शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिवमहिम्न स्तोत्र : म्हणायला अवघड परंतु अत्यंत लाभदायी; दर सोमवारी म्हणा आणि अनुभव घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 07:00 IST

Shiv Mahimna Stotra : महादेवाच्या उपासनेला शिव महिम्न स्तोत्राची जोड दिली की उपासना लवकर फळते असे स्तोत्रकार लिहितात; सविस्तर जाणून घेऊ!

>> योगेश काटे, नांदेड 

भारतीय जनमानसात विविध स्तोत्र प्रसिद्ध आहेत. पण, चिरकाल स्थिर झालेली स्त्रोत्रे फार मोजकी आहे. त्यात विष्णुसहस्रनाम, रामरक्षा ,अर्थवशीर्ष, दुर्गाकवच  व शिवमहिम्नस्तोत्र यांचा समावेश करावा लागेल. यात महिम्नस्तोत्राचे स्थान आगळे वेगळे आहे. शिखरिणी, हरिणी, मालिनी वृत्तांत गुंफलेले हे प्रासादिक शिवस्तोत्र आसेतुहिमाचल परंपरेने आजही तेवढ्याच श्रध्देने आबालवृद्ध, राव रंक इ सर्व.स्तरातुन आजही तेवढ्याच श्रध्देने म्हणले जाते. 

संस्कृत साहित्यात शिवमहिम्न या स्तोत्राचे वर्णन गहन तत्वप्रतिपादक असे केले आहे. या अशा स्तोत्राचा कर्ता गंधर्वराज पुष्पदंत राजाविषयी आपण थोडे जाणुन घेणार आहोत. शिवमहिम्नस्तोत्राचा रचयिता कुसुमदशन अर्थात सर्व गंधर्वांचा राजा पुष्पदंत हा होता. भगवान् आशुतोष ( शंकर ) यांच्या गणात पुष्पदंत नावाचा एक खुप आवडता गण होता. तो शिव पार्वतीच्या सेवेमध्ये तत्पर असे. एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे महिम्नस्तोत्राचा उगम झाला. ती घटना अशी-

देवी पार्वती व भगवान् आशुतोष यांचा संवाद नेहमी होत असे. मात्र त्या दिवशी  देवी अपर्णेने अनेक कथा ऐकल्या व म्हणाल्या आतापर्यंत कोणालाही माहीत नसलेली कथा मला सांगवी. भगवान् आशुतोष म्हणाले, 'हो सांगतो, मात्र ही कथा सांगताना कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून नंदीस दारावर पाहारा देण्यास सांगतो व आतामध्ये कोणालाही सोडू नकोस अशी तंबी देतो.

थोड्या वेळाने गंधर्वराज पुष्पदंत तिथे पुजेसाठी आले. मात्र नंदी महाराजांनी त्यांना अडवले. आतमध्ये काय विशेष चर्चा चालू असेल या उत्सुतेपोटी पुष्पदंताने त्याच्याजवळ असलेल्या अणिमा शक्तीचा उपयोग करुन आत शिरकाव केला आणि भगवान् शंकरांकडून यापूर्वी कोणीही न ऐकलेली अद्भूतकथा ऐकली व घरी आल्यावर आपल्या जया नामक भार्येस सांगितली. जया आणि देवी पार्वात या सखी असल्यामुळें वेगवेगळया विषयांवर चर्चा सुरु झाली..बोलताना  जयाने पुष्पदंताने सांगितलेली कथा पार्वतीस सांगितली. ती ऐकुन पार्वतीस आश्चर्य वाटले तिने शंकरास विचारले तुम्ही मला सांगितलेली कथा कोणासच माहिती नव्हती ना तर पुष्पादंताच्या बायकोस कशी समजली. भगवान् आशुतोष यांनी नंदीकडे चौकशी केली. तेव्हा नंदीने पुष्पदंत आला होता असे संगितले पण त्याला आडवले होते हेही सांगितले. 

भगवान् आशुतोष यांना  त्याच्या अणिमा शक्ती माहिती असल्यामुळे त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. हा सर्व प्रकार पार्वतीस सांगितला. तिने गंधर्वराजास शाप दिला, तुला मनुष्य जन्म घ्यावा लागले. त्याने उ:शाप मागितला. तेंव्हा उमेने उःशाप दिला. मनुष्ययोनित गेल्यानंतर सुप्रतिक यक्ष भेटेल. त्याला कुबेराचा शाप मिळाल्यामुळे विंध्य पर्वातावर तो पिशाच्च होवुन हिंडताना दिसेल. त्याला सर्व हकीकत सांग म्हणजे तुला तुझे पहिले स्वरूप प्राप्त होईल. 

अशाप्रकारे पुष्पदंताची शापातून मुक्तता झाली आणि त्याने शिवमहिम्नस्तोत्राची निर्मिती केली. पुष्पदंताने हे स्तोत्र  खुप प्रसन्न भाषेत लिहले आहे. यात सर्व शास्त्रीय विचारांचा. परिपोष  त्याने केला आहे. पुढे पुष्पदंताने कात्यायन नावाने जन्म घेतला. त्याने पाणिनीच्या अष्टाध्यायीत वार्तिक स्वरुपाने मोलाची भर घातली. अशा पुष्पदंतास साष्टांग दंडवत. 

हे स्तोत्र म्हणायला अवघड असले तरी त्यामुळे भाषाशुद्धी होते, मन प्रसन्न होते शिवाय पापदोष निवारण होते. म्हणून या स्तोत्राचे श्रवण आणि शक्य झाल्यास पठण करावे असे सांगितले जाते. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी