शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

माटी कहे कुम्हार से...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2023 10:15 IST

कबीरांचा विचार जन्म-मरणाच्या पलीकडचा आहे. आजच्या तारखेला त्यांचा लौकिकार्थाने जन्म आणि मृत्यू झाला असेल पण त्यांचे  दोहे कालातीत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त हा लेख.

डॉ. भालचंद्र सुपेकर प्रिन्सिपल कॉरस्पॉन्डंट, पुणे 

कबीर आजही संदर्भहीन होत नाहीत. कारण ते पोथी-पारायणाचा विषय नाहीत तर अनुभवाचा विषय आहेत. ते हृदयाला स्पर्श करत थेट मेंदूत शिरतात आणि तुमच्या जगण्याची परिभाषा बदलून टाकतात. साधे-सोपे शब्द, रोजच्या जीवनातले संदर्भ आणि बोजड तत्त्वज्ञानाऐवजी ‘सिंपल विज्डम’ देणारी भाषा ही कबीरांची अंगभूत वैशिष्ट्य. त्यांचा कुठलाही दोहा आयुष्यभर तुमच्या जीवनात रेंगाळत राहतो.

‘‘माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूगी तोहे ।’’

कुंभार आणि मातीचं अगदी साधं उदाहरण कबीर देतात. माती कुंभाराला सांगते की तू मला काय पायाखाली घेशील? एक दिवस असा येईल की, मीच तुला पायाखाली घेईन. मडकं बनविण्याआधी कुंभार बराच वेळ माती मळतो. ती चांगली मळली जावी यासाठी पायाने ती तुडवतो. हाच पायाखाली तुडविण्याचा संदर्भ घेत कबीरांनी हा दोहा लिहिला आहे.

या दोह्यासंदर्भात आणखी एक उपप्रश्न तयार होतो तो म्हणजे माती बोलते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. माती सगळ्यांशी बोलतच असते. कारण ती सगळीकडेच आहे. ‘माती केली’ याचा अर्थ नकारात्मक असला तरी या मातीत सगळी खनिजं, मूलद्रव्य समाविष्ट असतात, हे आपण विसरतो. ग्रामीण भागात आजही एखाद्याच्या अंत्यविधीला जात असताना किंवा आल्यावर ‘अमक्याच्या मातीला गेलतो’ असं म्हटलं जातं. तर तीच ही माती. 

भौतिकशास्त्राच्या परिभाषेत बोलायचं तर ‘म’टर इज मेड ऑफ एनर्जी’ आणि माती हे ‘म’टर’ आहे म्हणजेच तिच्यातही एनर्जी आहेच. आणखी एक अंत्यविधीनंतर चिताग्नी देणारी व्यक्ती पेटलेल्या चितेभोवती खांद्यावर मडकं घेऊन प्रदक्षिणा घालते. शेवटी ते मडकं पाठीवरून खाली टाकून देते. शरीररूपी घटात बंदिस्त असलेल्या सर्व भौतिक गोष्टी आणि अभौतिक वासना त्यातून मुक्त झाल्या, असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे.

तर अशी ही माती कुंभाराला सांगतेय की तू मडकं घडविण्याआधी मला पायाखाली मळतोस खरा पण तुझी वेळ, जीवन संपलं की मी तुला पायाखाली घेईन. इथं कबीर आपण सगळे मर्त्य, नाशवंत आहोत, हे अधोरेखित करतात. त्यामुळं कितीही आभाळाला हात टेकले तरी अंत मातीत होणार आहे, याची जाणीव सतत ठेवली पाहिजे, याचं हे सूचक आहे. मृत्यू हेच जर अंतिम सत्य असेल तर मग जगायचं कसं? जगण्याचं प्रयोजन काय? याविषयी तर कबीरांचे अनेक दोहे आहेत. त्या प्रत्येक दोह्यातून नवा अर्थ समोर येतो.

‘‘कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, न काहू से बैर।’’

या दोह्यात कबीर जीवन जगण्याचं सूत्र सांगतात. या जगाच्या बाजारात मी उभा आहे आणि सगळ्यांच्या भल्याची आशा करतोय. माझी ना कुणाची दोस्ती आहे ना कुणाशी वैर आहे, असं कबीर सांगतात. 

एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येते, आपल्यासोबत काही काळ, मग तो काही तासांचा-दिवसांचा-वर्षांचा असेल, पण आपण त्या व्यक्तीतल्या त्रुटी पटकन हेरतो. त्या छोट्याशा काळातल्या सहवासावरून त्या व्यक्तीची ओळख बनविण्याचा प्रयत्न करतो. पण त्याऐवजी आपण त्या व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघितलं, तर अनेक द्वैत नष्टच होऊन जातील. एखाद्या व्यक्तीचं काही आवडत नाही म्हणून त्याच्याशी वैर आणि एखाद्याशी पटतंय म्हणून त्याच्याशी मैत्री, असं करून कसं चालेल?  शेवटी आपण सगळेच त्या मातीचीच लेकरं आहोत आणि आपला शेवटही त्या मातीच्या गर्भातच होणार आहे. ही समज आली की, ही दोस्ती, हे वैर, चढाओढ, ईर्ष्या, असूया सगळंच निरर्थक ठरतं. कबीराच्या नजरेतून जगाकडं पाहायला शिकलं तर सगळ्या जगाला व्यापून उरणारी ‘सबकी खैर’ मागण्याची दृष्टी आपसूकच विकसित होईल.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक