शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

आजपासून माघस्नानारंभ: जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:28 IST

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

माघस्नानाच्या तिथीबद्दल मतभेद असले तरीही पौष पौर्णिमेला माघस्नानाला प्रारंभ करून माघ पौर्णिमेला त्यची समाप्ती करण्याची प्रथा प्रचलित आहे. ज्यांना संपूर्ण महिनाभर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शक्य नसेल, त्यांनी निदान महिन्याभरातून एकदा, दोनदा किंवा तिनदा तरी हे स्नान करावे. आपण म्हणाल, त्यात शक्य नसण्यासारखे काय? तर माघ स्नानाची महत्त्वाची अट म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान तर करायचेच, पण ते थंड पाण्याने करायचे! वाचूनच हुडहुडी भरली ना? म्हणूनच शास्त्राने हा पर्याय दिला असावा. 

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

हा स्नान महिमा वाचल्यावर आपण त्यांच्या तुलनेत किती आळशी आहोत याची आपल्याला कल्पना येईल. हिवाळ्याचे थंडीचे दिवस व्यायामासाठी अनुकूल मानले जातात. वातावरण आल्हाददयाक असते. पण ते पाहण्यासाठी अंथरुण सोडून निसर्गाचे दर्शन घ्यावे लागते. ही सवय अंगी बाणली, तर त्याचे आपल्याला असंख्य लाभ होतात. शारीरिक आणि मानसिकही! तना मनाची मरगळ निघून जाते. नैराश्य पळून जाते. नवीन उत्साह संचारतो आणि सकाळची ऊर्जा दिवसभर पुरते. 

हे सगळे फायदे माहित असूनही आपण सूर्योदयापूर्वी उठायचे सोडून आठ-नऊ-दहा वाजता उठतो. म्हणून शास्त्रकारांनी हा नियम घालून दिला आहे, तो म्हणजे माघस्नानाचा! माघ पौर्णिमेपर्यंत थंडी पळून जाते. महिनाभरात सराव होतो आणि लवकर उठायची सवय लागते. यात सातत्य यावे याकरीता माघस्नान महत्त्वाचे मानले जाते. त्या नियमाला धार्मिक अधिष्ठान मिळावे म्हणून माघस्नानाचा संबंध पुण्यप्राप्तीशी जोडलेला आहे. जो सूर्यपूजा करतो, त्याची जग पूजा करते. यात असत्य काहीच नाही. यशस्वी लोकांचे चरित्र पाहिले, तर लक्षात येईल की सगळ्या यशस्वी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत असत. या ब्रह्ममुहूर्ताचा सदुपयोग करून आपणही आपल्या जीवनाचा विकास करावा, यासाठी आपणही माघस्नानाचा संकल्प करूया आणि सूर्याला वंदन करून आपल्या कर्तृत्त्वाचे तेज समाजात निर्माण करूया!