शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Sankashti Chaturthi 2024: फाल्गुन मासातील भालचंद्र संकष्टी आहे खास; बाप्पाची करा उपासना पूर्ण होईल आस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:46 IST

Sankashti Chaturthi 2024: २८ मार्च रोजी फाल्गुन मासातील संकष्ट चतुर्थी आहे, या चतुर्थीचे खास महत्त्व जाणून घ्या आणि दिलेले उपाय अवश्य करा. 

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही चतुर्थी भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच या व्रताचे पालन केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते.

भालचंद्र संकष्ट चतुर्थी हे नाव का?

भालचंद्र हे नाव गणेशाला मिळाले कारण त्याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावर चंद्र धारण केला. त्याची शीतलता बाप्पाच्या चेहऱ्यावर कायम दिसते. बाप्पाने चंद्राला धारण करणे हा चंद्राचा गौरव! आणि तीच ओळख या व्रताला मिळाली. 

भालचंद्र चतुर्थी चंद्रोदय 

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल. कॅलेंडरनुसार, यावर्षी ही तारीख २८ मार्च रोजी संध्याकाळी ६.५६ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ मार्च रोजी रात्री ८.२० मिनिटांनी संपेल. चंद्रोदयाच्या आधारावर २८ मार्च २०२४ रोजी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल आणि चंद्रोदय झाल्यावर उपास सोडला जाईल. तर चंद्रोदयाची वेळ रात्री ९.२८ मिनिटांची आहे.

संकष्टीनिमित्त शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त 

पंचांगानुसार २८ मार्च २०२४ रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी १०.५४ ते दुपारी १२.२६ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.०४ ते ६.३७ पर्यंत आहे.

भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

हिंदू धर्मात, भगवान गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते, असे म्हटले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपतीला समर्पित केले जाते आणि या दिवशी त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते. यासोबतच कोणत्याही कामात येणारे अडथळे दूर होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो.

अशी करा उपासना : 

संकष्टीची उपासना : या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सान्निध्यात राहावे, पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे पूजेत मन एकाग्र होते. बाह्य विश्वाचा विसर पडतो. मुखी नाम यावे, याकरीता 'ओम गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करावा. अथर्वशीर्ष पाठ असल्यास त्याची ११ किंवा २१ आवर्तने करावी. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तीभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही!

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३