शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळाचा रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

तुमसर तालुक्यातील चांदपूर पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. हनुमान देवस्थानावरही भाविकांची गर्दीच असते. तसेच निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी ग्रीन व्हॅलीकडेही पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जलाशयापर्यंत जाण्यासाठी पर्यटन पॅकेज अंतर्गत सीमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील लोखंडी सळाखा निघाल्याचे दिसत आहे

ठळक मुद्देचांदपूर ग्रीन व्हॅली : अपघाताची भीती, सुरक्षाभिंतीची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : धार्मिक आणि निसर्गसंपन्न चांदपूर पर्यटनस्थळावर अलीकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र या ठिकाणी जाणारा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कायम अपघाताची भीती असून वाहन खोल दरीत कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी होत आहे.तुमसर तालुक्यातील चांदपूर पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. हनुमान देवस्थानावरही भाविकांची गर्दीच असते. तसेच निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी ग्रीन व्हॅलीकडेही पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जलाशयापर्यंत जाण्यासाठी पर्यटन पॅकेज अंतर्गत सीमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील लोखंडी सळाखा निघाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सीमेंट रस्ता तयार करताना खाईच्या बाजूला सुरक्षा भिंत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे वाहन कोसळण्याची भीती असते. हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असला तरी येणाऱ्या जाणाºया वाहनांमुळे येथे अपघाताची कायम भीती दिसून येते. यापूर्वी या रस्त्यावर अनेक मोटारसायकलचे अपघात झाले आहेत. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. या रस्त्यावर वळण असताना सूचना फलक लावण्यात आले नाही. जलाशय परिसरात अतिरिक्त जागा नसल्याने सीमेंट रस्त्यावरच चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अन्य वाहनांना मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. प्रत्येक जण येथे वाहन घेऊनच येतो. परंतु येथे कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो.या पर्यटनस्थळात विश्रामगृहाचे बांधकाम सुरु आहे. त्यानंतर रिसॉर्टचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. परंतु जलाशय परिसरात बोटींग, हॉटेल व अन्य विकास कामांना सुरुवात करण्यात आले नाही. हे विकास कामे करताना रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अपेक्षा आहे. पर्यटनातून रोजगार संधी देणाºया या स्थळाकडे रस्त्यामुळे पर्यटक पाठ फिरवत असल्याचे सध्या दिसत आहे.सीमेंट रस्त्याची रुंदी अतिशय कमी आहे. एका वेळेस दोन वाहने जाऊ शकत नाही. एका बाजूला खोल दरी असल्याने अपघाताची भीती आहे. रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.-हेमराज लांजे, माजी सरपंच, चांदपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा