शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

तोचि साधु ओळखावा.. देव तेथेचि जाणावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 17:00 IST

साधु पुरुष हे दीनवत्सल असतात. ते दीन व्यक्तिंनांही आपल्या जवळ करतात."

 

 श्लोकार्थ-  " जे लोक देवांना, जसे भजतात, तसे देव सुध्दा छाये प्रमाणे त्याचे लोकांना फळ देतात. देव हे कर्माच्या अधीन असतात, मात्र साधु पुरुष हे दीनवत्सल असतात. ते दीन व्यक्तिंनांही आपल्या जवळ करतात."               एकदा भगवान श्रीकृष्णाचे पिताश्री श्री वसुदेवांकडे  नारदमुनींचे आगमन झाले. त्यावेळी श्री वसुदेवांनी नारदांचे साधु मुनी म्हणून स्वागत केले व आपल्या सारखे खरे साधु कसे दीनवत्सल असतात या विनम्र भावनेतून वसुदेवांनी वरील भाष्य केले.          चातुर्मासास सुरुवात झाली आहे. आजही लोक आपआपल्या परिने चातुर्मासात भजन कीर्तन, पुजा पठण, उपवासादि कर्मे करतात. तथापि यज्ञयागादि कर्मे आता लुप्तप्राय झाली आहेत.           फार पुर्वी यज्ञयागादि कर्मे मोठ्या प्रमाणात होतअसत. यज्ञयागाव्दारे वेगवेगळ्या देवांना प्रसन्न केले जायचे. श्री एकनाथी भागवता मध्ये श्रीमद्  भागवताचे अकराव्या स्कंधावर श्री एकनाथ महाराजांनी प्राकृतामध्ये निरुपण केले आहे. ते म्हणतात,         जे लोक यज्ञाने ज्याप्रकारे अनेक देवांना तृप्त करीत असतात, त्यांना ते देव प्रसन्न होवून तशी फळेही देतात. जर भजत नाहीत तर असंतुष्ट होवून विघ्नेही आणतात. महाराज रुपकाने सांगतात की, सूर्य  जसजसा वर येतो तसतशी माणसाची सावलीही जवळ येते. तसे यज्ञयागादि भजन कर्माने देवही जवळ येतात, प्रसन्न होतात, कृपाही करतात. परंतु सूर्य मावळला की छाया जशी लुप्त होते, तसे मनुष्याकडून  जर अभजन झाले, तर देवांची कृपाही लुप्त होते. अवकृपाही होते.          ही कथा तर छोट्या देव देवतांची झाली. पण एकनाथ महाराज मोठे विनोदाने मार्मिक भाष्य करणारे संत. ते म्हणतात, हे छोटे देवांचे जाऊ द्या, जो मोठा देव आहे ना ! तो सुध्दा जीव घेतल्याशिवाय प्रसन्न होत नाही. येथे जीव घेणे म्हणजे जीवाने आपली जीवरुप अवस्था संपवून शिवरुप अवस्था प्राप्त केल्याशिवाय कुणालाही देव भेटत नाही. अन् भेटला की तर त्याच्या घरी जन्माला सुध्दा येतो, गर्भवास सोसतो. वसुदेवांचा हा स्वानुभव आहे. भगवान श्रीकृष्णांनी देवकीचे उदरी गर्भवास सोसला. त्यांचे कुळात जन्म घेतला. वसुदेव देवकीचे जन्मोजन्मीचे सुकृत, म्हणूनच देवांची त्यांचेवर प्रसन्नता झाली. या उलट देव अभक्ताचे घरी चुकूनही जात नाही.                लहान देव असो की की मोठा देव असाे, दोन्ही देव जणु कंडिशनल आहेत.  शर्त आहे भक्तीची. भक्ती नसेल तर मनुष्या विषयी नकारात्मक भावही ठेवतात. परंतु वसुदेव म्हणतात, सत्पुरुष, साधु पुरुष हे अनकंडिशनल प्रेमभाव ठेवतात. दीन वत्सल भाव ठेवतात. दीन म्हणजे जो परिस्थितीने संसारात असहाय आहे, दुःखी आहे, ज्याला दुःखाचे प्राप्त स्थितीत मदतीची खरोखर गरज आहे.  त्याचे दुःखावर फुंकर जरुरी आहे. फुंकर राजनैतिक नाही वत्सल भावनेची फुंकर. जी दुःखाची दग्धता दूर करुन सुखाची शितलता देईल.  वत्सल शब्द वत्स पासून येतो. वत्स म्हणजे बालक. जे असहाय असते त्याचेवर आई जसा वात्सल्य भाव ठेवते, त्याप्रमाणे वात्सल्य भाव दीनाविषयी दिनवत्सल साधु ठेवतात.  भक्त काय अभक्त काय, जोही दीन अाहे, त्याला साधु  जवळ करतात. जवळ करतात अर्थात आपल्या पवित्र, पुण्यमय प्रेम व करुणेच्या शितल छायेने त्यांची दुःख दूर करतात. दुःखाचे मूळच दूर करतात.              या ठिकाणी तुकोबारायांचा प्रसिध्द अभंग जुळून येतो.       जे कां रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपले ॥        तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥

खरा देव तर तेा आहे जो  दीन वत्सल आहे. जो रंजल्या गांजलेल्यांना आपले मानतो. हे आत्मिय भावनेचे मानने आहे. अनकंडिशनल. कोणतीही अट नाही. वाल्याचा वाल्मिक करण्यात नारदांची कोणतीही अट नव्हती. वाल्या गरीब डाकु. पण गरीबीचे दुःखामुळे डाकु झाला. नारदाचीच हत्या करायला निघाला होता. पण नारदांनी त्याला आपलेसे केले. आपले पावित्र्य वाल्यात ओतले व परम शुध्दीला पोहचविले. डाकु ॠषि झाला.            म्हणून खरे तेच  महान पुरुष आहेत, साधु आहेत, जे दीन वत्सल असतात, करुणाकर असतात. खरे देवही तेच असतात, जे रंजल्या गांजल्यांचे दुःख दूर  करतात.

-   शं.ना.बेंडे अकोला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक