शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

Shaligram Pooja Rules: शाळिग्रामच्या पूजेने मिळते सुख, शांती, संपत्ती, फक्त त्याचे पावित्र्य जपताना घ्या 'ही'काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:36 IST

Shaligram Pooja Rules: जर तुम्ही घरी शालिग्रामची पूजा करत असाल तर या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.

हिंदू धर्मात पूजेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. कोणत्याही देवतेच्या पूजेचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा त्यांची यथासांग पूजा केली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही घरामध्ये शाळीग्राम पूजत असाल, तर त्याचे काही नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे. 

शाळीग्राम हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. काळ्या रंगाच्या गोल गुळगुळीत दगडाला शाळीग्राम म्हणतात. ते तुळशी दलावर ठेवले जातात. असे म्हणतात, की भगवान शाळीग्रामची पूजा करताना अनवधानाने काही चुका झाल्या तर भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मी मातेचीही नाराजी सहन करावी लागते. यासाठीच शाळीग्राम पूजनाचे नियम जाणून घेऊया. 

शालिग्रामची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

>>शाळीग्राम हा स्वयंभू विष्णू आहे असे शास्त्रात मानले जाते. जर तुम्ही घरात शाळीग्रामची स्थापना केली असेल तर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात तणाव निर्माण होऊ शकतो.

>>शाळीग्रामच्या पूजेत चुकूनही अक्षता वापरू नका. अक्षता म्हणजे तांदूळ. त्या वाहायच्याच असतील तर त्याला हळद लावलेली असावी, पांढरे तांदूळ अर्पण करू नये.  

>>धर्मशास्त्रानुसार, शाळीग्राममध्ये अपार ऊर्जा असते. शाळीग्राम घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. मात्र पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर घरावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो. मतभेद वाढू लागतात. आणि कुटुंबावर कर्जाचा डोंगर चढू लागतो.

>>ज्यांच्या देवघरात शाळीग्राम असेल त्यांनी देवघरात शाळीग्राम ठेवण्यासाठी स्वतंत्र आसन ठेवावे. त्यावर तुळशीची पाने अंथरावीत. वर शाळीग्राम ठेवावा आणि तुळशीची पाने वहावीत. शाळीग्रामची नित्य पूजा करावी. 

>>शाळीग्राम बाजारातून विकत आणू नये.संत महंत, गुरु, संन्याशी यांनी दिलेला शाळिग्रामच देवघरात ठेवावा. किंवा वंश परंपरेने आपल्या घराण्यात शाळिग्रामची पूजा होत असेल तरच तो हस्तांतरित करून पुढच्या पिढीकडे द्यावा. 

>>काही कारणाने शाळीग्राम विसर्जित करण्याची वेळ आली तर त्याची शास्त्रशुद्ध पूजा, अभिषेक करून मगच भगवान महाविष्णूंची माफी मागून स्वच्छ वाहत्या नदीत तो विसर्जित करावा.