शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Sankashti Chaturthi 2024: फाल्गुन मासातील भालचंद्र संकष्टी आहे खास; बाप्पाची करा उपासना पूर्ण होईल आस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:46 IST

Sankashti Chaturthi 2024: २८ मार्च रोजी फाल्गुन मासातील संकष्ट चतुर्थी आहे, या चतुर्थीचे खास महत्त्व जाणून घ्या आणि दिलेले उपाय अवश्य करा. 

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही चतुर्थी भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच या व्रताचे पालन केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते.

भालचंद्र संकष्ट चतुर्थी हे नाव का?

भालचंद्र हे नाव गणेशाला मिळाले कारण त्याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावर चंद्र धारण केला. त्याची शीतलता बाप्पाच्या चेहऱ्यावर कायम दिसते. बाप्पाने चंद्राला धारण करणे हा चंद्राचा गौरव! आणि तीच ओळख या व्रताला मिळाली. 

भालचंद्र चतुर्थी चंद्रोदय 

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल. कॅलेंडरनुसार, यावर्षी ही तारीख २८ मार्च रोजी संध्याकाळी ६.५६ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ मार्च रोजी रात्री ८.२० मिनिटांनी संपेल. चंद्रोदयाच्या आधारावर २८ मार्च २०२४ रोजी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल आणि चंद्रोदय झाल्यावर उपास सोडला जाईल. तर चंद्रोदयाची वेळ रात्री ९.२८ मिनिटांची आहे.

संकष्टीनिमित्त शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त 

पंचांगानुसार २८ मार्च २०२४ रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी १०.५४ ते दुपारी १२.२६ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.०४ ते ६.३७ पर्यंत आहे.

भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

हिंदू धर्मात, भगवान गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते, असे म्हटले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपतीला समर्पित केले जाते आणि या दिवशी त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते. यासोबतच कोणत्याही कामात येणारे अडथळे दूर होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो.

अशी करा उपासना : 

संकष्टीची उपासना : या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सान्निध्यात राहावे, पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे पूजेत मन एकाग्र होते. बाह्य विश्वाचा विसर पडतो. मुखी नाम यावे, याकरीता 'ओम गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करावा. अथर्वशीर्ष पाठ असल्यास त्याची ११ किंवा २१ आवर्तने करावी. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तीभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही!

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३