शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

माटी कहे कुम्हार से...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2023 10:15 IST

कबीरांचा विचार जन्म-मरणाच्या पलीकडचा आहे. आजच्या तारखेला त्यांचा लौकिकार्थाने जन्म आणि मृत्यू झाला असेल पण त्यांचे  दोहे कालातीत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त हा लेख.

डॉ. भालचंद्र सुपेकर प्रिन्सिपल कॉरस्पॉन्डंट, पुणे 

कबीर आजही संदर्भहीन होत नाहीत. कारण ते पोथी-पारायणाचा विषय नाहीत तर अनुभवाचा विषय आहेत. ते हृदयाला स्पर्श करत थेट मेंदूत शिरतात आणि तुमच्या जगण्याची परिभाषा बदलून टाकतात. साधे-सोपे शब्द, रोजच्या जीवनातले संदर्भ आणि बोजड तत्त्वज्ञानाऐवजी ‘सिंपल विज्डम’ देणारी भाषा ही कबीरांची अंगभूत वैशिष्ट्य. त्यांचा कुठलाही दोहा आयुष्यभर तुमच्या जीवनात रेंगाळत राहतो.

‘‘माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूगी तोहे ।’’

कुंभार आणि मातीचं अगदी साधं उदाहरण कबीर देतात. माती कुंभाराला सांगते की तू मला काय पायाखाली घेशील? एक दिवस असा येईल की, मीच तुला पायाखाली घेईन. मडकं बनविण्याआधी कुंभार बराच वेळ माती मळतो. ती चांगली मळली जावी यासाठी पायाने ती तुडवतो. हाच पायाखाली तुडविण्याचा संदर्भ घेत कबीरांनी हा दोहा लिहिला आहे.

या दोह्यासंदर्भात आणखी एक उपप्रश्न तयार होतो तो म्हणजे माती बोलते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. माती सगळ्यांशी बोलतच असते. कारण ती सगळीकडेच आहे. ‘माती केली’ याचा अर्थ नकारात्मक असला तरी या मातीत सगळी खनिजं, मूलद्रव्य समाविष्ट असतात, हे आपण विसरतो. ग्रामीण भागात आजही एखाद्याच्या अंत्यविधीला जात असताना किंवा आल्यावर ‘अमक्याच्या मातीला गेलतो’ असं म्हटलं जातं. तर तीच ही माती. 

भौतिकशास्त्राच्या परिभाषेत बोलायचं तर ‘म’टर इज मेड ऑफ एनर्जी’ आणि माती हे ‘म’टर’ आहे म्हणजेच तिच्यातही एनर्जी आहेच. आणखी एक अंत्यविधीनंतर चिताग्नी देणारी व्यक्ती पेटलेल्या चितेभोवती खांद्यावर मडकं घेऊन प्रदक्षिणा घालते. शेवटी ते मडकं पाठीवरून खाली टाकून देते. शरीररूपी घटात बंदिस्त असलेल्या सर्व भौतिक गोष्टी आणि अभौतिक वासना त्यातून मुक्त झाल्या, असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे.

तर अशी ही माती कुंभाराला सांगतेय की तू मडकं घडविण्याआधी मला पायाखाली मळतोस खरा पण तुझी वेळ, जीवन संपलं की मी तुला पायाखाली घेईन. इथं कबीर आपण सगळे मर्त्य, नाशवंत आहोत, हे अधोरेखित करतात. त्यामुळं कितीही आभाळाला हात टेकले तरी अंत मातीत होणार आहे, याची जाणीव सतत ठेवली पाहिजे, याचं हे सूचक आहे. मृत्यू हेच जर अंतिम सत्य असेल तर मग जगायचं कसं? जगण्याचं प्रयोजन काय? याविषयी तर कबीरांचे अनेक दोहे आहेत. त्या प्रत्येक दोह्यातून नवा अर्थ समोर येतो.

‘‘कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, न काहू से बैर।’’

या दोह्यात कबीर जीवन जगण्याचं सूत्र सांगतात. या जगाच्या बाजारात मी उभा आहे आणि सगळ्यांच्या भल्याची आशा करतोय. माझी ना कुणाची दोस्ती आहे ना कुणाशी वैर आहे, असं कबीर सांगतात. 

एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येते, आपल्यासोबत काही काळ, मग तो काही तासांचा-दिवसांचा-वर्षांचा असेल, पण आपण त्या व्यक्तीतल्या त्रुटी पटकन हेरतो. त्या छोट्याशा काळातल्या सहवासावरून त्या व्यक्तीची ओळख बनविण्याचा प्रयत्न करतो. पण त्याऐवजी आपण त्या व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघितलं, तर अनेक द्वैत नष्टच होऊन जातील. एखाद्या व्यक्तीचं काही आवडत नाही म्हणून त्याच्याशी वैर आणि एखाद्याशी पटतंय म्हणून त्याच्याशी मैत्री, असं करून कसं चालेल?  शेवटी आपण सगळेच त्या मातीचीच लेकरं आहोत आणि आपला शेवटही त्या मातीच्या गर्भातच होणार आहे. ही समज आली की, ही दोस्ती, हे वैर, चढाओढ, ईर्ष्या, असूया सगळंच निरर्थक ठरतं. कबीराच्या नजरेतून जगाकडं पाहायला शिकलं तर सगळ्या जगाला व्यापून उरणारी ‘सबकी खैर’ मागण्याची दृष्टी आपसूकच विकसित होईल.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक