शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:38 IST

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो.

कबीरांची भाषा रोखठोक आणि सडेतोड आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या काव्यावरून येईल.

जंगल जाकर काहेकू बैठे, सुनले बावा साधु,बैठे जागो सुखसे बैठो, मत होना भोंदु,रामनाम जपोरे, अंतर शुद्ध रखो रे,जनम मरनकी गठरी खोलो, संतपगसे रखो ध्यान,जटाजूट और आसन मुद्रा काहेकू झुटा ग्यान,तीरथ बरत जोग काके शीर मुंडाके बैठा है,चुप कहासे घुसाघुसी आगे शिरपर सोटा है,निशिदिनी धुनी राम नामकी लगादे अपने मनमो,कहत कबीर सुनो भाई साधु नही तो, फत्तर है जंगलमो।

अरण्यात जाऊन कशाला बसले पाहिजे? तू ज्या जागी बसला आहेस, तिथेच बस! जंगलात जाऊन बसण्याचे व्यर्थ ढोंग करू नकोस. रामनाम जप आणि मन शुद्ध ठेव. उगाचच दाढी आणि जटा वाढवू नकोस. संतांच्या चरणी विश्वास ठेव. जन्ममरणाची चिंता अकारण करत बसू नकोस. आसन, मुद्रा आणि योगशास्त्रातल्या गोष्टी बाजूला ठेव. खोटे ज्ञान काय कामाचे? योग्यासारखे भगवे कपडे अंगावर चढवले, तीर्थाला गेले आणि डोक्याचे मुंडन करून घेतले म्हणून मनातले खोटे विचार थोडेच दूर होणार आहेत?

हेही वाचा : स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा! -डॉ. राजीमवाले.

रामनामाची मोठ्या आवाजात धून कशाला लावली पाहिजे? आपल्या मनात नाम नाही का घेता येणार? अरे, आपल्या मनात अखंड जप चालू ठेव. मनातील अविचारांचा अंधार दूर कर. ज्ञानाचा दिवा लाव. सद्विचारांच्या उदबत्तीचा सुगंध दाही दिशांत दरवळू दे. असे वागलास, मग आहेच तिथेच परमेश्वराचा खरा भक्त होशील. 

तू जंगलात जाऊन काय करणार आहेस? जंगलात काय दगड थोडे आहेत का? तू असे ढोंग करून जंगलात गेलास, तर त्या दगडात आणखी एकाची भर पडेल. दुसरे काय होणार? हाच विचार आणखी एका पदात ते मांडतात,

काहेकू जंगल जाता बच्चे, काहेकू जंगल जाता?घर बैठे रामही देको, अंदर भीतर भरपुर उजाला, भयो आपनेही सात।येही जनम सुखके कारक साधु संतसो मानो,जान जायगी क्या फल पाया, इतना कहना मानो।बडा कुवा आगे भया, काहेकू इसमें डुबता?जोरू लरके नाता पुती, आखर अकेला तू जाता।कहत कनीर सुनो भाई साधु, अखंड भजो तुम राम,भजन करो किसे ना डरो, जमका कछु न चले काम।

अरण्यात जाण्याची मुळीच गरज नाही. स्वत:च्याच घरी बस आणि अंत:चक्षुंनी राम पहा. मग बघ, दाही दिशांतून कसा प्रकाशाचा गुलाल तुझ्यावर उधळला जातो. या जन्मात सुख मिळवण्यासाठी तू साधुसंतांपुढे नतमस्तक हो. आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही तरी तू काय मिळवणार आहेस? पुढे तर प्रचंड मोठी विहीर आहे. तुला त्या विहिरीत बुडून जायचे नाही ना? पत्नी, पुत्र, कन्या, सगळे नातेवाईक इथेच राहणार आणि तू एकटाच तुझ्या रस्त्याचे जाणार आहेस. म्हणून कबीर सांगतात, रामाचे नाव घे. कोणाची चिंता करू नकोस आणि निर्भयपणे रामनाम घे. 

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!