शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (पूर्वार्ध)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 11:56 IST

५ मार्च रोजी गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि चरित्राचा आढावा.

अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा उद्या ५ अर्थात ५ मार्च रोजी प्रगटदिन आहे. त्यांच्या जीवन चरित्राचा कालखंड बत्तीस वर्षांचा आहे. या काळामधे महाराजांनी खूपच चमत्कार केले. 

श्री गजानन महाराज हे वऱ्हाडात शेगाव (शिवगाव) येथे होऊन गेले. २३ फेब्रुवारी १८७८ रोजी ते प्रथमत: ऐन तारुण्यात शेगावी दिसले. त्या वेळी श्री गजानन महाराज, तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचून खात होते. गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले. पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंदमहाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्यावेळी टाकळीकर महाराजांच्या बेफाम असलेल्या घोड्याला चौपायात श्री गजानन महाराज हे ब्रह्मानंदी निमग्न होऊन निजले. तो द्वाड घोडा शांत होऊन स्वस्थ उभा राहिला होता. 

कीर्तन संपल्यावर गोविंद महाराज मंदिरात झोपले परंतु त्यांचे लक्ष घोड्यावर होते. रोज दांडगाई करणारा घोडा आज शांत कसा? त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी उठून निरखून पाहिले. तेव्हा गजानन माहाराजांनी घोड्याच्या चौपायी शयन केलेले दिसले. दुसऱ्या दिवशी कीर्तनात टाकळीकर महाराजांनी सांगितले, की `हा साक्षात शिवअवतार आहे. त्याची उपेक्षा करू नका.' 

टाकळीकरांनी त्यांची पूजा केली. `गण गण गणात बोते' बोटावरी वाजवून बोटे असे ते भजन अहर्निश गात असत. म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज असे संबोधू लागले. ते वाटेल ते खात. कोठेही पडून राहत. कोठेही संचार करत. लोक त्यांना बहुमोल वस्त्र, अलंकार, पैसे, खाद्यपदार्थ अर्पण करत. पण ते सर्व तिथेच टाकून निघून जात. लोकांना त्यांच्या दर्शनाने मन:शांती मिळे. 

बंकटलाल अगरवाल हे गजानन महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांना आपल्या घरी घेऊन आले. एक अवतारी स्वामी अगरवालचे घरी येऊन राहिल्याची बातमी घरोघरी गेली. महाराजांचे दर्शन घेण्यास गावागावातून लोक येऊ लागले. महाराजांचे चरण वंदून कोणी धन मागू लागले, पूत्र संतान मागू लागले, विद्या मागू लागले. त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले. महाराजांनी तिथे अलौकिक चमत्कार केले. गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर सदैव ब्रह्मानंद व ब्रह्मतेज झळकत असे. हजारो लोक त्यांच्याभोवती जमा होऊ लागले. 

शेगावीचे जानराव देशमुख मरणोन्मुख झाले होते. डॉक्टर, वैद्य अनेक केले. काही गुण येईना. शेवटी त्यांनी गजानन महाराजांचे चरणतीर्थ घेतले. ते बरे झाले. 

अकोल्यात भास्कर शेतकरी होता. शेतावर तो काम करी. महाराज भर दुपारी त्याच्याकडे पाणी मागण्यास आले. भास्कर शेतकरी रागाने म्हणाला, `सकाळी घडा भरून आणला आहे. तुम्हाला देऊन काय करू? चालते व्हा इथून!'

शेजारी कोरडी विहीर होती. त्याच्या काठावर महाराज बसले. महाराजांनी लगेच त्या कोरड्या विहीरीत पाणी उत्पन्न केले. ते पाहून भास्कर शेतकNयाने क्षमा मागितली. त्या वेळेपासून तो महाराजांबरोबर शेगावी येऊन राहिला. 

गजानन महाराजांना कोणी रामावतार म्हणत, कोणी कृष्णावतार तर कोणी शिवशंकर शेगावी प्रकटले असे समजत. त्यांच्या चरित्रातील आणखी काही भाग लेखाच्या उत्तरार्धात!

गण गण गणात बोते!