शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून साने गुरुजी आजीवन एकवेळ जेवत असत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 07:20 IST

साधी राहणी उच्च विचारसरणी हे साने गुरुजींच्या आयुष्याचे मर्म होते, उदाहरणादाखल हा प्रसंग पहा.

साने गुरुजी जेव्हा अमळनेरच्या शाळेत मुलांना शिकवत होते तेव्हा गरीब मुलांना ते नेहमी मदत करीत. कुणाची फी भरत, कुणाला पुस्तके घेऊन देत. कुणाला कपडे घेऊन देत. तुटपुंजा पगार, गावी पैसे पाठवून जेवढे शिल्लक राहात त्या पैशात ते वसतिगृहात जेवत. एकदा त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक गोखले सर यांनी वसतीगृहाचे रजिस्टार तपासले. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, साने गुरुजी महिनाभरात फक्त एकवेळच जेवत. आपण रोज दोन वेळा जेवतो. म्हणजे तीस दिवसात साठी वेळा जेवण घेतो. परंतु रजिस्टरमधील नोंदीनुसार गुरुजींनी एका महिन्यात फक्त ३० वेळा जेवण घेतले. एक वेळच्या जेवणाचे पैसे वाचवून ते गरीब मुलांना मदत करीत असत. 

हेही वाचा :"नुसते नको उच्चशिक्षण, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा"- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

गोखले सरांना हे कळताच खूप वाईट वाटले. त्यांनी साने गुरुजींना निरोप पाठवून घरी बोलावून घेतले. गोखले सर म्हणाले, `साने, आजपासून तुम्ही रोज आमच्या घरी जेवायचे.' असे म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला ताबडतोब ताटं वाढायला सांगितली. वरण, भात, पोळी, दोन भाज्या, लोणचं, पापड असा सारा जेवणाचा उत्तम बेत होता. गरम गरम वरण भातावर साजूक तुपाची धार ओतून गोखले काकूंनी गुरुजींना जेवण सुरू करा, अशी विनंती केली. 

त्यादिवशी रात्री गुरुजी जेवून खोलीवर परतले. दसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता गोखले काकूंनी पुन्हा जेवाची तयारी केली. सर आणि काकू गुरुजींची वाट पाहत बसले. तेवढ्यात एक विद्यार्थी गुरुजींचे पत्र घेऊन गोखले सरांकडे आला. ते पत्र वाचता वाचता सरांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काकू म्हणाल्या, `काय झालं, कुणाचे पत्र आहे?'

काही न बोलता सरांनी ते पत्र काकूंना दिले. `गोखले सर, तुमच्याकडचा पंचपक्वांनाच्या जेवणाचा बेत फार उत्तम होता. काकूंच्या हातच्या स्वयंपाकाची चव तर अवर्णनीयच आहे. पण मला  क्षमा करा. यापुढे मी आपल्याकडे जेवायला येऊ शकत नाही. आपल्या देशात लाखो देशबांधव असे आहेत, ज्यांना पंचपक्वान्नाचे जेवणच काय, तर एकवेळचे जेवणही मिळत नाही. अशावेळी मी आपल्याकडे दोन वेळचे जेवण घेणे, हे पाप समजतो.'

डोळ्यातील अश्रू पुसत गोखले सर म्हणाले, `माझ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मला जीवनाचा पहिल्यांदा खरा अर्थ कळला. स्वत:साठी सगळेच जगतात, परंतु दुसऱ्यांसाठी जे जगतात, त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला असे म्हटले पाहिजे.'

गोखले सरांनी त्या दिवसापासून आपला साहेबी थाट सोडला. मऊ गादीवर झोपणे सोडले. स्वत: चरख्यावर सूत कातून खादी वस्त्र वापरू लागले. जीवनात साधेपणाआणा. सेवेचा वाटा उचलला. अशा रितीने त्यांचे अंतर्बाह्य परिवर्तन झाले. 

हेही वाचा : अमरत्व प्राप्त व्हावे, असे तुम्हालाही वाटत असेल, तर एकदा ही गोष्ट वाचाच!