शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून माघस्नानारंभ: जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:28 IST

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

माघस्नानाच्या तिथीबद्दल मतभेद असले तरीही पौष पौर्णिमेला माघस्नानाला प्रारंभ करून माघ पौर्णिमेला त्यची समाप्ती करण्याची प्रथा प्रचलित आहे. ज्यांना संपूर्ण महिनाभर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शक्य नसेल, त्यांनी निदान महिन्याभरातून एकदा, दोनदा किंवा तिनदा तरी हे स्नान करावे. आपण म्हणाल, त्यात शक्य नसण्यासारखे काय? तर माघ स्नानाची महत्त्वाची अट म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान तर करायचेच, पण ते थंड पाण्याने करायचे! वाचूनच हुडहुडी भरली ना? म्हणूनच शास्त्राने हा पर्याय दिला असावा. 

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

हा स्नान महिमा वाचल्यावर आपण त्यांच्या तुलनेत किती आळशी आहोत याची आपल्याला कल्पना येईल. हिवाळ्याचे थंडीचे दिवस व्यायामासाठी अनुकूल मानले जातात. वातावरण आल्हाददयाक असते. पण ते पाहण्यासाठी अंथरुण सोडून निसर्गाचे दर्शन घ्यावे लागते. ही सवय अंगी बाणली, तर त्याचे आपल्याला असंख्य लाभ होतात. शारीरिक आणि मानसिकही! तना मनाची मरगळ निघून जाते. नैराश्य पळून जाते. नवीन उत्साह संचारतो आणि सकाळची ऊर्जा दिवसभर पुरते. 

हे सगळे फायदे माहित असूनही आपण सूर्योदयापूर्वी उठायचे सोडून आठ-नऊ-दहा वाजता उठतो. म्हणून शास्त्रकारांनी हा नियम घालून दिला आहे, तो म्हणजे माघस्नानाचा! माघ पौर्णिमेपर्यंत थंडी पळून जाते. महिनाभरात सराव होतो आणि लवकर उठायची सवय लागते. यात सातत्य यावे याकरीता माघस्नान महत्त्वाचे मानले जाते. त्या नियमाला धार्मिक अधिष्ठान मिळावे म्हणून माघस्नानाचा संबंध पुण्यप्राप्तीशी जोडलेला आहे. जो सूर्यपूजा करतो, त्याची जग पूजा करते. यात असत्य काहीच नाही. यशस्वी लोकांचे चरित्र पाहिले, तर लक्षात येईल की सगळ्या यशस्वी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत असत. या ब्रह्ममुहूर्ताचा सदुपयोग करून आपणही आपल्या जीवनाचा विकास करावा, यासाठी आपणही माघस्नानाचा संकल्प करूया आणि सूर्याला वंदन करून आपल्या कर्तृत्त्वाचे तेज समाजात निर्माण करूया!