शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

तोचि साधु ओळखावा.. देव तेथेचि जाणावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 17:00 IST

साधु पुरुष हे दीनवत्सल असतात. ते दीन व्यक्तिंनांही आपल्या जवळ करतात."

 

 श्लोकार्थ-  " जे लोक देवांना, जसे भजतात, तसे देव सुध्दा छाये प्रमाणे त्याचे लोकांना फळ देतात. देव हे कर्माच्या अधीन असतात, मात्र साधु पुरुष हे दीनवत्सल असतात. ते दीन व्यक्तिंनांही आपल्या जवळ करतात."               एकदा भगवान श्रीकृष्णाचे पिताश्री श्री वसुदेवांकडे  नारदमुनींचे आगमन झाले. त्यावेळी श्री वसुदेवांनी नारदांचे साधु मुनी म्हणून स्वागत केले व आपल्या सारखे खरे साधु कसे दीनवत्सल असतात या विनम्र भावनेतून वसुदेवांनी वरील भाष्य केले.          चातुर्मासास सुरुवात झाली आहे. आजही लोक आपआपल्या परिने चातुर्मासात भजन कीर्तन, पुजा पठण, उपवासादि कर्मे करतात. तथापि यज्ञयागादि कर्मे आता लुप्तप्राय झाली आहेत.           फार पुर्वी यज्ञयागादि कर्मे मोठ्या प्रमाणात होतअसत. यज्ञयागाव्दारे वेगवेगळ्या देवांना प्रसन्न केले जायचे. श्री एकनाथी भागवता मध्ये श्रीमद्  भागवताचे अकराव्या स्कंधावर श्री एकनाथ महाराजांनी प्राकृतामध्ये निरुपण केले आहे. ते म्हणतात,         जे लोक यज्ञाने ज्याप्रकारे अनेक देवांना तृप्त करीत असतात, त्यांना ते देव प्रसन्न होवून तशी फळेही देतात. जर भजत नाहीत तर असंतुष्ट होवून विघ्नेही आणतात. महाराज रुपकाने सांगतात की, सूर्य  जसजसा वर येतो तसतशी माणसाची सावलीही जवळ येते. तसे यज्ञयागादि भजन कर्माने देवही जवळ येतात, प्रसन्न होतात, कृपाही करतात. परंतु सूर्य मावळला की छाया जशी लुप्त होते, तसे मनुष्याकडून  जर अभजन झाले, तर देवांची कृपाही लुप्त होते. अवकृपाही होते.          ही कथा तर छोट्या देव देवतांची झाली. पण एकनाथ महाराज मोठे विनोदाने मार्मिक भाष्य करणारे संत. ते म्हणतात, हे छोटे देवांचे जाऊ द्या, जो मोठा देव आहे ना ! तो सुध्दा जीव घेतल्याशिवाय प्रसन्न होत नाही. येथे जीव घेणे म्हणजे जीवाने आपली जीवरुप अवस्था संपवून शिवरुप अवस्था प्राप्त केल्याशिवाय कुणालाही देव भेटत नाही. अन् भेटला की तर त्याच्या घरी जन्माला सुध्दा येतो, गर्भवास सोसतो. वसुदेवांचा हा स्वानुभव आहे. भगवान श्रीकृष्णांनी देवकीचे उदरी गर्भवास सोसला. त्यांचे कुळात जन्म घेतला. वसुदेव देवकीचे जन्मोजन्मीचे सुकृत, म्हणूनच देवांची त्यांचेवर प्रसन्नता झाली. या उलट देव अभक्ताचे घरी चुकूनही जात नाही.                लहान देव असो की की मोठा देव असाे, दोन्ही देव जणु कंडिशनल आहेत.  शर्त आहे भक्तीची. भक्ती नसेल तर मनुष्या विषयी नकारात्मक भावही ठेवतात. परंतु वसुदेव म्हणतात, सत्पुरुष, साधु पुरुष हे अनकंडिशनल प्रेमभाव ठेवतात. दीन वत्सल भाव ठेवतात. दीन म्हणजे जो परिस्थितीने संसारात असहाय आहे, दुःखी आहे, ज्याला दुःखाचे प्राप्त स्थितीत मदतीची खरोखर गरज आहे.  त्याचे दुःखावर फुंकर जरुरी आहे. फुंकर राजनैतिक नाही वत्सल भावनेची फुंकर. जी दुःखाची दग्धता दूर करुन सुखाची शितलता देईल.  वत्सल शब्द वत्स पासून येतो. वत्स म्हणजे बालक. जे असहाय असते त्याचेवर आई जसा वात्सल्य भाव ठेवते, त्याप्रमाणे वात्सल्य भाव दीनाविषयी दिनवत्सल साधु ठेवतात.  भक्त काय अभक्त काय, जोही दीन अाहे, त्याला साधु  जवळ करतात. जवळ करतात अर्थात आपल्या पवित्र, पुण्यमय प्रेम व करुणेच्या शितल छायेने त्यांची दुःख दूर करतात. दुःखाचे मूळच दूर करतात.              या ठिकाणी तुकोबारायांचा प्रसिध्द अभंग जुळून येतो.       जे कां रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपले ॥        तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥

खरा देव तर तेा आहे जो  दीन वत्सल आहे. जो रंजल्या गांजलेल्यांना आपले मानतो. हे आत्मिय भावनेचे मानने आहे. अनकंडिशनल. कोणतीही अट नाही. वाल्याचा वाल्मिक करण्यात नारदांची कोणतीही अट नव्हती. वाल्या गरीब डाकु. पण गरीबीचे दुःखामुळे डाकु झाला. नारदाचीच हत्या करायला निघाला होता. पण नारदांनी त्याला आपलेसे केले. आपले पावित्र्य वाल्यात ओतले व परम शुध्दीला पोहचविले. डाकु ॠषि झाला.            म्हणून खरे तेच  महान पुरुष आहेत, साधु आहेत, जे दीन वत्सल असतात, करुणाकर असतात. खरे देवही तेच असतात, जे रंजल्या गांजल्यांचे दुःख दूर  करतात.

-   शं.ना.बेंडे अकोला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक