शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

नित्य नामाच्या सहवासात राहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 19:31 IST

नित्य नामाच्या सहवासात राहिलात तर नामाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल आणि तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होईल ही काळया दगडावरची रेघ..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

परमेश्वराचे वर्णन करतांना शास्त्रकारांनी तो निर्गुण, निराकार, निरावयव, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव असे केले आहे. खरी गंमत ही की, असा निर्गुण परमात्मा भक्तीच्या शक्तीने सर्व संतांनी सगुण साकार केला. कधी तो राम झाला तर कधी कृष्ण झाला. कधी दत्त झाला तर कधी नृसिंह झाला. कच्छ, मच्छ, वराह, नृसिंह, बुद्ध हे सारे त्याचेच अवतार होत. पंढरीचा पांडुरंग हा भक्तांच्या भक्तीला धावून येतो. नाम जपता जपता नाम आणि नामी यांच्यातला भेद शिल्लकच राहत नाही.

नाम, नामी आणि नामधारक ही त्रिपुटी मावळून जाते आणि एकच अद्वैत शिल्लक राहते.संतश्रेष्ठ, देहूनिवासी, वैराग्यमूर्ती, जगद्गुरु, जगद्वंदनीय तुकाराम महाराज आपल्या अभंगातून हाच अद्वैताचा सिद्धांत प्रतिपादन करतात -

ध्यानी ध्याता पंढरीराया । मनासहित पालटे काया ।

तेथे बोल केवी उरी । माझे मी पण झाला हरी ।

चित्त चैतन्याशी पडता मिठी । दिसे हरिरुप अवघी सृष्टी ।

तुका म्हणे सांगो काय । एका एकी हरिवृत्तीमय ॥

पण साधकाची 'माझे मी पण झाला हरी' ही अवस्था होण्यासाठी त्याला परमोच्च प्रेमावस्थेत जावे लागेल. नाम धारकाने नाम घेता घेता ही एक भाव अवस्था प्राप्त करुन घ्यावी. नामाचा प्रवास जर नुसत्या वैखरीच्या स्टेशनवर थांबला तर त्याचा काय उपयोग..? वैखरीचा उपयोग फक्त नामाच्या सहवासात राहण्यासाठी पण सहवासातून अती उत्कट प्रेम निर्माण होते. रामकृष्ण परमहंस नेहमी जुन्या काळातला एक दृष्टांत देत असतं, ते म्हणत -

पूर्वी प्रथमतः पती आणि पत्नी अनोळखी घरातले असायचे. त्यांनी आधी कधीच एकमेकांना बघितलेले नसायचे. वडीलधाऱ्यांनी मुलगी बघितली आणि हा नवरोबा बोहल्यावर उभा राहिला ही पूर्वीची पद्धत होती पण लग्नाची अक्षत मस्तकावर पडून ती त्याची पत्नी घरात आली. दोघांचा सहवास वाढला. आता याला थोडे जरी दुःख झाले तरी पाण्यातल्या माशाप्रमाणे तिची तळमळ व्हायची. एका पतीच्या प्रेमासाठी ती संसारातलं सार दुःख सहन करायची हे सारं नातं, ओढ, प्रेम कशामुळे..? तर फक्त सहवासाने निर्माण झालं. तसं नित्य नामाच्या सहवासात राहिलात तर नामाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल आणि तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होईल ही काळया दगडावरची रेघ..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक