शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Sankashti Chaturthi 2023: बाप्पाची आरती म्हणाल तेव्हा 'संकष्टी' पावावे नाही, 'संकटी' पावावे म्हणा; कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:52 IST

Sankashti Chaturthi 2023: आज चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे, आजचे व्रत तुम्ही बाप्पाच्या पूजे-अर्चेने पूर्ण करालच; त्यात थोडक्यासाठी चूक करू नका!

समर्थ रामदासांनी लिहिलेली `सुखकर्ता दु:खहर्ता' ही गणपतीची आबालवृद्धांना तोंडपाठ आहे. फक्त आरती म्हणता म्हणता उत्साहाच्या भरात गाडी घसरते आणि संकटी पावावे ऐवजी `संकष्टी पावावे' असा निरोप बाप्पाला धाडला जातो. मात्र, समर्थांनी जे मागणे मागितले आहे, ते लक्षात घेतले, तर आरती म्हणताना संकटीऐवजी संकष्टी असा उच्चार होणारच नाही. काय आहे त्यांचे मागणे?

श्रीगणेश हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आणि आवडते दैवत. आपली सुखदु:खे आपण ज्याच्याजवळ विश्वासाने सांगू शकतो, तो आपला बाप्पा सुख देणारा आहे आणि दु:खाचे हरण करणारा म्हणजेच संकटांना पळवून लावणारादेखील आहे. म्हणून तर आपण त्याला `वार्ता विघ्नाची नुरवी' असे सांगतो. म्हणजे विघ्नेच काय तर त्याची वार्ता सुद्धा न उरवी, म्हणजे शिल्लक ठेवू नकोस, असे आपण सांगतो. मात्र, आरतीच्या ठेक्यात, लयीत गात असताना `नुरवी पुरवी प्रेम' असे म्हणत आपण स्वत:चीच गल्लत करतो. नुरवी पुरवी हे केवळ यमक जुळवले नसून, संकट उरवू नको पण प्रेम मात्र पुरव अशी प्रेमळ मागणी केली आहे. 

ही मागणी कोणाकडे? तर ज्याची आमच्यावर कृपा आहे, ज्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि ज्याच्या गळ्यात मुक्ताफळांची म्हणजेच मोत्याची माळ आहे, अशा गणेशाला मोरया म्हणजे माझा नमस्कार असो. 

बाप्पाला समर्थांनी मंगलमूर्ती म्हटले आहे, कारण तो अमंगळाचा नाश करतो. त्याचे नुसते दर्शनही मंगलमयी आहे. त्याला बघूनही प्रसन्न वाटते. त्याची कृपादृष्टी आश्वासक वाटते. ती पाहता मनोकामना आपसुक पूर्ण होईल, असा दिलासा वाटतो.  यातही समर्थांच्या आरतीत केवळ मंगलमूर्ती असा उल्लेख आहे, परंतु भक्तांनी श्रीमंगलमूर्ती दिलेली जोडदेखील आता आरतीचाच एक भाग असल्यासारखी म्हटली जाते. 

पुढच्या दोन्ही कडव्यांमध्ये समर्थांनी गणपती बाप्पाचे वैभवसंपन्न रूप रेखाटले आहे. गणपती, गणनायक या शब्दांमध्ये नेतृत्व सामावलेले आहे. युद्धकलेत निपुण असलेला बाप्पा पाशांकुशधारी आहे. मात्र, समर्थांनी या आरतीमध्ये केवळ बाप्पाचे वैभव दाखवले आहे. त्याच्या हाती शस्रास्रे न देता, त्याचे हात या महाराष्ट्राला आशीर्वाद देण्यासाठी आणि मोदक अर्थात आनंद देण्यासाठी मुक्त असल्याचे वर्णन केले आहे. 

मात्र, आरती संपत असताना, श्रीगणेशाला आर्त साद देत विनंती केली आहे, `संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' म्हणजेच देवा आमच्या संकटकाळात तर धावून येच, शिवाय आयुष्यात ज्या ज्या वेळी निर्वाणीचे म्हणजेच भावभावनांचा कडेलोट झाला, आणाीबाणीचा प्रसंग उभा ठाकला असे वाटेल, तेव्हा रक्षणार्थ धावून ये.' म्हणून हे मागणे केवळ `संकष्टी' पुरते न मागता दर संकटात त्याने धावून यावे, असे त्याला सांगावे. आणि आर्ततेने म्हणावे, `संकटी पावावे निर्वाणि रक्षावे.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी