शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shaligram Pooja Rules: शाळिग्रामच्या पूजेने मिळते सुख, शांती, संपत्ती, फक्त त्याचे पावित्र्य जपताना घ्या 'ही'काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:36 IST

Shaligram Pooja Rules: जर तुम्ही घरी शालिग्रामची पूजा करत असाल तर या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.

हिंदू धर्मात पूजेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. कोणत्याही देवतेच्या पूजेचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा त्यांची यथासांग पूजा केली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही घरामध्ये शाळीग्राम पूजत असाल, तर त्याचे काही नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे. 

शाळीग्राम हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. काळ्या रंगाच्या गोल गुळगुळीत दगडाला शाळीग्राम म्हणतात. ते तुळशी दलावर ठेवले जातात. असे म्हणतात, की भगवान शाळीग्रामची पूजा करताना अनवधानाने काही चुका झाल्या तर भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मी मातेचीही नाराजी सहन करावी लागते. यासाठीच शाळीग्राम पूजनाचे नियम जाणून घेऊया. 

शालिग्रामची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

>>शाळीग्राम हा स्वयंभू विष्णू आहे असे शास्त्रात मानले जाते. जर तुम्ही घरात शाळीग्रामची स्थापना केली असेल तर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात तणाव निर्माण होऊ शकतो.

>>शाळीग्रामच्या पूजेत चुकूनही अक्षता वापरू नका. अक्षता म्हणजे तांदूळ. त्या वाहायच्याच असतील तर त्याला हळद लावलेली असावी, पांढरे तांदूळ अर्पण करू नये.  

>>धर्मशास्त्रानुसार, शाळीग्राममध्ये अपार ऊर्जा असते. शाळीग्राम घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. मात्र पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर घरावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो. मतभेद वाढू लागतात. आणि कुटुंबावर कर्जाचा डोंगर चढू लागतो.

>>ज्यांच्या देवघरात शाळीग्राम असेल त्यांनी देवघरात शाळीग्राम ठेवण्यासाठी स्वतंत्र आसन ठेवावे. त्यावर तुळशीची पाने अंथरावीत. वर शाळीग्राम ठेवावा आणि तुळशीची पाने वहावीत. शाळीग्रामची नित्य पूजा करावी. 

>>शाळीग्राम बाजारातून विकत आणू नये.संत महंत, गुरु, संन्याशी यांनी दिलेला शाळिग्रामच देवघरात ठेवावा. किंवा वंश परंपरेने आपल्या घराण्यात शाळिग्रामची पूजा होत असेल तरच तो हस्तांतरित करून पुढच्या पिढीकडे द्यावा. 

>>काही कारणाने शाळीग्राम विसर्जित करण्याची वेळ आली तर त्याची शास्त्रशुद्ध पूजा, अभिषेक करून मगच भगवान महाविष्णूंची माफी मागून स्वच्छ वाहत्या नदीत तो विसर्जित करावा.