शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

घरातून आजारपण जात नाहीये? वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 16:21 IST

वास्तूशास्त्रानुसार घरात दीर्घकाळ आजारपण टिकण्याचे कारण घरातल्या वास्तुदोषांना जाते. ते वास्तुदोष दूर कसे करता येतील हे जाणून घेऊया. 

अनेकदा आपण आरोग्याची, आहाराची उचित काळजी घेऊनही घरात आजारपणाचा शिरकाव होतो. छोटे मोठी दुखणी प्रत्येकालाच होत असतात. परंतु जेव्हा एखाद्याचे आजारपण दीर्घकाळ जात नाही आणि त्या व्यक्तीची सेवा सुश्रुषा करून घरातील इतर सदस्यांना आजारपण येते, तेव्हा औषध उपचार यांबरोबरच वास्तुशास्त्रात दिलेले काही उपाय अवश्य करून पहा. 

वास्तूशास्त्रानुसार घरात दीर्घकाळ आजारपण टिकण्याचे कारण घरातल्या वास्तुदोषांना जाते. ते वास्तुदोष दूर कसे करता येतील हे जाणून घेऊया. 

तुमच्या राहत्या घराच्या किंवा इमारतीच्या समोर एखादा मोठा खड्डा असेल, तर तो आधी बुजवून घ्या. त्यामुळे घरातल्या सदस्यांना शारीरिक, मानसिक दुखणी उद्भ्वत राहतात. त्याचप्रमाणे घराच्या, इमारतीच्या समोरील मुख्य बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. तो परिसर अस्वच्छ असल्यास तेही आजारपणाचे कारण बनते. 

वास्तूचा मध्यभाग रिकामा असायला हवा. त्याला वास्तूचे ब्रह्मस्थान म्हणतात. पूर्वीच्या काळी चौसोपी वाड्यात मधला भाग अंगणासारखा मोकळा असे. आताच्या काळात घरात तसे मोकळे अंगण करता आले नाही, तरी निदान त्या जागेवर जड सामान, फर्निचर, सोफासेट, टेबल या गोष्टी ठेवू नयेत. तेवढा भाग मोकळा ठेवला पाहिजे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो, असे वास्तुशास्त्र सांगते. 

उत्तर पूर्व दिशा, ज्याला ईशान्य कोन म्हटले जाते, ती जागा भगवंताच्या वास्तव्याची समजली जाते. त्या दिशेला टॉयलेट किंवा शिडी असणे, वास्तुदोषाचे मोठे कारण मानले जाते. त्यामुळे घरात सतत आजारपण येते. महिलांना देखील शारीरिक व्याधी संभवतात. त्या दिशेला देवघर असणेच शुभ ठरते. परंतु आता त्यात बदल करणे शक्य नसेल, तर किमान घराचा प्रत्येक ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि आजारी व्यक्तीने ईशान्येकडे डोके करून झोपू नये. या नियमांचे पालन करावे. 

वास्तूमध्ये स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय दिशेला असले पाहिजे. ती दिशा स्वयंपाकघराच्या दृष्टीने लाभदायक ठरते. परंतु तसे नसेल, तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसते. विशेषतः घरातल्या कमावत्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होतो. परंतु तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल, तर जिथे स्वयंपाक घर आहे, त्या जागी भिंतींना ट्रॉली किचनला लाल रंग लावून घ्यावा. म्हणजे वास्तुदोष दूर होऊन सर्वांची तब्येत ठीक राहते.