शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

देवाकडे नेमके कसे मागणे मागावे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितली योग्य पद्धत; वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 20:16 IST

एका प्रसंगात समर्थ रामदास स्वामी यांनी देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात केलेले मार्गदर्शन आताच्या घडीलाही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. जाणून घेऊया...

रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. माघ कृष्ण नवमीला 'दासनवमी' असे म्हणतात. या दिवशी समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. एका प्रसंगात समर्थ रामदास स्वामी यांनी देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात केलेले मार्गदर्शन आताच्या घडीलाही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. जाणून घेऊया...

पहाटेच्या समयी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करण्याचा रामदास स्वामींचा नित्यक्रम. नामस्मरणाला बसले की, स्वामींची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे. एके दिवशी न राहून एका शिष्याने समर्थांना विचारेल की, आपण देवाचे नामस्मरण करताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जरादेखील विचलित होत नाहीत? मनात आपण नेमका काय विचार करीत असता? मनातील विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर येत नाही, हे कसे शक्य होते? असे काही प्रश्न एकामागून एक शिष्याने विचारले. 

कधी आहे महाशिवरात्री? पाहा, मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता

यावर समर्थ रामदास स्वामी शिष्याला म्हणाले की, एकदा एका राजाच्या राजमहालाबाहेर एका भिक्षुकाला उभे असलेले पाहिले. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल, इतकेही वस्त्र नव्हते. तसेच त्या वस्त्राला अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या. अनेक दिवसांपासून भिक्षुक जेवलेला नसेल, हे स्पष्टपणे दिसत होते. मात्र, भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते. शारीरिक कष्ट सोसलेला तो भिक्षुक किमान उभा तरी कसा काय राहू शकत होता, याचे आश्चर्य पाहणाऱ्यांना वाटत होते. तो भिक्षुक केव्हाही खाली कोसळेल, अशा स्थितीत ताटकळत उभा असताना तेवढ्यात राजा बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की, सांग, तुला काय हवे आहे?

राजाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भिक्षुक म्हणाला की, आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल, तर यावर मला काहीही बोलायचे नाही. मी आपल्यासमोर आहे. माझी मागणी काय असू शकेल, याचा आपणच अंदाज बांधलेला बरा. माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे, असे भिक्षुकाने सांगितले. 

समोर घडलेला तो प्रसंग पाहून, देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले. मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल. याउपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे? माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल. तर माझे शब्द ती सांगायला कसे पूरे पडू शकतील? माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत, तर माझे शब्दही त्यांना कसे उमगतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्त्वाचे ठरते. यानंतर काहीच मागणे शिल्लक राहत नाही. आपण करत असलेली प्रार्थना, मनापासून केलेले नामस्मरण पूरेसे असते, असे समर्थ रामदास स्वामी शिष्याला म्हणाले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक