शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
7
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
8
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
9
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
10
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
12
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
13
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
14
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
15
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
16
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
17
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
18
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
19
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
20
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

Shaligram Pooja Rules: शाळिग्रामच्या पूजेने मिळते सुख, शांती, संपत्ती, फक्त त्याचे पावित्र्य जपताना घ्या 'ही'काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:36 IST

Shaligram Pooja Rules: जर तुम्ही घरी शालिग्रामची पूजा करत असाल तर या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.

हिंदू धर्मात पूजेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. कोणत्याही देवतेच्या पूजेचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा त्यांची यथासांग पूजा केली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही घरामध्ये शाळीग्राम पूजत असाल, तर त्याचे काही नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे. 

शाळीग्राम हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. काळ्या रंगाच्या गोल गुळगुळीत दगडाला शाळीग्राम म्हणतात. ते तुळशी दलावर ठेवले जातात. असे म्हणतात, की भगवान शाळीग्रामची पूजा करताना अनवधानाने काही चुका झाल्या तर भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मी मातेचीही नाराजी सहन करावी लागते. यासाठीच शाळीग्राम पूजनाचे नियम जाणून घेऊया. 

शालिग्रामची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

>>शाळीग्राम हा स्वयंभू विष्णू आहे असे शास्त्रात मानले जाते. जर तुम्ही घरात शाळीग्रामची स्थापना केली असेल तर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात तणाव निर्माण होऊ शकतो.

>>शाळीग्रामच्या पूजेत चुकूनही अक्षता वापरू नका. अक्षता म्हणजे तांदूळ. त्या वाहायच्याच असतील तर त्याला हळद लावलेली असावी, पांढरे तांदूळ अर्पण करू नये.  

>>धर्मशास्त्रानुसार, शाळीग्राममध्ये अपार ऊर्जा असते. शाळीग्राम घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. मात्र पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर घरावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो. मतभेद वाढू लागतात. आणि कुटुंबावर कर्जाचा डोंगर चढू लागतो.

>>ज्यांच्या देवघरात शाळीग्राम असेल त्यांनी देवघरात शाळीग्राम ठेवण्यासाठी स्वतंत्र आसन ठेवावे. त्यावर तुळशीची पाने अंथरावीत. वर शाळीग्राम ठेवावा आणि तुळशीची पाने वहावीत. शाळीग्रामची नित्य पूजा करावी. 

>>शाळीग्राम बाजारातून विकत आणू नये.संत महंत, गुरु, संन्याशी यांनी दिलेला शाळिग्रामच देवघरात ठेवावा. किंवा वंश परंपरेने आपल्या घराण्यात शाळिग्रामची पूजा होत असेल तरच तो हस्तांतरित करून पुढच्या पिढीकडे द्यावा. 

>>काही कारणाने शाळीग्राम विसर्जित करण्याची वेळ आली तर त्याची शास्त्रशुद्ध पूजा, अभिषेक करून मगच भगवान महाविष्णूंची माफी मागून स्वच्छ वाहत्या नदीत तो विसर्जित करावा.