शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

Sant Vani: दुसऱ्यांमुळे तुम्हाला मनःस्ताप होत असेल तर मनात एवढंच म्हणा, 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 3, 2023 09:21 IST

Sant Vani: भगवंत प्रत्येकाच्या कृतीकडे बारीक लक्ष ठेवून आहे, जो जे कर्म करतो, त्याचे फळ त्याला भोगावेच लागते, हाच मतितार्थ जाणून घ्या या गाण्यातून. 

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

पूर्वी रेडिओ स्टेशनवर लागणारं आणि अलीकडे सत्यनारायण पूजेत हमखास कानावर पडणारं गाणं म्हणजे, 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!' हे गाणं ऐकता क्षणी आठवण होते ती गायक प्रल्हाद शिंदे यांची. त्यांच्याशिवाय अन्य कोणी या गाण्याला न्याय देऊ शकलं असतं याची कल्पनाही करवत नाही. तो आवाज जणू काही या गाण्यासाठीच बनला होता, नव्हे तर ते गाणं जणू काही या आवाजासाठी बनलं होतं, एवढं छान समीकरण त्यात जुळून आलं आहे. गीतकार अनंत पाटील यांचे शब्द, मधुकर पाठक यांचं संगीत आणि प्रल्हादजींच्या आवाजात या गाण्यात गीतेतला कर्मयोगच जणू उलगडून सांगितला आहे... 

जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर,जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू तुझं कर्म कर, फळ काय द्यायचं ते मी बघतो. सगळ्या कर्माची नोंद घ्यायला चित्रगुप्त बसले आहेत. त्या कर्माची गोळाबेरीज करून उचित फळ द्यायला मी समर्थ आहे. मात्र कर्म करताना लक्षात ठेव, जे करणारेस तेच परत येणार आहे. पेरले ते उगवते या न्यायाने कर्म सुद्धा जसे पेराल तसेच उगवते. चांगलं फळ मिळालं तर पूर्वकर्म चांगलं आहे समज, वाईट फळ मिळालं तर चांगलं कर्म कमी पडतंय असं समज. तेच सार या दोन ओळीत सामावलं आहे. जे जितक्या लवकर कळेल (सत्वर) तेवढ्या लवकर शहाणा होशील. 

क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट,कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट,देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर,जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

एखादी गोष्ट उचित नाही हे मन सांगत असतानाही क्षणिक सुखाला बळी पडतो आणि गैरवर्तन करतो. छोटीशी चूक कोणाच्या लक्षात येणारे, असा आपला समज असतो. मात्र सीसीटीव्ही जसा प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवतो, तसा आपला आत्मा आपल्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार असतो आणि हातून चुकीची गोष्ट घडली की त्याची टोचणी मनाला देत राहतो. कोणी आयुष्यभर दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतः सुखी होऊ पाहतो, तर कुणी दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यात आपलं सुख मानतो. या कर्माची किंमत देहाला चुकवावी लागते आणि तो सुखरूप सुटून गेला तरी आत्म्याला त्या यातना भोगाव्या लागतात आणि त्याची किंमत पुढच्या जन्मात चुकवावी लागते. 

ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण,मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान,सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

मरताना आपल्याबरोबर काही येणार नाही, एवढंच काय तर मरणही कोणाला टाळता येणार नाही, हे माहीत असूनही मनुष्य अहंकारात वावरतो. खेळ संपायचा तो एका क्षणात संपतो. हे कळतंय पण वळत नाही अशी अवस्था असेल तर मनुजा वेळीच सावध हो, हा देह सोडल्यावर तुझ्या आत्म्याबरोबर तू आयुष्यभर केलेलं कर्म सोबत येणार आहे. त्याच्यावरच तुझा पुढचा प्रवास ठरणार आहे. तुझ्या मागे लोकांनी तुझ्या नावे बोटं मोडू नये वाटत असेल तर कर्म शुद्ध ठेव, जेणेकरून कोणत्याही क्षणी निरोप द्यावा लागला, तरी मागे काय उरलं याची चिंता आत्म्याला सतावणार नाही!

मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण,क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण,अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर,जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

माणसाकडून चुका होतात मान्य, पण चुका सुधारायच्या सोडून त्यावर पांघरूण  घालत बसलात तर लोकांच्या नजरेतून सुटाल, मात्र स्वतःच्या नजरेतून कधीच सुटका होणार नाही. त्यामुळे चुका वेळेवर मान्य करा, स्वतःशी आणि दुसऱ्यांशी! दुसऱ्यांना दुखवून तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. जो तुम्हाला आता त्रास देतोय, तो तुम्हाला आनंदी दिसत असला तरी त्यालाही त्याच्या कर्माची फळं आज ना उद्या भोगावीच लागणार आहेत. त्याची मोजदाद तुम्ही ठेवू नका. आपल्या चुका आपल्याला लक्षात येताच क्षमा मागा, त्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल, मनावरचं ओझं कमी होईल, चूक सुधारण्याची आणि पुन्हा होऊ न देण्याची संधी भगवंत देईल. हे जर सगळ्यांनी लक्षात घेतलं तर ही सृष्टी सुजलाम सुफलाम होईल... पण लक्षात कोण घेतो? दिवस झरझर निघून चालले. संस्कृतीचे अधःपतन पाहता अंतकाळ डोळ्यांना दिसू लागलाय. पण त्यातूनही तरून जायचं असेल तर आपण आपल्यापुरती सुधारणा करूया, कारण... 

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥

टॅग्स :musicसंगीत