शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

आजपासून माघस्नानारंभ: जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:28 IST

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

माघस्नानाच्या तिथीबद्दल मतभेद असले तरीही पौष पौर्णिमेला माघस्नानाला प्रारंभ करून माघ पौर्णिमेला त्यची समाप्ती करण्याची प्रथा प्रचलित आहे. ज्यांना संपूर्ण महिनाभर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शक्य नसेल, त्यांनी निदान महिन्याभरातून एकदा, दोनदा किंवा तिनदा तरी हे स्नान करावे. आपण म्हणाल, त्यात शक्य नसण्यासारखे काय? तर माघ स्नानाची महत्त्वाची अट म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान तर करायचेच, पण ते थंड पाण्याने करायचे! वाचूनच हुडहुडी भरली ना? म्हणूनच शास्त्राने हा पर्याय दिला असावा. 

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

हा स्नान महिमा वाचल्यावर आपण त्यांच्या तुलनेत किती आळशी आहोत याची आपल्याला कल्पना येईल. हिवाळ्याचे थंडीचे दिवस व्यायामासाठी अनुकूल मानले जातात. वातावरण आल्हाददयाक असते. पण ते पाहण्यासाठी अंथरुण सोडून निसर्गाचे दर्शन घ्यावे लागते. ही सवय अंगी बाणली, तर त्याचे आपल्याला असंख्य लाभ होतात. शारीरिक आणि मानसिकही! तना मनाची मरगळ निघून जाते. नैराश्य पळून जाते. नवीन उत्साह संचारतो आणि सकाळची ऊर्जा दिवसभर पुरते. 

हे सगळे फायदे माहित असूनही आपण सूर्योदयापूर्वी उठायचे सोडून आठ-नऊ-दहा वाजता उठतो. म्हणून शास्त्रकारांनी हा नियम घालून दिला आहे, तो म्हणजे माघस्नानाचा! माघ पौर्णिमेपर्यंत थंडी पळून जाते. महिनाभरात सराव होतो आणि लवकर उठायची सवय लागते. यात सातत्य यावे याकरीता माघस्नान महत्त्वाचे मानले जाते. त्या नियमाला धार्मिक अधिष्ठान मिळावे म्हणून माघस्नानाचा संबंध पुण्यप्राप्तीशी जोडलेला आहे. जो सूर्यपूजा करतो, त्याची जग पूजा करते. यात असत्य काहीच नाही. यशस्वी लोकांचे चरित्र पाहिले, तर लक्षात येईल की सगळ्या यशस्वी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत असत. या ब्रह्ममुहूर्ताचा सदुपयोग करून आपणही आपल्या जीवनाचा विकास करावा, यासाठी आपणही माघस्नानाचा संकल्प करूया आणि सूर्याला वंदन करून आपल्या कर्तृत्त्वाचे तेज समाजात निर्माण करूया!