शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

आयुष्यातील सगळ्या अडचणी, दु:खं दूर करण्यासाठी शालेय जीवनातला हा सोपा आणि प्रभावी उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 17:13 IST

जे लोक प्रश्न कधी सुटतील याचा विचार करतात, ते कायम अडकून राहतात आणि जे लोक प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करतात, ते हमखास परिस्थितीतून मार्ग काढतात.

मानसशास्त्राचा तास सुरू होणार होता. विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले होते. शिक्षक येताच सगळ्यांनी एकत्र उभे राहून त्यांना अभिवादन केले. शिक्षकांनी सर्वांना बसण्याची अनुमती दिली. टेबलावर पाण्याचा एक पेला आणि जग ठेवला होता. शिक्षकांनी रिकामा पेला अर्धा भरला आणि तो हातात धरत विद्यार्थ्यांकडे पाहिले. विद्यार्थ्यांना वाटले, आता नेहमीचा ठरलेला प्रश्न विचारला जाणार, `पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा?'

पण तसे झाले नाही. शिक्षकांनी वेगळाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, पाणी ओतलेल्या या पेल्याचे वजन साधारण किती असेल? या अनपेक्षित प्रश्नाने विद्यार्थी गोंधळले. त्यांनी आपल्या परीने वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांचे बोलून झाल्यावर शिक्षक म्हणाले, `पेल्याचे वजन किती आहे, हे महत्त्वाचे नसून पाण्याचा पेला तुम्ही किती वेळ धरून ठेवणार आहात, हे महत्त्वाचे आहे. हा पेला तुम्ही एक मिनिटं धरून ठेवला तर तुम्हाला त्याचे वजन जाणवणार नाही. तासभर धरून ठेवला, तर हाताला मुंग्या येतील. एक दिवसभर धरून ठेवला, तर हात जड होईल आणि कधी एकदा तो पेला हातून टाकून देतो असे होईल.

तीच बाब आपल्या समस्यांची आहे. आपले प्रश्न, समस्या यांच्याकडे काही क्षण पाहिले, तर आपल्याला त्रास होणार नाही. तासभर त्याचा विचार केला, तर डोके जड होईल. दिवसभर विचार केला तर डोके भणाणून जाईन. मग सबंध आयुष्य त्याच चिंतांचा, समस्यांचा विचार करत राहिलो तर वेड लागण्याचीच वेळ येईल. 

यावर उपाय हाच आहे, की जे प्रश्न सोडवता येतील त्याची उकल शोधण्याचा प्रयत्न करा. विचार करायचाच असेल तर पर्यायाचा करा, समस्यांचा नाही! तोही किती वेळ करायचा हे ठरवून टाका. कोणतेही कारण असो, त्रास तुम्हालाच होणार आहे. तो करून घेऊ नका. पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा याचबरोबर तो किती वेळ धरून ठेवायचा, याचाही विचार करून ठेवा. 

मनसोक्त जगा. प्रश्न आज आहेत उद्या नाहीत. परिस्थिती बदलत असते. अति विचाराने प्रश्न सुटत नाहीत. जे लोक प्रश्न कधी सुटतील याचा विचार करतात, ते कायम अडकून राहतात आणि जे लोक प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करतात, ते हमखास परिस्थितीतून मार्ग काढतात. जे प्रश्न सुटत नाहीत, ते सोडून द्या, आपोआप सुटतील. परंतु प्रश्नांमागे लागून आयुष्य संपवू नका. आयुष्यात करण्यासारखे बरेच काही आहे. यासाठी शाळेतला एक नियम लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्नपत्रिका हाती आल्यावर येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून आपण मोकळे होत असू आणि जे येत नाहीत, ते सोडून देत असू, हाच सोपा उपाय आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना उपयोगात आणू, म्हणजे सोडवलेले प्रश्न जास्त गुणांची कमाई करून देतील.