शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:38 IST

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो.

कबीरांची भाषा रोखठोक आणि सडेतोड आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या काव्यावरून येईल.

जंगल जाकर काहेकू बैठे, सुनले बावा साधु,बैठे जागो सुखसे बैठो, मत होना भोंदु,रामनाम जपोरे, अंतर शुद्ध रखो रे,जनम मरनकी गठरी खोलो, संतपगसे रखो ध्यान,जटाजूट और आसन मुद्रा काहेकू झुटा ग्यान,तीरथ बरत जोग काके शीर मुंडाके बैठा है,चुप कहासे घुसाघुसी आगे शिरपर सोटा है,निशिदिनी धुनी राम नामकी लगादे अपने मनमो,कहत कबीर सुनो भाई साधु नही तो, फत्तर है जंगलमो।

अरण्यात जाऊन कशाला बसले पाहिजे? तू ज्या जागी बसला आहेस, तिथेच बस! जंगलात जाऊन बसण्याचे व्यर्थ ढोंग करू नकोस. रामनाम जप आणि मन शुद्ध ठेव. उगाचच दाढी आणि जटा वाढवू नकोस. संतांच्या चरणी विश्वास ठेव. जन्ममरणाची चिंता अकारण करत बसू नकोस. आसन, मुद्रा आणि योगशास्त्रातल्या गोष्टी बाजूला ठेव. खोटे ज्ञान काय कामाचे? योग्यासारखे भगवे कपडे अंगावर चढवले, तीर्थाला गेले आणि डोक्याचे मुंडन करून घेतले म्हणून मनातले खोटे विचार थोडेच दूर होणार आहेत?

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

रामनामाची मोठ्या आवाजात धून कशाला लावली पाहिजे? आपल्या मनात नाम नाही का घेता येणार? अरे, आपल्या मनात अखंड जप चालू ठेव. मनातील अविचारांचा अंधार दूर कर. ज्ञानाचा दिवा लाव. सद्विचारांच्या उदबत्तीचा सुगंध दाही दिशांत दरवळू दे. असे वागलास, मग आहेच तिथेच परमेश्वराचा खरा भक्त होशील. 

तू जंगलात जाऊन काय करणार आहेस? जंगलात काय दगड थोडे आहेत का? तू असे ढोंग करून जंगलात गेलास, तर त्या दगडात आणखी एकाची भर पडेल. दुसरे काय होणार? हाच विचार आणखी एका पदात ते मांडतात,

काहेकू जंगल जाता बच्चे, काहेकू जंगल जाता?घर बैठे रामही देको, अंदर भीतर भरपुर उजाला, भयो आपनेही सात।येही जनम सुखके कारक साधु संतसो मानो,जान जायगी क्या फल पाया, इतना कहना मानो।बडा कुवा आगे भया, काहेकू इसमें डुबता?जोरू लरके नाता पुती, आखर अकेला तू जाता।कहत कनीर सुनो भाई साधु, अखंड भजो तुम राम,भजन करो किसे ना डरो, जमका कछु न चले काम।

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो. आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही तरी तू काय मिळवणार आहेस? पुढे तर प्रचंड मोठी विहीर आहे. तुला त्या विहिरीत बुडून जायचे नाही ना? पत्नी, पुत्र, कन्या, सगळे नातेवाईक इथेच राहणार आणि तू एकटाच तुझ्या रस्त्याचे जाणार आहेस. म्हणून कबीर सांगतात, रामाचे नाव घे. कोणाची चिंता करू नकोस आणि निर्भयपणे रामनाम घे. 

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!