शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (पूर्वार्ध)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 11:56 IST

५ मार्च रोजी गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि चरित्राचा आढावा.

अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा उद्या ५ अर्थात ५ मार्च रोजी प्रगटदिन आहे. त्यांच्या जीवन चरित्राचा कालखंड बत्तीस वर्षांचा आहे. या काळामधे महाराजांनी खूपच चमत्कार केले. 

श्री गजानन महाराज हे वऱ्हाडात शेगाव (शिवगाव) येथे होऊन गेले. २३ फेब्रुवारी १८७८ रोजी ते प्रथमत: ऐन तारुण्यात शेगावी दिसले. त्या वेळी श्री गजानन महाराज, तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचून खात होते. गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले. पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंदमहाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्यावेळी टाकळीकर महाराजांच्या बेफाम असलेल्या घोड्याला चौपायात श्री गजानन महाराज हे ब्रह्मानंदी निमग्न होऊन निजले. तो द्वाड घोडा शांत होऊन स्वस्थ उभा राहिला होता. 

कीर्तन संपल्यावर गोविंद महाराज मंदिरात झोपले परंतु त्यांचे लक्ष घोड्यावर होते. रोज दांडगाई करणारा घोडा आज शांत कसा? त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी उठून निरखून पाहिले. तेव्हा गजानन माहाराजांनी घोड्याच्या चौपायी शयन केलेले दिसले. दुसऱ्या दिवशी कीर्तनात टाकळीकर महाराजांनी सांगितले, की `हा साक्षात शिवअवतार आहे. त्याची उपेक्षा करू नका.' 

टाकळीकरांनी त्यांची पूजा केली. `गण गण गणात बोते' बोटावरी वाजवून बोटे असे ते भजन अहर्निश गात असत. म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज असे संबोधू लागले. ते वाटेल ते खात. कोठेही पडून राहत. कोठेही संचार करत. लोक त्यांना बहुमोल वस्त्र, अलंकार, पैसे, खाद्यपदार्थ अर्पण करत. पण ते सर्व तिथेच टाकून निघून जात. लोकांना त्यांच्या दर्शनाने मन:शांती मिळे. 

बंकटलाल अगरवाल हे गजानन महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांना आपल्या घरी घेऊन आले. एक अवतारी स्वामी अगरवालचे घरी येऊन राहिल्याची बातमी घरोघरी गेली. महाराजांचे दर्शन घेण्यास गावागावातून लोक येऊ लागले. महाराजांचे चरण वंदून कोणी धन मागू लागले, पूत्र संतान मागू लागले, विद्या मागू लागले. त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले. महाराजांनी तिथे अलौकिक चमत्कार केले. गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर सदैव ब्रह्मानंद व ब्रह्मतेज झळकत असे. हजारो लोक त्यांच्याभोवती जमा होऊ लागले. 

शेगावीचे जानराव देशमुख मरणोन्मुख झाले होते. डॉक्टर, वैद्य अनेक केले. काही गुण येईना. शेवटी त्यांनी गजानन महाराजांचे चरणतीर्थ घेतले. ते बरे झाले. 

अकोल्यात भास्कर शेतकरी होता. शेतावर तो काम करी. महाराज भर दुपारी त्याच्याकडे पाणी मागण्यास आले. भास्कर शेतकरी रागाने म्हणाला, `सकाळी घडा भरून आणला आहे. तुम्हाला देऊन काय करू? चालते व्हा इथून!'

शेजारी कोरडी विहीर होती. त्याच्या काठावर महाराज बसले. महाराजांनी लगेच त्या कोरड्या विहीरीत पाणी उत्पन्न केले. ते पाहून भास्कर शेतकNयाने क्षमा मागितली. त्या वेळेपासून तो महाराजांबरोबर शेगावी येऊन राहिला. 

गजानन महाराजांना कोणी रामावतार म्हणत, कोणी कृष्णावतार तर कोणी शिवशंकर शेगावी प्रकटले असे समजत. त्यांच्या चरित्रातील आणखी काही भाग लेखाच्या उत्तरार्धात!

गण गण गणात बोते!