शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Shravan 2022: श्रावण महिना केवळ सण उत्सवाचा नाही, तर देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:05 IST

Shravan 2022: यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. या महिन्याची एका नव्या दृष्टिकोनातून ओळख करून घेऊ. 

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

लहानपणापासून मनात वसलेली एक कविता श्रावण महिन्याची चाहूल लागताच आबाल-वृद्धांच्या, स्त्री-पुरुषांच्या ओठावर अलगद येते, ती म्हणजे, 'श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहिकडे.'

नुकतीच पेरणी संपल्याने शेतकऱ्याला कामातून सवड मिळते.व्यावहारिक प्रयत्नांना यश मिळावे, ही भावना ठेवून आत्मिक शांतीसाठी पावसाळ्याचे चार महिने तो ईशस्तवनात घालवतो. म्हणूनच श्रावण महिना डवरलेल्या गुलमोहरासारख्या सणांनी नुसता बहरलेला असतो. विविध रंगांची उधळण करून, विविध आकाराच्या पुष्पगुच्छांचे अलंकार लेऊन निसर्ग श्रुंगारलेला असतो. सगळीकडे आनंदी आनंद. धरणीमाता अंगरभर हिरवागार शालू नेसून या आनंदात सामील होते. निसर्गाचं स्वरूप साजश्रुंगारात युवतीप्रमाणे मनाला मोहून टाकते.

श्रावण हा देवधर्म, देशधर्म आणि कृषीधर्माचा महिना. वाण-वैभवाने सृष्टी श्रावणात नटते. हरीभरीत होते. परंतु, वास्तव मात्र वेगळे आहे. ते असे की, दुर्दैवाने मानवी हव्यास आणि आक्रमणामुळे हिरवळ कमी होत आहे. डोंगरदऱ्या उघड्या बोडक्या झाल्या आहेत. नद्या नाले, तलाव, ओढा, झरे कोरडे झाले आहेत. त्यामुळे जमिनीत आणि आकाशात पाणीच नाही. निसर्गाचे सृष्टीचक्र बदलले आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची अत्यावशकता वाढली आहे. त्यासाठी सर्वांनीच परस्पर सहकार्यासाठी कंबर कसली पाहिजे. नुसते, `वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणून चालणार नाही, तशी कृती करावयास हवी.

श्रावण म्हटला, की सुरुवातीला हमखास आठवतो, तो श्रावणी सोमवार. एकभुक्त उपवास, शिवदर्शन, शिवाभिषेक, रुद्राभिषेक, एकादशणी, लघुरुद्र, सहस्रबेल, शिवपूजन. शिवपूजा ही बघण्यासारखी असते. पुष्परचना सुंदर केलेली असते. वस्रप्रावरण, चांदीचे मुखवटे, पंचामृती स्नान, धूप, दीप, मिठाई, फळं, पक्वान्न अन् शंऽऽऽऽभोऽऽऽ अशी मोठ्याने आरोळी. मग आरती, प्रार्थना, मंत्रपुष्पांजली, अर्धी प्रदक्षिणा, पूर्ण दक्षिणा.

या दिवशी भोपळ्याचे महत्त्व जास्तच! गंगाफळ म्हणतात त्याला. उपास सोडण्यासाठी भोपळ्याची भाजी, भजी, आमटी, भरीत, दशम्या, सालाची चटणी, इ. प्रकार भोपळ्याचेच! दूधा-तुपाची रेलचेल असते. हिरवे हिरवे कोवळे गवत खाऊन धष्ट-पुष्ट झालेल्या गायी-बकऱ्या भरपूर दूध देतात. अर्थात, बोर्नव्हिटा, सूप, टू मिनिट्स, कॉम्पेन, न्यूडल्स, मॅगी खाणाऱ्या पिणाऱ्या बॉईज, गर्ल्सना याची खुमारी कधी आणि कशी कळणार? अशा वाट चुकलेल्या पिढीला आपल्या संस्कृतीकडे पुनश्च वळवणारा असा हा श्रावण!

सोमवारी शिवामूठ, मूग, तांदूळ, तीळ इ. धान्य यथाशक्ती किंवा कमीत कमी मूठभर, मंदिरात वाहतात. त्यात दानाचं महत्त्व आपल्याकडील थोडंसं दुसऱ्याला देण्याचं महत्त्व, जगा आणि जगू द्या, असा संदेश वदवून दिला आहे. थेंबे थेंबे तळे साचे. कहाणीतील म्हातारीने घरच्या सर्वांना तृप्त करून मगच छोटा पेलाभर दूध गाभाऱ्यात ओतून राजाकडून गावभरचे दूध सक्तीने आणि शक्तीने ओतूनही न भरलेला गाभारा क्षणात भरला, हा चमत्कार नसून साक्षात्कार आह़े एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, किंवा गाव करी ते राव काय करी, या म्हणी सार्थ करणाऱ्या त्या घटना आहेत. मंदिराची निगा राखणारे भोपी, गुरव, पुजारी, बेलफुल विकणारी, ब्राह्मण, व्यवस्थापक, सेवक, सफाईवाला, इ. लोकांना त्यांनी केलेल्या सेवेच्या मोबदल्यात मेवा मिळावा, यासाठी हे अल्पसे दान, पुण्य, धर्म! त्यांना त्यादिवशीचे पूर्ण वाढलेले ताट केळीच्या पानावर, नैवेद्य म्हणून नेऊन देतात. हे ताट चारीठाव उजवे-डावे बघून सर्व अद्ययावत पदार्थ त्यात वाढलेले असतात. त्याचा स्वाद आणि तृप्तता अगदी वेगळी असते. आजकालच्या तयार खाद्यपदार्थांच्या जमान्यात अशी तृप्तता मिळणे कठीण आहे.

चला तर मग, आपणही या श्रावणात देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावूया!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल