शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

संत तुकोबाराय सांगत आहेत, आदर्श घराची व्याख्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 5, 2021 18:59 IST

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार?

ज्योत्स्ना गाडगीळ

'ज्याचा कोणी नसतो, त्याचा मोबाईल असतो आणि ज्याच्याजवळ मोबाईल असतो, तो कुणाचा नसतो.' असे मार्मिक आणि मजेशीर विधान समाज माध्यमांवर वाचले. आधी हसू आले, परंतु स्वयंकेंद्री झालेल्या समाजाचे वास्तव त्या एका वाक्याने अधोरेखित केले. सद्यस्थितीत, मी आणि माझे यापलीकडचे विश्व आपल्याला दिसतच नाही. समाज माध्यमांमुळे व्यक्ती सोशल होण्याऐवजी अधिकच एकटी पडत असताना दिसत आहे. दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासली आहे. का? कशामुळे? तर आत्मकेंद्री झाल्यामुळे. सतत दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करता करता, मनुष्य स्वत:चे सुख हिरावून बसला आहे. आत्मभान विसरत आहे. जगण्याचे ध्येय विसरत आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

आपुलिया हिता जो होय जागता, धन्य मातापिता तयाचिया।कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विका, तयाचा हरिख वाटे देवा।गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे।तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही।

धन्य आहेत ते लोक, जे कितीही खडतर प्रसंग आले, तरी आपल्या ध्येयापासून ढळत नाहीत. ते स्वत:चा आणि आपल्या बरोबर कुटुंबाचा, समाजाचा, राज्याचा, राष्ट्राचा उद्धार करतात. नैराश्यावर मात करतात. त्यांना जन्म देऊन त्यांचे माता पिताही धन्य होतात. अडी अडचणींवर मात करून ज्या मुली स्वत:ला सिद्ध करतात, आपले कसब पणाला लावून लोकोपयोगी काम करतात, समाजाला दिशा देतात, जबाबदाऱ्या सार्थपणे सांभाळतात, त्यांना या पृथ्वीवर पाठवून देवालाही त्यांचा हेवा वाटत असावा. 

हेही वाचा : जेवायला बसताना 'पाने घ्या' म्हणतात, ते यासाठीच!

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार? घराला सांधून ठेवण्यासाठी संस्कारांचा मजबूत पाया असावा लागतो. परमार्थाची गोडी असावी लागते. श्लोक, स्तोत्र, संतविचार यांचे ध्वनी उमटावे लागतात. तिथेच लक्ष्मी आणि सरस्वती नांदते.

तुकाराम महाराज म्हणतात, अशा घराचा आपणही आदर्श ठेवला पाहिजे. जिथे सत्संग घडेल, तिथे गेले पाहिजे. जिथे समाजकार्य घडत असेल, तिथे आपणही सहभाग घेतला पाहिजे. अशा ठिकाणी केलेली सेवा, ही ईशसेवेचा भाग आहे. 

हेही वाचा : ... म्हणून साने गुरुजी आजीवन एकवेळ जेवत असत!