शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

गुप्तदान केलं एकाला, मिळालं दुसऱ्याला; पहा देवाने केलेली अनोखी व्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:00 IST

देवाकडे जो मागतो, त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो, तो कायम रिकामाच राहतो.

एक राजा होता. तो रोज मंदिरात जात असे. त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षारक्षकही असत. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे. त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत. त्यातला एक भिकारी म्हणत, `राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे...'त्याचवेळेस दुसरा भिकारी म्हणत, `देवा तू राजाला बरेच काही दिले आहेस, तर तू मलाही थोडे दे.'

म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणे मागत असे, तर दुसरा देवाकडे मागणे मागत असे. राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत, `राजाच आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस? देव काही देत नसतो, राजाच आपला पोशिंदा आहे, तोच आपल्याला देईल.' त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला, `राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे, म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो!'

भिकाऱ्याचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले. एक मोठे पातेले भरून खीर पाठवली. ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला. तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, `बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा, त्याने माझे मागणे पूर्ण केले, नाहीतर तुझा देव, तुझे ऐकतही नाही!' असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, `तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान.' असे म्हणत खीरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो.

उरलेली खीर प्यायल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या. ते पाहून भिकारी आनंदून गेला. त्याने लगेच देवाचे आभार मानले. त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही!

राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला. त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल. त्याचे आयुष्य बदलून गेले असेल. पण तिथे जाऊन पाहतो, तर झाले उलटच. राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, `तुला खीर मिळाली नाही का?' भिकारी म्हणाला, `मिळाली राजेसाहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले, देव आपले ऐकत नसला, तरी आपला राजा आपले गाऱ्हाणे ऐकतो. तोच आपले भले करतो. त्याला राग आला की काय कुणास ठाऊक, तो आज आलाच नाही. गेला असेल देवाकडे मागायला!'

हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, `देवाकडे जो मागतो, त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो, तो कायम रिकामाच राहतो.'