शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून माघस्नानारंभ: जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:28 IST

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

माघस्नानाच्या तिथीबद्दल मतभेद असले तरीही पौष पौर्णिमेला माघस्नानाला प्रारंभ करून माघ पौर्णिमेला त्यची समाप्ती करण्याची प्रथा प्रचलित आहे. ज्यांना संपूर्ण महिनाभर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शक्य नसेल, त्यांनी निदान महिन्याभरातून एकदा, दोनदा किंवा तिनदा तरी हे स्नान करावे. आपण म्हणाल, त्यात शक्य नसण्यासारखे काय? तर माघ स्नानाची महत्त्वाची अट म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान तर करायचेच, पण ते थंड पाण्याने करायचे! वाचूनच हुडहुडी भरली ना? म्हणूनच शास्त्राने हा पर्याय दिला असावा. 

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

हा स्नान महिमा वाचल्यावर आपण त्यांच्या तुलनेत किती आळशी आहोत याची आपल्याला कल्पना येईल. हिवाळ्याचे थंडीचे दिवस व्यायामासाठी अनुकूल मानले जातात. वातावरण आल्हाददयाक असते. पण ते पाहण्यासाठी अंथरुण सोडून निसर्गाचे दर्शन घ्यावे लागते. ही सवय अंगी बाणली, तर त्याचे आपल्याला असंख्य लाभ होतात. शारीरिक आणि मानसिकही! तना मनाची मरगळ निघून जाते. नैराश्य पळून जाते. नवीन उत्साह संचारतो आणि सकाळची ऊर्जा दिवसभर पुरते. 

हे सगळे फायदे माहित असूनही आपण सूर्योदयापूर्वी उठायचे सोडून आठ-नऊ-दहा वाजता उठतो. म्हणून शास्त्रकारांनी हा नियम घालून दिला आहे, तो म्हणजे माघस्नानाचा! माघ पौर्णिमेपर्यंत थंडी पळून जाते. महिनाभरात सराव होतो आणि लवकर उठायची सवय लागते. यात सातत्य यावे याकरीता माघस्नान महत्त्वाचे मानले जाते. त्या नियमाला धार्मिक अधिष्ठान मिळावे म्हणून माघस्नानाचा संबंध पुण्यप्राप्तीशी जोडलेला आहे. जो सूर्यपूजा करतो, त्याची जग पूजा करते. यात असत्य काहीच नाही. यशस्वी लोकांचे चरित्र पाहिले, तर लक्षात येईल की सगळ्या यशस्वी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत असत. या ब्रह्ममुहूर्ताचा सदुपयोग करून आपणही आपल्या जीवनाचा विकास करावा, यासाठी आपणही माघस्नानाचा संकल्प करूया आणि सूर्याला वंदन करून आपल्या कर्तृत्त्वाचे तेज समाजात निर्माण करूया!