शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकोबाराय सांगत आहेत, आदर्श घराची व्याख्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 5, 2021 18:59 IST

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार?

ज्योत्स्ना गाडगीळ

'ज्याचा कोणी नसतो, त्याचा मोबाईल असतो आणि ज्याच्याजवळ मोबाईल असतो, तो कुणाचा नसतो.' असे मार्मिक आणि मजेशीर विधान समाज माध्यमांवर वाचले. आधी हसू आले, परंतु स्वयंकेंद्री झालेल्या समाजाचे वास्तव त्या एका वाक्याने अधोरेखित केले. सद्यस्थितीत, मी आणि माझे यापलीकडचे विश्व आपल्याला दिसतच नाही. समाज माध्यमांमुळे व्यक्ती सोशल होण्याऐवजी अधिकच एकटी पडत असताना दिसत आहे. दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासली आहे. का? कशामुळे? तर आत्मकेंद्री झाल्यामुळे. सतत दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करता करता, मनुष्य स्वत:चे सुख हिरावून बसला आहे. आत्मभान विसरत आहे. जगण्याचे ध्येय विसरत आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

आपुलिया हिता जो होय जागता, धन्य मातापिता तयाचिया।कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विका, तयाचा हरिख वाटे देवा।गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे।तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही।

धन्य आहेत ते लोक, जे कितीही खडतर प्रसंग आले, तरी आपल्या ध्येयापासून ढळत नाहीत. ते स्वत:चा आणि आपल्या बरोबर कुटुंबाचा, समाजाचा, राज्याचा, राष्ट्राचा उद्धार करतात. नैराश्यावर मात करतात. त्यांना जन्म देऊन त्यांचे माता पिताही धन्य होतात. अडी अडचणींवर मात करून ज्या मुली स्वत:ला सिद्ध करतात, आपले कसब पणाला लावून लोकोपयोगी काम करतात, समाजाला दिशा देतात, जबाबदाऱ्या सार्थपणे सांभाळतात, त्यांना या पृथ्वीवर पाठवून देवालाही त्यांचा हेवा वाटत असावा. 

हेही वाचा : जेवायला बसताना 'पाने घ्या' म्हणतात, ते यासाठीच!

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार? घराला सांधून ठेवण्यासाठी संस्कारांचा मजबूत पाया असावा लागतो. परमार्थाची गोडी असावी लागते. श्लोक, स्तोत्र, संतविचार यांचे ध्वनी उमटावे लागतात. तिथेच लक्ष्मी आणि सरस्वती नांदते.

तुकाराम महाराज म्हणतात, अशा घराचा आपणही आदर्श ठेवला पाहिजे. जिथे सत्संग घडेल, तिथे गेले पाहिजे. जिथे समाजकार्य घडत असेल, तिथे आपणही सहभाग घेतला पाहिजे. अशा ठिकाणी केलेली सेवा, ही ईशसेवेचा भाग आहे. 

हेही वाचा : ... म्हणून साने गुरुजी आजीवन एकवेळ जेवत असत!