शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

चर्म व्यवसाय करूनही भगवंताची प्राप्ती करता येते, हा आदर्श घालून देणारे संत रोहिदास यांची ५ फेब्रुवारी रोजी जयंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:38 IST

माघ पौर्णिमा ही संत रोहिदास यांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते, कोणताही व्यवसाय कमी लेखू नये हे त्यांनी आपल्या कर्मातून दाखवून दिले!

पंधराव्या सोेळाव्या शतकातील रोहिदास हे एक मोठे संत म्हणून ओळखले जातात. हे चर्मकार असून रवीदास, रैदास या नावानेही प्रसिद्ध होते. राजघराण्यातील स्त्री मीराबाई, ही यांची शिष्या असल्यामुळे रोहिदासांची महती वाढली. रोहिदासांनी अनेक पदे लिहिली आहेत. शिखांच्या 'ग्रंथसाहेबा'तही यांची सुमारे चाळीस पदे आहेत. वर्णबाह्य असल्याकारणाने त्यांना लौकिक शिक्षण मिळाले नव्हते, पण साधुसंतांच्या संगतीत ते आत्मज्ञानी झाले. आपल्या व्यवसायास अनुसरून ते एका पद्यात म्हणतात,

ज्यांहा देखो वांहा चामही चाम,चामके मंदिर बोलत राम।चामकी गऊ चामका बचडा,चामही धुने चामही ठाडा।चामका हाती चामका राजा,चामके उंटपर चामका बाजा।कहत रोहिदास सुनो कबीर भाई,चाम बिना देह किनकी बनाई।।

रोहिदास म्हणतात की, मी चर्मकार असूनही ईश्वराची भक्ती करतो. मला तर जेथे पहावे तेथे चामडे दिसून येते. चामड्याच्याच  शरीररूपी मंदिरात राम विराजमान झाला आह़े चामड्याची गाय व वासरूही चामड्याचेच. सर्वत्र चामडेच पसरले आहे. राजा चामड्याचा आणि हत्तीही चामड्याचाच. उंटसुद्धा चामड्याचाच आणि त्याच्यावर ठेवलेले वाद्यही चामड्यानेच मढवले आहे. त्या चर्माशिवाय देह कसा बनणार? 

या एका पदात रोहिदास महत्त्वाचा सिद्धान्त सांगत आहेत. मानवी शरीर कोणत्याही जातीचे असले तरी, त्यात अस्थी, मांस, चरबी सर्वत्र सारखीच असते. रक्ताचे प्रकार वेगळे असले तरी, सर्व जातीत ते आढळतात. शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? जा प्रश्न चोखोबांनी विचारला होता. परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे.