शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Shiv Puja: दर सोमवारी का म्हणावे शिवमहिम्न स्तोत्र? जाणून घ्या लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 07:00 IST

Shiv Puja :शिवमहिम्न स्तोत्र : म्हणायला अवघड परंतु अत्यंत लाभदायी; दर सोमवारी म्हणा आणि अनुभव घ्या!

>> योगेश काटे, नांदेड 

भारतीय जनमानसात विविध स्तोत्र प्रसिद्ध आहेत. पण, चिरकाल स्थिर झालेली स्त्रोत्रे फार मोजकी आहे. त्यात विष्णुसहस्रनाम, रामरक्षा ,अर्थवशीर्ष, दुर्गाकवच  व शिवमहिम्नस्तोत्र यांचा समावेश करावा लागेल. यात महिम्नस्तोत्राचे स्थान आगळे वेगळे आहे. शिखरिणी, हरिणी, मालिनी वृत्तांत गुंफलेले हे प्रासादिक शिवस्तोत्र आसेतुहिमाचल परंपरेने आजही तेवढ्याच श्रध्देने आबालवृद्ध, राव रंक इ सर्व.स्तरातुन आजही तेवढ्याच श्रध्देने म्हणले जाते. 

संस्कृत साहित्यात शिवमहिम्न या स्तोत्राचे वर्णन गहन तत्वप्रतिपादक असे केले आहे. या अशा स्तोत्राचा कर्ता गंधर्वराज पुष्पदंत राजाविषयी आपण थोडे जाणुन घेणार आहोत. शिवमहिम्नस्तोत्राचा रचयिता कुसुमदशन अर्थात सर्व गंधर्वांचा राजा पुष्पदंत हा होता. भगवान् आशुतोष ( शंकर ) यांच्या गणात पुष्पदंत नावाचा एक खुप आवडता गण होता. तो शिव पार्वतीच्या सेवेमध्ये तत्पर असे. एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे महिम्नस्तोत्राचा उगम झाला. ती घटना अशी-

देवी पार्वती व भगवान् आशुतोष यांचा संवाद नेहमी होत असे. मात्र त्या दिवशी  देवी अपर्णेने अनेक कथा ऐकल्या व म्हणाल्या आतापर्यंत कोणालाही माहीत नसलेली कथा मला सांगवी. भगवान् आशुतोष म्हणाले, 'हो सांगतो, मात्र ही कथा सांगताना कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून नंदीस दारावर पाहारा देण्यास सांगतो व आतामध्ये कोणालाही सोडू नकोस अशी तंबी देतो.

थोड्या वेळाने गंधर्वराज पुष्पदंत तिथे पुजेसाठी आले. मात्र नंदी महाराजांनी त्यांना अडवले. आतमध्ये काय विशेष चर्चा चालू असेल या उत्सुतेपोटी पुष्पदंताने त्याच्याजवळ असलेल्या अणिमा शक्तीचा उपयोग करुन आत शिरकाव केला आणि भगवान् शंकरांकडून यापूर्वी कोणीही न ऐकलेली अद्भूतकथा ऐकली व घरी आल्यावर आपल्या जया नामक भार्येस सांगितली. जया आणि देवी पार्वात या सखी असल्यामुळें वेगवेगळया विषयांवर चर्चा सुरु झाली..बोलताना  जयाने पुष्पदंताने सांगितलेली कथा पार्वतीस सांगितली. ती ऐकुन पार्वतीस आश्चर्य वाटले तिने शंकरास विचारले तुम्ही मला सांगितलेली कथा कोणासच माहिती नव्हती ना तर पुष्पादंताच्या बायकोस कशी समजली. भगवान् आशुतोष यांनी नंदीकडे चौकशी केली. तेव्हा नंदीने पुष्पदंत आला होता असे संगितले पण त्याला आडवले होते हेही सांगितले. 

भगवान् आशुतोष यांना  त्याच्या अणिमा शक्ती माहिती असल्यामुळे त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. हा सर्व प्रकार पार्वतीस सांगितला. तिने गंधर्वराजास शाप दिला, तुला मनुष्य जन्म घ्यावा लागले. त्याने उ:शाप मागितला. तेंव्हा उमेने उःशाप दिला. मनुष्ययोनित गेल्यानंतर सुप्रतिक यक्ष भेटेल. त्याला कुबेराचा शाप मिळाल्यामुळे विंध्य पर्वातावर तो पिशाच्च होवुन हिंडताना दिसेल. त्याला सर्व हकीकत सांग म्हणजे तुला तुझे पहिले स्वरूप प्राप्त होईल. 

अशाप्रकारे पुष्पदंताची शापातून मुक्तता झाली आणि त्याने शिवमहिम्नस्तोत्राची निर्मिती केली. पुष्पदंताने हे स्तोत्र  खुप प्रसन्न भाषेत लिहले आहे. यात सर्व शास्त्रीय विचारांचा. परिपोष  त्याने केला आहे. पुढे पुष्पदंताने कात्यायन नावाने जन्म घेतला. त्याने पाणिनीच्या अष्टाध्यायीत वार्तिक स्वरुपाने मोलाची भर घातली. अशा पुष्पदंतास साष्टांग दंडवत. 

हे स्तोत्र म्हणायला अवघड असले तरी त्यामुळे भाषाशुद्धी होते, मन प्रसन्न होते शिवाय पापदोष निवारण होते. म्हणून या स्तोत्राचे श्रवण आणि शक्य झाल्यास पठण करावे असे सांगितले जाते. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी