शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shani Puja : शनी पूजेत दानाला आणि सेवेला अधिक महत्त्व का आणि कसे आहे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 11:04 IST

Shani Puja: शनी देव हे कितीही कडक शिस्तीचे असले पुढील उपाय केल्यास भक्तांवर त्वरित उपाय करतात. 

भारतीय संस्कृतीत दान आणि सेवेला खूप महत्त्व आहे. लोक नेमके त्याच गोष्टीत कमी पडतात. मात्र या दोन्ही गोष्टींमुळे सर्वाधिक पुण्यसंचय होतो. हे लक्षात घेऊन लोकांना या गोष्टींची सवय जडावी म्हणून शनी देवांनी अशी सेवा करणाऱ्या लोकांना विशेष कृपेस पात्र ठरवतात. याबरोबर पुढील उपायही तेवढेच महत्त्वाचे आहेत. 

धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. देवापाशी दिवा लावल्याने केवळ देव्हाराच नव्हे तर आपले अंतर्मनदेखील उजळून निघते. मन प्रसन्न होते. सकारात्मकता वाढते. मनातील भीती नष्ट होते. यादृष्टीने आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो. काही जण तुपाचा तर काही जण तेलाचा दिवा लावतात. 

शनी देवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला पसंत असल्याने आपण शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. त्यात फक्त एका गोष्टीची भर घालायची आहे. ती म्हणजे तेलाच्या दिव्यात एक लवंग देखील टाका. लवंगीचा वापर वास्तुशास्त्राने देखील सुचवला आहे आणि भाग्योदयासाठी ज्योतिष शास्त्रानेदेखील पुष्टी दिली आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार हा छोटासा उपाय केल्यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते. आर्थिक लाभ होतो. आणि या उपायात सातत्य ठेवले तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 

या उपायाबरोबर पुढील गोष्टीदेखील लक्षात ठेवा:

>> हिंदू धर्मातील पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान कापूर वापरला जातो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळला जातो. मात्र कापूर नियमितपणे जाळताना लक्षात ठेवा की कापूर शुद्ध असावा.

>> त्याचबरोबर धर्मग्रंथांमध्येही दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. म्हणून आपल्या हाताने शक्य तितके दान करा. गरीब आणि गरजूंना मदत करा.

>> ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात प्रगती होण्यासाठी पशु पक्ष्यांना घासातला घास काढून द्या! असे केल्यास करिअर आणि जीवनात प्रगतीसोबतच यश मिळते.

>> धनधान्याने घरात सुबत्ता राहावी म्हणून रोज तव्यावर केलेली पोळी गायीला, कुत्र्याला, कावळ्याला घाला. आर्थिक अडचणी दूर होतील. 

>> आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग दान करावा असे धर्मशास्त्र सांगते. कारण आपण समाजाचे केवळ घेणेकरीच नाही, तर देणेकरी देखील असतो. 

>> आपल्या सत्कार्याची आणि दुष्कृत्याची चित्रगुप्त नोंद ठेवत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्य देवाला स्मरून करत राहा, कसलीही उणीव भासणार नाही!