शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:10 IST

Sankashti Chaturthi 2024: येत्या रविवारी अर्थात २६ मे रोजी संकष्ट चतुर्थी आहे, तेव्हा आपण आरती आणि काही अभंग, संस्कृत श्लोक, गजर आपल्याही नकळत करतो, त्याबद्दल माहीती!

संकष्ट चतुर्थीचा उपास सोडताना आपण बाप्पाची आरती म्हणतो आणि घालीन लोटांगण या अभंगाने आरतीचा शेवट करतो. हो अभंगच! त्याजोडीलाच ओघाओघात जे कवन म्हणतो, ते कसे जोडले गेले आणि कोणी लिहिले याचा तपशील जाणून घेऊ. 

'सुखकर्ता दुःखहर्ता' ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली हे तर आपण जाणतोच. मात्र शेवटी जो आरतीला जोडून अभंग म्हटला जातो, तो संत नामदेवांचा आहे. 

घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझेप्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा!

हा अभंग हा वैष्णव संत नामदेव ह्यांनी भगवान श्री कृष्णाला, पांडुरंगाला उद्देशून म्हटला आहे. यात अनेकदा लोक स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात. मात्र, संत नामदेव लोटांगण घालण्याबाबत देवाला वचन देत आहेत आणि आपण मात्र स्वतः भोवती गिरकी घेऊन शॉर्टकट मारतो. तसे न करता, पूर्ण आरती होईपर्यंत डोळे मिटून शांतपणे उभे राहावे, सगळे श्लोक म्हणून झाले की मग लोटांगण अर्थात पुरुषांनी साष्टांग दंडवत आणि स्त्रियांनी गुडघे जमिनीला टेकवून अर्धनमस्कार करावा, असे शास्त्र सांगते. 

त्यानंतर जोडून येतो तो भाग संस्कृतातील आहे. बालपणापासून कानावर पडून हे श्लोक आपल्याला तोंडपाठ झाले. पण ते कुठून आले आणि त्याचा अर्थ काय ते पाहू. 

त्वमेव माता च पिता त्वमेव,  त्वमेव बंधू च सखा त्वमेवत्वमेव विद्या द्रविणंम त्वमेव, त्वमेव सर्व मम् देव देव    - गर्ग संहिता (द्वारका खंड)

गर्ग मुनी यांनी भगवान श्री कृष्णाला उद्देशून वरील श्लोक रचला आहे. ज्याचा अर्थ आहे - देवा तूच आई आणि बाप आहेस, तूच बंधू आणि मित्र हि तूच, तूच माझे ज्ञान आणि संपत्ती हि तूच, तूच देवा माझ्यासाठी सर्वकाही आहेस.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत्सकलं परस्मै । नारायणयेति समर्पयामि ॥

भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदा मध्ये असलेल्या ह्या श्लोकाचा अर्थ - काया (शरीर),वाचा (बोलणे), मन, इंद्रिय आणि बुद्धी तसेच माझ्या प्रकृती आणि स्वभावाने जे काही कर्म करत आहे ते मी नारायणाला समर्पित करत आहे.

अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रं भजे - अच्युतकाष्टकम

आदी शंकराचार्य लिखित ह्या अच्युतकाष्टकम चा अर्थ - मी भजतो त्या अच्युताला, केशवाला राम नारायणाला. त्या श्रीधर, माधव आणि गोपिकावल्लभ श्री कृष्णाला. मी भजतो जानकी नायक राम चंद्राला.

शेवट चा मंत्र -

हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

हा सोळा अक्षरी महा मंत्र कालीसंतरण उपनिषद ह्या उपनिषद मधला आहे. कलियुगात नाम संकीर्तन हेच उद्धार करणारे आहे. ह्या शिवाय कलियुगात कोणताही पर्याय नाही हे त्यातून दिसून येते. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हेच कलियुगातील माणसाने ध्येय ठेवावे, त्यासाठी हे मंत्र म्हटले जातात. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी