शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

समाजाने अव्हेरलेली कुब्जा श्रीकृष्णाने आपलीशी कशी केली, त्यामागची छोटीशी सुंदर कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:00 IST

भगवंत सर्वांवर लक्ष ठेवून असतो, जो आपले काम प्रामाणिकपणे करतो, त्याला देव आपलेसे करतो.

आपली सकाळ होते, तीच अलार्मने. डोळे उघडल्यावर दृष्टीस पडतो मोबाईल. जगभरातल्या गोष्टी, रोजची कामे, अनेक तऱ्हेचे व्याप मानगुटीवर येऊन बसतात. मन उद्विग्न होते. झोप पूर्ण होऊनही कामाचा ताण दिवसभर राहतो आणि कामात राम वाटत नाही. यासाठीच समर्थ रामदास स्वामी सांगतात,

प्रभाते मनी राम चिंतीत जावा,पुढे वैखरी राम आधी वदावा,सदाचार हा थोर सोडू नये तो,जनी तोचि तो मानवी धन्य होतो।

सकाळची वेळ अतिशय शांत असते. त्यातही पहाटे लवकर उठता आले, तर उत्तमच. अशा वेळी मन शांत असते. ती शांतता कायम ठेवण्यासाठी देवाचे नाम घ्यावे. त्याच्या स्मरणाने दिवसाची प्रसन्न सुरुवात करावी. देवाला साक्ष ठेवून प्रत्येक काम करावे. आपल्याकडे देवाचे लक्ष आहे, हे लक्षात ठेवून सदाचार म्हणजे चांगले काम सोडू नये. वाईट कर्माचे फळ वाईट असते. हे लक्षात ठेवून शक्य तेवढ्या चांगल्या गोष्टी करत राहाव्यात. या चांगल्या कामाची दखल कोणी घेवो न घेवा, भगवंत जरूर घेतो. आता हेच उदाहरण बघा ना...

समाजाने धिक्कारलेली एक मामूली स्त्री, राजवाड्यात चंदन उगाळणे हेच तिचे काम होते. इतके सुंदर चंदन उगाळणारी दुसरी कुणी नव्हतीच. कुणा एकासाठी पहाटे उठून भक्तीने नामस्मरण करीत चंदन उगाळणारी ती `कुब्जा' होती. रुपाचा लवलेश नसलेली, ठेंगणी, पोक असलेली काळी, अशी स्री कुणाला प्रिय असणार? तिची निष्ठा, नामस्मरण, सतत परमात्म्याचे चिंतन कोणाला कळणार? जग बाह्य सौंदर्याचे भोक्ते. तिच्या वाट्याला नुसती अवहेलना.

परंतु एका मध्यरात्री, राधेसकट सगळी मथुरा निद्रिस्त. यमुनासुद्धा संथ, अस्तित्व फक्त भणभणणाऱ्या वाऱ्याचे. आता कुब्जेच्या भक्तीला भगवान श्रीकृष्णाचे रूप आठवता आठवता, चिंतन करता करता उधाण आलं होते. तन, मन कशाकशाचे तिला भान राहिले नव्हते. एवढेच काय, अंधारही जणू तिच्या भक्तीला घाबरला.

अचानक डोळे मिटलेली ती भानावर आली. पैलतीरावरून मुकुंदाच्या पाव्याचे मंजूळ सूर कानी पडताच स्वत:ला सावरीत तिने समोर बघितले. क्षणातच तिचे जीवन धन्य झाले. कारण भगवान करुणाद्र्र नजरेने तिला सांगत होते, `हा वेणुनाद तुझ्यासाठी आहे. फक्त तुझ्यासाठी. तुझ्या निष्ठेचे फळ, तू मागितले नाहीस तरीही. आपली ही भेट.'

समाजाने अव्हेरलेली कुब्जा भगवंताना प्रिय होती. तिचे रूप त्याला दिसले नव्हते. दिसली होती, ती केवळ निष्ठा. धन्य ती कुब्जा, धन्य तिची भक्ती! आईला ज्याप्रमाणे आपली सगळी मुले सारखी आवडतात, तशी देवालाही आपली लेकरे प्रिय असतात. 

म्हणून आपणही देवाचे स्मरण मनात ठेवून आनंदाने आणि सदाचाराने सर्व कामे पार पाडावीत. एक ना एक दिवस आपल्यालाही भगवद्कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.