ, मच्छ, वराह, नृसिंह, बुद्ध हे सारे त्याचेच अवतार होत. पंढरीचा पांडुरंग हा भक्तांच्या भक्तीला धावून येतो. नाम जपता जपता नाम आणि नामी यांच्यातला भेद शिल्लकच राहत नाही.

नाम, नामी आणि नामधारक ही त्रिपुटी मावळून जाते आणि एकच अद्वैत शिल्लक राहते.संतश्रेष्ठ, देहूनिवासी, वैराग्यमूर्ती, जगद्गुरु, जगद्वंदनीय तुकाराम महाराज आपल्या अभंगातून हाच अद्वैताचा सिद्धांत प्रतिपादन करतात -

ध्यानी ध्याता पंढरीराया । मनासहित पालटे काया ।

तेथे बोल केवी उरी । माझे मी पण झाला हरी ।

चित्त चैतन्याशी पडता मिठी । दिसे हरिरुप अवघी सृष्टी ।

तुका म्हणे सांगो काय । एका एकी हरिवृत्तीमय ॥

पण साधकाची 'माझे मी पण झाला हरी' ही अवस्था होण्यासाठी त्याला परमोच्च प्रेमावस्थेत जावे लागेल. नाम धारकाने नाम घेता घेता ही एक भाव अवस्था प्राप्त करुन घ्यावी. नामाचा प्रवास जर नुसत्या वैखरीच्या स्टेशनवर थांबला तर त्याचा काय उपयोग..? वैखरीचा उपयोग फक्त नामाच्या सहवासात राहण्यासाठी पण सहवासातून अती उत्कट प्रेम निर्माण होते. रामकृष्ण परमहंस नेहमी जुन्या काळातला एक दृष्टांत देत असतं, ते म्हणत -

पूर्वी प्रथमतः पती आणि पत्नी अनोळखी घरातले असायचे. त्यांनी आधी कधीच एकमेकांना बघितलेले नसायचे. वडीलधाऱ्यांनी मुलगी बघितली आणि हा नवरोबा बोहल्यावर उभा राहिला ही पूर्वीची पद्धत होती पण लग्नाची अक्षत मस्तकावर पडून ती त्याची पत्नी घरात आली. दोघांचा सहवास वाढला. आता याला थोडे जरी दुःख झाले तरी पाण्यातल्या माशाप्रमाणे तिची तळमळ व्हायची. एका पतीच्या प्रेमासाठी ती संसारातलं सार दुःख सहन करायची हे सारं नातं, ओढ, प्रेम कशामुळे..? तर फक्त सहवासाने निर्माण झालं. तसं नित्य नामाच्या सहवासात राहिलात तर नामाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल आणि तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होईल ही काळया दगडावरची रेघ..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक