शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:28 IST

ज्ञानेशवरांचे थोरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्ती यांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. यात ते आपला नाथपंथीय वारसा सांगत आहेत. पण नाथपंथातील हटयोगापेक्षा गुरुभक्ती, शिवशक्तीऐक्य, सर्व जाति जमातींना प्रवेश व ईश्वरावर नि:सीम व निर्हेतुक प्रेम हे विशेष निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरुंकडून मिळाले.

ज्ञानेश्वर महाराज हे खरे नाथपंथीय संतश्रेष्ठ होत. हा पंथ आदिनाथ शिब, उमानाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ या परंपरेने ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वरांपर्यंत येऊन पोहोचला. एका गुहेमध्ये निवृत्तीनाथ गेले असताना, त्यांच्यावर गहिनीनाथांनी कृपा केली आणि हा नाथपंथाचा धागा ज्ञानेश्वरांकडून वाढत गेला. ज्ञानेश्वर, सत्यामलनाथ, शिवदिननाथ, केसरीनाथपासून तो आताच्या स्वरूपानंद व माधवनाथ यांच्यापर्यंत प्रसारित झाला. नाथपंथ हा खरे पाहता योगसंप्रदाय. ज्ञानेश्वरांच्या आपेगाव येथील घराण्यावर नाथपंथाचा प्रभाव होता.

परंतु, या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतो, की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना जो उपदेश केला, तो कोणता होता? योगमार्गाचा की नामस्मरणाचा? योग व भक्ती हे मार्ग थोडे भिन्न आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायात योगमार्ग व कुंडलिनीचे उत्थापन यांचे मोठे काव्यमय वर्णन केले आहे. त्यांचे अनेक अभंगही योगपर आहेत.

हेही वाचा : पुनश्च पांडुरंग भेटीचा आनंद आणि वारकरी झाले भजनात दंग!

म्हणून ज्ञानेश्वरांना व निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी जो उपदेश दिला, तो योगमार्गाचा की भक्तिमार्गाचा, या प्रश्नाचे उत्तर निवृत्तीनाथांनी लिहिलेल्या अभंगातून शोधण्याचा प्रयत्न करू. 

आदिनाथ उमाबीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहस्थिती।तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गयनीनाथा।विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख, देऊनि सम्यक अनन्यता।निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्णनामे।

ज्ञानेशवरांचे थोरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्ती यांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. यात ते आपला नाथपंथीय वारसा सांगत आहेत. पण नाथपंथातील हटयोगापेक्षा गुरुभक्ती, शिवशक्तीऐक्य, सर्व जाति जमातींना प्रवेश व ईश्वरावर नि:सीम व निर्हेतुक प्रेम हे विशेष निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरुंकडून मिळाले. गोरक्षनाथांनाही मच्छिंद्रनाथांकडून प्रेममुद्रा मिळाली. असे निवृत्तीनाथ सांगतात. हाच धागा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना देऊन तो बळकट करण्यास सांगितले. निवृत्तीनाथ स्वत:च म्हणतात की, आमचे कुळ हे पावन कृष्णनामे।

या ठिकाणी हे ध्यानात घेतले पाहिजे की, नाथपंथातील एक थोर नाथ मच्छिंद्र हे विष्णूचे अवतार होते. तेव्हा विष्णूची म्हणजे कृष्णाची, म्हणजेच विठ्ठलाची उपासना परिपुष्ट झाली, असे म्हणावयास हरकत नाही. योगमार्गापेक्षा हा मार्ग सर्वसमान्यांना साधा व सरळ वाटणारा आहे. निवृत्तीनाथांनी या प्रममार्गाचा उल्लेख आपल्या अभंगात अनेक ठिकाणी केला आहे. नाम मुखी सदा तोचि पै भाग्याचा, रामकृष्णमंत्र जनासी उद्धार आणिक साचार मार्ग नाही. प्रत्य विष्णुमूर्ती वाट पाहे नित्य, अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिवाय पंढरी, चंद्रभागा, पुंडलीक, नंदाचा बाळ, गोपाळांमध्ये खेळणारे कृष्णरूप, मेघसावळा कृष्ण असे उल्लेख निवृत्तीनाथ करतात.

हेही वाचा :दैवत जागृत असते, की आपण?