शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:38 IST

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो.

कबीरांची भाषा रोखठोक आणि सडेतोड आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या काव्यावरून येईल.

जंगल जाकर काहेकू बैठे, सुनले बावा साधु,बैठे जागो सुखसे बैठो, मत होना भोंदु,रामनाम जपोरे, अंतर शुद्ध रखो रे,जनम मरनकी गठरी खोलो, संतपगसे रखो ध्यान,जटाजूट और आसन मुद्रा काहेकू झुटा ग्यान,तीरथ बरत जोग काके शीर मुंडाके बैठा है,चुप कहासे घुसाघुसी आगे शिरपर सोटा है,निशिदिनी धुनी राम नामकी लगादे अपने मनमो,कहत कबीर सुनो भाई साधु नही तो, फत्तर है जंगलमो।

अरण्यात जाऊन कशाला बसले पाहिजे? तू ज्या जागी बसला आहेस, तिथेच बस! जंगलात जाऊन बसण्याचे व्यर्थ ढोंग करू नकोस. रामनाम जप आणि मन शुद्ध ठेव. उगाचच दाढी आणि जटा वाढवू नकोस. संतांच्या चरणी विश्वास ठेव. जन्ममरणाची चिंता अकारण करत बसू नकोस. आसन, मुद्रा आणि योगशास्त्रातल्या गोष्टी बाजूला ठेव. खोटे ज्ञान काय कामाचे? योग्यासारखे भगवे कपडे अंगावर चढवले, तीर्थाला गेले आणि डोक्याचे मुंडन करून घेतले म्हणून मनातले खोटे विचार थोडेच दूर होणार आहेत?

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

रामनामाची मोठ्या आवाजात धून कशाला लावली पाहिजे? आपल्या मनात नाम नाही का घेता येणार? अरे, आपल्या मनात अखंड जप चालू ठेव. मनातील अविचारांचा अंधार दूर कर. ज्ञानाचा दिवा लाव. सद्विचारांच्या उदबत्तीचा सुगंध दाही दिशांत दरवळू दे. असे वागलास, मग आहेच तिथेच परमेश्वराचा खरा भक्त होशील. 

तू जंगलात जाऊन काय करणार आहेस? जंगलात काय दगड थोडे आहेत का? तू असे ढोंग करून जंगलात गेलास, तर त्या दगडात आणखी एकाची भर पडेल. दुसरे काय होणार? हाच विचार आणखी एका पदात ते मांडतात,

काहेकू जंगल जाता बच्चे, काहेकू जंगल जाता?घर बैठे रामही देको, अंदर भीतर भरपुर उजाला, भयो आपनेही सात।येही जनम सुखके कारक साधु संतसो मानो,जान जायगी क्या फल पाया, इतना कहना मानो।बडा कुवा आगे भया, काहेकू इसमें डुबता?जोरू लरके नाता पुती, आखर अकेला तू जाता।कहत कनीर सुनो भाई साधु, अखंड भजो तुम राम,भजन करो किसे ना डरो, जमका कछु न चले काम।

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो. आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही तरी तू काय मिळवणार आहेस? पुढे तर प्रचंड मोठी विहीर आहे. तुला त्या विहिरीत बुडून जायचे नाही ना? पत्नी, पुत्र, कन्या, सगळे नातेवाईक इथेच राहणार आणि तू एकटाच तुझ्या रस्त्याचे जाणार आहेस. म्हणून कबीर सांगतात, रामाचे नाव घे. कोणाची चिंता करू नकोस आणि निर्भयपणे रामनाम घे. 

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!