शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

समाजाने अव्हेरलेली कुब्जा श्रीकृष्णाने आपलीशी कशी केली, त्यामागची छोटीशी सुंदर कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:00 IST

भगवंत सर्वांवर लक्ष ठेवून असतो, जो आपले काम प्रामाणिकपणे करतो, त्याला देव आपलेसे करतो.

आपली सकाळ होते, तीच अलार्मने. डोळे उघडल्यावर दृष्टीस पडतो मोबाईल. जगभरातल्या गोष्टी, रोजची कामे, अनेक तऱ्हेचे व्याप मानगुटीवर येऊन बसतात. मन उद्विग्न होते. झोप पूर्ण होऊनही कामाचा ताण दिवसभर राहतो आणि कामात राम वाटत नाही. यासाठीच समर्थ रामदास स्वामी सांगतात,

प्रभाते मनी राम चिंतीत जावा,पुढे वैखरी राम आधी वदावा,सदाचार हा थोर सोडू नये तो,जनी तोचि तो मानवी धन्य होतो।

सकाळची वेळ अतिशय शांत असते. त्यातही पहाटे लवकर उठता आले, तर उत्तमच. अशा वेळी मन शांत असते. ती शांतता कायम ठेवण्यासाठी देवाचे नाम घ्यावे. त्याच्या स्मरणाने दिवसाची प्रसन्न सुरुवात करावी. देवाला साक्ष ठेवून प्रत्येक काम करावे. आपल्याकडे देवाचे लक्ष आहे, हे लक्षात ठेवून सदाचार म्हणजे चांगले काम सोडू नये. वाईट कर्माचे फळ वाईट असते. हे लक्षात ठेवून शक्य तेवढ्या चांगल्या गोष्टी करत राहाव्यात. या चांगल्या कामाची दखल कोणी घेवो न घेवा, भगवंत जरूर घेतो. आता हेच उदाहरण बघा ना...

समाजाने धिक्कारलेली एक मामूली स्त्री, राजवाड्यात चंदन उगाळणे हेच तिचे काम होते. इतके सुंदर चंदन उगाळणारी दुसरी कुणी नव्हतीच. कुणा एकासाठी पहाटे उठून भक्तीने नामस्मरण करीत चंदन उगाळणारी ती `कुब्जा' होती. रुपाचा लवलेश नसलेली, ठेंगणी, पोक असलेली काळी, अशी स्री कुणाला प्रिय असणार? तिची निष्ठा, नामस्मरण, सतत परमात्म्याचे चिंतन कोणाला कळणार? जग बाह्य सौंदर्याचे भोक्ते. तिच्या वाट्याला नुसती अवहेलना.

परंतु एका मध्यरात्री, राधेसकट सगळी मथुरा निद्रिस्त. यमुनासुद्धा संथ, अस्तित्व फक्त भणभणणाऱ्या वाऱ्याचे. आता कुब्जेच्या भक्तीला भगवान श्रीकृष्णाचे रूप आठवता आठवता, चिंतन करता करता उधाण आलं होते. तन, मन कशाकशाचे तिला भान राहिले नव्हते. एवढेच काय, अंधारही जणू तिच्या भक्तीला घाबरला.

अचानक डोळे मिटलेली ती भानावर आली. पैलतीरावरून मुकुंदाच्या पाव्याचे मंजूळ सूर कानी पडताच स्वत:ला सावरीत तिने समोर बघितले. क्षणातच तिचे जीवन धन्य झाले. कारण भगवान करुणाद्र्र नजरेने तिला सांगत होते, `हा वेणुनाद तुझ्यासाठी आहे. फक्त तुझ्यासाठी. तुझ्या निष्ठेचे फळ, तू मागितले नाहीस तरीही. आपली ही भेट.'

समाजाने अव्हेरलेली कुब्जा भगवंताना प्रिय होती. तिचे रूप त्याला दिसले नव्हते. दिसली होती, ती केवळ निष्ठा. धन्य ती कुब्जा, धन्य तिची भक्ती! आईला ज्याप्रमाणे आपली सगळी मुले सारखी आवडतात, तशी देवालाही आपली लेकरे प्रिय असतात. 

म्हणून आपणही देवाचे स्मरण मनात ठेवून आनंदाने आणि सदाचाराने सर्व कामे पार पाडावीत. एक ना एक दिवस आपल्यालाही भगवद्कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.