शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शिवमहिम्न स्तोत्र : म्हणायला अवघड परंतु अत्यंत लाभदायी; दर सोमवारी म्हणा आणि अनुभव घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 07:00 IST

Shiv Mahimna Stotra : महादेवाच्या उपासनेला शिव महिम्न स्तोत्राची जोड दिली की उपासना लवकर फळते असे स्तोत्रकार लिहितात; सविस्तर जाणून घेऊ!

>> योगेश काटे, नांदेड 

भारतीय जनमानसात विविध स्तोत्र प्रसिद्ध आहेत. पण, चिरकाल स्थिर झालेली स्त्रोत्रे फार मोजकी आहे. त्यात विष्णुसहस्रनाम, रामरक्षा ,अर्थवशीर्ष, दुर्गाकवच  व शिवमहिम्नस्तोत्र यांचा समावेश करावा लागेल. यात महिम्नस्तोत्राचे स्थान आगळे वेगळे आहे. शिखरिणी, हरिणी, मालिनी वृत्तांत गुंफलेले हे प्रासादिक शिवस्तोत्र आसेतुहिमाचल परंपरेने आजही तेवढ्याच श्रध्देने आबालवृद्ध, राव रंक इ सर्व.स्तरातुन आजही तेवढ्याच श्रध्देने म्हणले जाते. 

संस्कृत साहित्यात शिवमहिम्न या स्तोत्राचे वर्णन गहन तत्वप्रतिपादक असे केले आहे. या अशा स्तोत्राचा कर्ता गंधर्वराज पुष्पदंत राजाविषयी आपण थोडे जाणुन घेणार आहोत. शिवमहिम्नस्तोत्राचा रचयिता कुसुमदशन अर्थात सर्व गंधर्वांचा राजा पुष्पदंत हा होता. भगवान् आशुतोष ( शंकर ) यांच्या गणात पुष्पदंत नावाचा एक खुप आवडता गण होता. तो शिव पार्वतीच्या सेवेमध्ये तत्पर असे. एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे महिम्नस्तोत्राचा उगम झाला. ती घटना अशी-

देवी पार्वती व भगवान् आशुतोष यांचा संवाद नेहमी होत असे. मात्र त्या दिवशी  देवी अपर्णेने अनेक कथा ऐकल्या व म्हणाल्या आतापर्यंत कोणालाही माहीत नसलेली कथा मला सांगवी. भगवान् आशुतोष म्हणाले, 'हो सांगतो, मात्र ही कथा सांगताना कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून नंदीस दारावर पाहारा देण्यास सांगतो व आतामध्ये कोणालाही सोडू नकोस अशी तंबी देतो.

थोड्या वेळाने गंधर्वराज पुष्पदंत तिथे पुजेसाठी आले. मात्र नंदी महाराजांनी त्यांना अडवले. आतमध्ये काय विशेष चर्चा चालू असेल या उत्सुतेपोटी पुष्पदंताने त्याच्याजवळ असलेल्या अणिमा शक्तीचा उपयोग करुन आत शिरकाव केला आणि भगवान् शंकरांकडून यापूर्वी कोणीही न ऐकलेली अद्भूतकथा ऐकली व घरी आल्यावर आपल्या जया नामक भार्येस सांगितली. जया आणि देवी पार्वात या सखी असल्यामुळें वेगवेगळया विषयांवर चर्चा सुरु झाली..बोलताना  जयाने पुष्पदंताने सांगितलेली कथा पार्वतीस सांगितली. ती ऐकुन पार्वतीस आश्चर्य वाटले तिने शंकरास विचारले तुम्ही मला सांगितलेली कथा कोणासच माहिती नव्हती ना तर पुष्पादंताच्या बायकोस कशी समजली. भगवान् आशुतोष यांनी नंदीकडे चौकशी केली. तेव्हा नंदीने पुष्पदंत आला होता असे संगितले पण त्याला आडवले होते हेही सांगितले. 

भगवान् आशुतोष यांना  त्याच्या अणिमा शक्ती माहिती असल्यामुळे त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. हा सर्व प्रकार पार्वतीस सांगितला. तिने गंधर्वराजास शाप दिला, तुला मनुष्य जन्म घ्यावा लागले. त्याने उ:शाप मागितला. तेंव्हा उमेने उःशाप दिला. मनुष्ययोनित गेल्यानंतर सुप्रतिक यक्ष भेटेल. त्याला कुबेराचा शाप मिळाल्यामुळे विंध्य पर्वातावर तो पिशाच्च होवुन हिंडताना दिसेल. त्याला सर्व हकीकत सांग म्हणजे तुला तुझे पहिले स्वरूप प्राप्त होईल. 

अशाप्रकारे पुष्पदंताची शापातून मुक्तता झाली आणि त्याने शिवमहिम्नस्तोत्राची निर्मिती केली. पुष्पदंताने हे स्तोत्र  खुप प्रसन्न भाषेत लिहले आहे. यात सर्व शास्त्रीय विचारांचा. परिपोष  त्याने केला आहे. पुढे पुष्पदंताने कात्यायन नावाने जन्म घेतला. त्याने पाणिनीच्या अष्टाध्यायीत वार्तिक स्वरुपाने मोलाची भर घातली. अशा पुष्पदंतास साष्टांग दंडवत. 

हे स्तोत्र म्हणायला अवघड असले तरी त्यामुळे भाषाशुद्धी होते, मन प्रसन्न होते शिवाय पापदोष निवारण होते. म्हणून या स्तोत्राचे श्रवण आणि शक्य झाल्यास पठण करावे असे सांगितले जाते. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी