शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

संकल्पाचे नव्याचे नऊ दिवस संपले? हरकत नाही, करा पुनश्च हरी ओम!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 12, 2021 08:00 IST

बाह्य जगात बदल घडवावे असे वाटत असेल, तर आधी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवले पाहिजेत.

ज्योत्स्ना गाडगीळ 

काय म्हणतातेत नवीन वर्षाचे संकल्प? असा खोचक प्रश्न कोणी केला, तर रागावू नका. कारण, ठरवलेल्या संकल्पांपैकी सगळेच संकल्प पूर्ण होत नाहीत. पण म्हणून संकल्पच करायचे नाहीत का? तर नाही. संकल्पांमध्ये बदल करत राहायचे. इंग्रजीत म्हण आहे ना, ओन्ली चेंज इज परमेनंट थिंग! बाह्य जगात बदल घडवावे असे वाटत असेल, तर आधी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवले पाहिजेत. ते आवश्यक बदल कोणते? यादी बरीच मोठी आहे, परंतु त्यातील प्रामुख्याने बदलाव्यात अशा पाच गोष्टी!

लवकर उठा:  आजच्या मोबाईल युगात पहाट, सूर्य दर्शन, सूर्य नमस्कार या गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. त्यात वर्क फ्रॉम होम मुळे तर व्यायामाचे वाजले की बारा, अशी स्थिती झाली आहे. नवीन वर्ष सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी अजून व्यायामाचा श्रीगणेशा झाला नसेल, तर मकर संक्रांतीला सूर्याला अर्घ्य देत सूर्य नमस्काराने सुदृढ आरोग्याची सुरुवात करा. हळू हळू सरावाने पहाटे उठू लागलात की प्राणायाम आणि ध्यान धारणा करा. त्या निरव शांततेत तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकता येईल. मन शांत होईल. दिवसही आणि आगामी काळाची छान सुरुवात होईल. 

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.

प्रार्थना करा: देवाचिये द्वारी उभा क्षणभरी हा अभंग जणू आजच्या धकाधकीच्या जीवन शैलीला अनुसरूनच लिहिला असावा. परंतु, आपण क्षणभरही वेळ काढून देवाची भेट घेत नसू, तर फार मोठ्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपण गमावत आहोत, हे लक्षात घ्या. प्रार्थना देवासाठी नसून, ती आपल्यासाठी असते. काही मिळावे म्हणून प्रार्थना न करता जे मिळाले आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी देवासमोर हात जोडून कोणताही एक श्लोक मनापासून म्हणावा. श्लोक पाठ नसेल, तर दोन हस्तक तिसरे मस्तक एवढेही पुरेसे आहे. पण तेवढा वेळ काढाच!

जप किंवा ध्यान धारणा करा : ज्याप्रमाणे प्रार्थना महत्त्वाची, त्याच प्रमाणे ध्यानधारणाही महत्त्वाची. सतत मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर किंवा अन्य गॅझेट यांच्या वापरामुळे आपण आपले मनस्वास्थ गमावून बसलो आहोत. ते मिळवण्यासाठी काही क्षण शांत बसणे गरजेचे आहे. नुसते शांत बसण्याची आपली सवय तुटली असेल, तर जपाची माळ ओढावी. म्हणजे जप होईपर्यंत शांत स्थितीत बसणे होईल आणि नामस्मरणही घडेल. 

मौन धरा : मौनं सर्वार्थ साध्यते, असे म्हणतात. पण मौन धरण्यासाठी प्रचंड संयम लागतो. दुसऱ्याचे ऐकून घेताना आपल्याला मौन ठेवावे लागते. रागाच्या क्षणी वाद वाढू नये म्हणून मौन बाळगावे लागते. भावनांचा कोंडमारा झाला की मौन धरावे लागते. बिकट परिस्थिती निवळेपर्यंत मौन धरावे लागते. मौनात खूप ताकद असते. हे मौन केल्याशिवाय कळत नाही. आपण अकारण किती बडबड करतो आणि ऊर्जा वाया घालवतो, हे आपल्याला मौन धरल्याशिवाय कळणार नाही. 

आपले दोष दूर करण्याचा दृढ संकल्प करा : दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, असे म्हणतात. याचाच अर्थ दुसऱ्यांचे दोष काढण्यात आपल्या आयुष्याचा मोठा काळ वाया जातो. तोच काळ आपण आपल्या जडण घडणीत लावला, तर आपले आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकेल. 

हेही वाचा : संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!