शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:28 IST

ज्ञानेशवरांचे थोरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्ती यांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. यात ते आपला नाथपंथीय वारसा सांगत आहेत. पण नाथपंथातील हटयोगापेक्षा गुरुभक्ती, शिवशक्तीऐक्य, सर्व जाति जमातींना प्रवेश व ईश्वरावर नि:सीम व निर्हेतुक प्रेम हे विशेष निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरुंकडून मिळाले.

ज्ञानेश्वर महाराज हे खरे नाथपंथीय संतश्रेष्ठ होत. हा पंथ आदिनाथ शिब, उमानाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ या परंपरेने ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वरांपर्यंत येऊन पोहोचला. एका गुहेमध्ये निवृत्तीनाथ गेले असताना, त्यांच्यावर गहिनीनाथांनी कृपा केली आणि हा नाथपंथाचा धागा ज्ञानेश्वरांकडून वाढत गेला. ज्ञानेश्वर, सत्यामलनाथ, शिवदिननाथ, केसरीनाथपासून तो आताच्या स्वरूपानंद व माधवनाथ यांच्यापर्यंत प्रसारित झाला. नाथपंथ हा खरे पाहता योगसंप्रदाय. ज्ञानेश्वरांच्या आपेगाव येथील घराण्यावर नाथपंथाचा प्रभाव होता.

परंतु, या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतो, की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना जो उपदेश केला, तो कोणता होता? योगमार्गाचा की नामस्मरणाचा? योग व भक्ती हे मार्ग थोडे भिन्न आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायात योगमार्ग व कुंडलिनीचे उत्थापन यांचे मोठे काव्यमय वर्णन केले आहे. त्यांचे अनेक अभंगही योगपर आहेत.

हेही वाचा : पुनश्च पांडुरंग भेटीचा आनंद आणि वारकरी झाले भजनात दंग!

म्हणून ज्ञानेश्वरांना व निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी जो उपदेश दिला, तो योगमार्गाचा की भक्तिमार्गाचा, या प्रश्नाचे उत्तर निवृत्तीनाथांनी लिहिलेल्या अभंगातून शोधण्याचा प्रयत्न करू. 

आदिनाथ उमाबीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहस्थिती।तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गयनीनाथा।विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख, देऊनि सम्यक अनन्यता।निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्णनामे।

ज्ञानेशवरांचे थोरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्ती यांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. यात ते आपला नाथपंथीय वारसा सांगत आहेत. पण नाथपंथातील हटयोगापेक्षा गुरुभक्ती, शिवशक्तीऐक्य, सर्व जाति जमातींना प्रवेश व ईश्वरावर नि:सीम व निर्हेतुक प्रेम हे विशेष निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरुंकडून मिळाले. गोरक्षनाथांनाही मच्छिंद्रनाथांकडून प्रेममुद्रा मिळाली. असे निवृत्तीनाथ सांगतात. हाच धागा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना देऊन तो बळकट करण्यास सांगितले. निवृत्तीनाथ स्वत:च म्हणतात की, आमचे कुळ हे पावन कृष्णनामे।

या ठिकाणी हे ध्यानात घेतले पाहिजे की, नाथपंथातील एक थोर नाथ मच्छिंद्र हे विष्णूचे अवतार होते. तेव्हा विष्णूची म्हणजे कृष्णाची, म्हणजेच विठ्ठलाची उपासना परिपुष्ट झाली, असे म्हणावयास हरकत नाही. योगमार्गापेक्षा हा मार्ग सर्वसमान्यांना साधा व सरळ वाटणारा आहे. निवृत्तीनाथांनी या प्रममार्गाचा उल्लेख आपल्या अभंगात अनेक ठिकाणी केला आहे. नाम मुखी सदा तोचि पै भाग्याचा, रामकृष्णमंत्र जनासी उद्धार आणिक साचार मार्ग नाही. प्रत्य विष्णुमूर्ती वाट पाहे नित्य, अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिवाय पंढरी, चंद्रभागा, पुंडलीक, नंदाचा बाळ, गोपाळांमध्ये खेळणारे कृष्णरूप, मेघसावळा कृष्ण असे उल्लेख निवृत्तीनाथ करतात.

हेही वाचा :दैवत जागृत असते, की आपण?