शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

संत सांगतात, प्रपंच सोडून परमार्थ कराल, तर फसाल!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 5, 2021 17:28 IST

योगसाधना ही सामान्य लोकांसाठी नाही. ती खडतर तपश्चर्या आहे. ती योगी, हटयोगीच करू जाणे. सामान्य माणसाने तो मार्ग अवलंबिला, तर त्याला हाल अपेष्टाच सहन कराव्या लागतील. मग त्याने परमार्थ कसा साधावा? तर केवळ नाम:स्मरणाने, सत्कार्याने, सेवेने! प्रपंचात राहून परमार्थ करायचा असता़े देवाला शोधायला अरण्यात जाऊ नका. तो आपल्यात आहे, आपल्या सभोवती आहे. त्याला ओळखा. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

आध्यात्माची वाट सोपी आहे, तेवढीच कठीण. सोपी कोणासाठी? ज्यांनी आध्यात्म म्हणजे काय, हे समजून घेतले, त्यांच्यासाठी आणि कठीण इतरांसाठी! कर्मकांड, उपास-तापास, रुढी, पूजापाठ, यज्ञयाग या गोष्टींमध्ये जे अडकतात, त्यांच्यासाठी आध्यात्माची वाट बिकट होत जाते. कारण, या गोष्टींमध्ये काही कमतरता राहिली, की त्याचाच विचार करत, ते स्वत:ला दोष देत बसतात. मग या गोष्टी निरर्थक आहेत का? तर नाही! त्यादेखील भगवंत प्राप्तीचे साधन आहे. परंतु, साधनाचा वापर साध्य मिळेपर्यंतच करायचा असतो. साधनाला साध्य समजण्याची चूक करू नये. जीन्याचा वापर खालच्या मजल्यावरून वर जाण्यासाठी किंवा वरून खाली येण्यासाठी होतो. मग जीना हे आपले ध्येय आहे का? तिथेच आपल्याला थांबायचे आहे का? नाही. त्याचा वापर करून पुढच्या मार्गाला लागायचे आहे. पण लक्षात कोण घेतो? 

हेही वाचा : तुम्ही खडीसाखर बना, गुरु तुमच्याकडे धावत येतील!

अनेकांना वाटते, प्रपंच सोडला तर परमार्थ होतो. अशाच विचाराने एक मनुष्य घर दार सोडून अरण्यात गेला. दिवसभर रानफळे खाऊन राहिला. नदीचे झुळूझुळू वाहणारे पाणी प्यायला. रात्री निवाऱ्याची गरज भासू लागली. श्वापदांची भीती वाटू लागली. अंधार गडद होऊ लागला. रात्र झाडावर काढली. दुसऱ्या दिवशी झावळ्या गोळा करून राहुटी बांधली. शेकोटी रचली. कंदमुळांवर गुजराण केली. रोज रोज फळे तोडायचा कंटाळा , म्हणून त्याने एकाच वेळी जास्त फळे गोळा करून राहुटीत ठेवली. उंदिर मामांना पत्ता लागला. त्यांचा बंदोबस्त करायला एक मांजर पाळली. मांजरीला रोज उंदिर कसे पुरवणार? तिला दूध मिळावे म्हणून गाय पाळली. गायीला चारा खाल्याशिवाय दूध कसे येणार? म्हणून तिला चरायला नेण्यासाठी जवळच्या गावातला माणूस नेमला. माणसाला मीठ भाकरीची सोय लावून देण्यासाठी त्याचे लग्न लावून दिले. या व्यापात परमार्थ बाजूला राहून प्रपंच पुन्हा मागे लागला. तो गृहस्थ पुन्हा घरी परतला. तात्पर्य, प्रपंच सोडून परमार्थ करता येत नाही. प्रपंचातील जबाबदाऱ्या झटकल्या, तरी देहाचा प्रपंच करावाच लागतो.

म्हणून संतांनी स्वत:च्या उदाहरणातून प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून दिली. खुद्द माऊलीसुद्ध म्हणते,

म्हणोनि योगाचिया वाटा, जे निघाले गा सुभटा,तया दु:खाचिया वाटा, भागा आला।

योगसाधना ही सामान्य लोकांसाठी नाही. ती खडतर तपश्चर्या आहे. ती योगी, हटयोगीच करू जाणे. सामान्य माणसाने तो मार्ग अवलंबिला, तर त्याला हाल अपेष्टाच सहन कराव्या लागतील. मग त्याने परमार्थ कसा साधावा? तर केवळ नाम:स्मरणाने, सत्कार्याने, सेवेने! प्रपंचात राहून परमार्थ करायचा असता़े देवाला शोधायला अरण्यात जाऊ नका. तो आपल्यात आहे, आपल्या सभोवती आहे. त्याला ओळखा. 

तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, `नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण!' परमार्थ मार्गातील आजवरील उदाहरणे पहा, संत सेना न्हावी, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नरहरी सोनार, संत सावता माळी यांनीसुद्धा प्रपंचातील जबाबदाऱ्या सांभाळून देवाला आपलेसे केलेच ना? अगदी समर्थ रामदासांनीदेखील संसार केला, तोही विश्वाचा! म्हणून आपणही प्रपंचात परमार्थ कसा साधता येईल, याचा प्रयत्न करूया.

हेही वाचा : ती ज्ञानज्योती, ती क्रांतिज्योती... शिक्षणाचे 'व्रत' घेतलेली कलियुगातील 'सावित्री'