शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

माटी कहे कुम्हार से...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2023 10:15 IST

कबीरांचा विचार जन्म-मरणाच्या पलीकडचा आहे. आजच्या तारखेला त्यांचा लौकिकार्थाने जन्म आणि मृत्यू झाला असेल पण त्यांचे  दोहे कालातीत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त हा लेख.

डॉ. भालचंद्र सुपेकर प्रिन्सिपल कॉरस्पॉन्डंट, पुणे 

कबीर आजही संदर्भहीन होत नाहीत. कारण ते पोथी-पारायणाचा विषय नाहीत तर अनुभवाचा विषय आहेत. ते हृदयाला स्पर्श करत थेट मेंदूत शिरतात आणि तुमच्या जगण्याची परिभाषा बदलून टाकतात. साधे-सोपे शब्द, रोजच्या जीवनातले संदर्भ आणि बोजड तत्त्वज्ञानाऐवजी ‘सिंपल विज्डम’ देणारी भाषा ही कबीरांची अंगभूत वैशिष्ट्य. त्यांचा कुठलाही दोहा आयुष्यभर तुमच्या जीवनात रेंगाळत राहतो.

‘‘माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूगी तोहे ।’’

कुंभार आणि मातीचं अगदी साधं उदाहरण कबीर देतात. माती कुंभाराला सांगते की तू मला काय पायाखाली घेशील? एक दिवस असा येईल की, मीच तुला पायाखाली घेईन. मडकं बनविण्याआधी कुंभार बराच वेळ माती मळतो. ती चांगली मळली जावी यासाठी पायाने ती तुडवतो. हाच पायाखाली तुडविण्याचा संदर्भ घेत कबीरांनी हा दोहा लिहिला आहे.

या दोह्यासंदर्भात आणखी एक उपप्रश्न तयार होतो तो म्हणजे माती बोलते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. माती सगळ्यांशी बोलतच असते. कारण ती सगळीकडेच आहे. ‘माती केली’ याचा अर्थ नकारात्मक असला तरी या मातीत सगळी खनिजं, मूलद्रव्य समाविष्ट असतात, हे आपण विसरतो. ग्रामीण भागात आजही एखाद्याच्या अंत्यविधीला जात असताना किंवा आल्यावर ‘अमक्याच्या मातीला गेलतो’ असं म्हटलं जातं. तर तीच ही माती. 

भौतिकशास्त्राच्या परिभाषेत बोलायचं तर ‘म’टर इज मेड ऑफ एनर्जी’ आणि माती हे ‘म’टर’ आहे म्हणजेच तिच्यातही एनर्जी आहेच. आणखी एक अंत्यविधीनंतर चिताग्नी देणारी व्यक्ती पेटलेल्या चितेभोवती खांद्यावर मडकं घेऊन प्रदक्षिणा घालते. शेवटी ते मडकं पाठीवरून खाली टाकून देते. शरीररूपी घटात बंदिस्त असलेल्या सर्व भौतिक गोष्टी आणि अभौतिक वासना त्यातून मुक्त झाल्या, असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे.

तर अशी ही माती कुंभाराला सांगतेय की तू मडकं घडविण्याआधी मला पायाखाली मळतोस खरा पण तुझी वेळ, जीवन संपलं की मी तुला पायाखाली घेईन. इथं कबीर आपण सगळे मर्त्य, नाशवंत आहोत, हे अधोरेखित करतात. त्यामुळं कितीही आभाळाला हात टेकले तरी अंत मातीत होणार आहे, याची जाणीव सतत ठेवली पाहिजे, याचं हे सूचक आहे. मृत्यू हेच जर अंतिम सत्य असेल तर मग जगायचं कसं? जगण्याचं प्रयोजन काय? याविषयी तर कबीरांचे अनेक दोहे आहेत. त्या प्रत्येक दोह्यातून नवा अर्थ समोर येतो.

‘‘कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, न काहू से बैर।’’

या दोह्यात कबीर जीवन जगण्याचं सूत्र सांगतात. या जगाच्या बाजारात मी उभा आहे आणि सगळ्यांच्या भल्याची आशा करतोय. माझी ना कुणाची दोस्ती आहे ना कुणाशी वैर आहे, असं कबीर सांगतात. 

एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येते, आपल्यासोबत काही काळ, मग तो काही तासांचा-दिवसांचा-वर्षांचा असेल, पण आपण त्या व्यक्तीतल्या त्रुटी पटकन हेरतो. त्या छोट्याशा काळातल्या सहवासावरून त्या व्यक्तीची ओळख बनविण्याचा प्रयत्न करतो. पण त्याऐवजी आपण त्या व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघितलं, तर अनेक द्वैत नष्टच होऊन जातील. एखाद्या व्यक्तीचं काही आवडत नाही म्हणून त्याच्याशी वैर आणि एखाद्याशी पटतंय म्हणून त्याच्याशी मैत्री, असं करून कसं चालेल?  शेवटी आपण सगळेच त्या मातीचीच लेकरं आहोत आणि आपला शेवटही त्या मातीच्या गर्भातच होणार आहे. ही समज आली की, ही दोस्ती, हे वैर, चढाओढ, ईर्ष्या, असूया सगळंच निरर्थक ठरतं. कबीराच्या नजरेतून जगाकडं पाहायला शिकलं तर सगळ्या जगाला व्यापून उरणारी ‘सबकी खैर’ मागण्याची दृष्टी आपसूकच विकसित होईल.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक